शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

या 8 गोष्टी जाणून घेतल्याशिवाय करु नका लग्नाचा विचार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2018 15:19 IST

खरंतर ज्या व्यक्तीशी तुम्ही लग्न करणार असाल त्याच्या/तिच्याबाबत तुम्हाला माहिती असणारच. पण त्यासोबतच आणखीही काही गोष्टी अशा असतात ज्यांचा विचार करणं तुमच्यासाठी अधिक गरजेचं आहे.

लग्न हा कुणाच्याही आयुष्यातील सर्वात महत्वाचा निर्णय असतो. लग्न करण्याआधी आपण अनेक गोष्टी बघतो आणि समजून घेतो. त्यानंतरच आपण कुणासोबत संपूर्ण आयुष्य जगण्याचा निर्णय घेतो. खरंतर ज्या व्यक्तीशी तुम्ही लग्न करणार असाल त्याच्या/तिच्याबाबत तुम्हाला माहिती असणारच. पण त्यासोबतच आणखीही काही गोष्टी अशा असतात ज्यांचा विचार करणं तुमच्यासाठी अधिक गरजेचं आहे. चला जाणून घेऊया काय आहेत त्या गोष्टी...

1) आर्थिक स्थिती -

तुम्हाला कितीही चांगली सॅलरी मिळत असेल तरीही तुमच्या नव्या आयुष्यात पैशांबाबत काय अपेक्षा आहेत? याबाबत पार्टनरसोबत बोला. कोणत्याही नात्यात पैशांबाबत बोलणे जरा विचित्र वाटेल पण यावर बोलणे फार गरजेचे आहे. दोघांनी बोलून व्यवस्थित प्लॅनिंग करणे गरजेचे आहे. 

2) फॅमिली प्लॅनिंग -

मुल झाल्यानंतर तुमच्या आयुष्यात अनेक बदल होत असतात. त्यामुळे दोघांनी याविषयावर बोलून निर्णय घेणे गरजेचे आहे. लग्नाआधीच यावर बोलल्यास अधिक चांगले कारण लग्नानंतर याबाबत अनेक मतभेद होऊ शकतात. अशावेळी कमीत कमी एकमेकांची याबाबतची मते जाणून घ्या. 

3) दोघांपैकी एकच कमावत असेल तर -

घर चालवण्यासाठी तुम्ही दोघांनीही नोकरी करणे योग्य होईल की, एकाच्या पगारात भागणार आहे? याचा विचार करणे गरजेचे आहे. तिला हाऊसवाईफ व्हायला आवडेल की, तिला काम करायचंय? या गोष्टीही बोलायला हव्यात. 

4) पर्सनल स्पेस -

पर्सनल स्पेसबाबत आधीच दोघांनी बोललेलं अधिक बरं. पर्सनल स्पेसबाबत तुमच्या पार्टनरचा काय विचार आहे? हे जाणून घेणे महत्वाचे आहे. उगाच नंतर अडचणी निर्माण होण्यापेक्षा आधीच ही गोष्ट क्लिअर केलेली बरी. 

5) घरातील कामकाजात दोघांची भूमिका -

काय ती पारंपारिक पद्धतीने घर चालवण्यात सहज आहे किंवा घरातील जबाबदारी दोघांमध्ये बरोबरीत वाटली जावी? यावरही संवाद व्हायला हवा. दोघेही नोकरी करणारे असाल तर यावरुन वाद होण्याची शक्यता जास्त आहे.

7) दोघेही नोकरी करणार तर घर कोण सांभाळणार?

जर तुम्ही दोघांनीही लग्नानंतर नोकरी करण्याचा निर्णय घेतला असेल तर मग मुलं झाल्यावर त्यांची जबाबदारी कोण घेणार? याचाही विचार करा. नाहीतर मुलांचं संगोपन नीट करता येणार नाही. यावरुन दोघांमध्ये वाद पेटतील. 

8) भांडणं झाल्यावर काय?

प्रत्येकालाच असं वाटत असतं की, त्याच्या जीवनात भांडणासारख्या गोष्टी असू नये. पण संसार म्हटला की, काही गोष्टींमुळे भांडणं होत असतात. अशावेळी काय भूमिका घ्यावी, परिस्थिती कशी हाताळावी याचाही विचार होणे गरजेचे आहे. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपmarriageलग्न