शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
2
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
3
दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
4
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
5
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
6
CBSE board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
7
निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
8
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
9
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?
10
मोक्ष प्राप्तीच्या शोधात लंडनवरून काशीमध्ये आली ही मुस्लीम महिला; 27 वर्षांपूर्वी घडला होता मोठा अपराध, आता हिंदू धर्म स्वीकारला?
11
ना सिक्स पॅक अ‍ॅब्स ना फिल्मी बॅकग्राऊंड, बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर देणारा हा अभिनेता कोण?
12
शेअर बाजारात अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट म्हणजे काय? त्याने काय फरक पडतो?
13
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
14
अखेर ट्रम्पनी नांगी टाकलीच; झोळीत काय हे न पाहताच चीनविरोधात उगाचच वटारलेले डोळे; वाचा इन्साईड स्टोरी
15
सूरजचे असंख्य चाहते असूनही 'झापुक झुपूक' अपयशी का झाला? अंकिता वालावलकर म्हणाली- "त्याचे फॅन.."
16
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
18
टाटाने आणले Altroz चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल; मिळतील एकापेक्षा एक दमदार फिचर्स, पाहा...
19
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
20
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...

या 8 गोष्टी जाणून घेतल्याशिवाय करु नका लग्नाचा विचार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2018 15:19 IST

खरंतर ज्या व्यक्तीशी तुम्ही लग्न करणार असाल त्याच्या/तिच्याबाबत तुम्हाला माहिती असणारच. पण त्यासोबतच आणखीही काही गोष्टी अशा असतात ज्यांचा विचार करणं तुमच्यासाठी अधिक गरजेचं आहे.

लग्न हा कुणाच्याही आयुष्यातील सर्वात महत्वाचा निर्णय असतो. लग्न करण्याआधी आपण अनेक गोष्टी बघतो आणि समजून घेतो. त्यानंतरच आपण कुणासोबत संपूर्ण आयुष्य जगण्याचा निर्णय घेतो. खरंतर ज्या व्यक्तीशी तुम्ही लग्न करणार असाल त्याच्या/तिच्याबाबत तुम्हाला माहिती असणारच. पण त्यासोबतच आणखीही काही गोष्टी अशा असतात ज्यांचा विचार करणं तुमच्यासाठी अधिक गरजेचं आहे. चला जाणून घेऊया काय आहेत त्या गोष्टी...

1) आर्थिक स्थिती -

तुम्हाला कितीही चांगली सॅलरी मिळत असेल तरीही तुमच्या नव्या आयुष्यात पैशांबाबत काय अपेक्षा आहेत? याबाबत पार्टनरसोबत बोला. कोणत्याही नात्यात पैशांबाबत बोलणे जरा विचित्र वाटेल पण यावर बोलणे फार गरजेचे आहे. दोघांनी बोलून व्यवस्थित प्लॅनिंग करणे गरजेचे आहे. 

2) फॅमिली प्लॅनिंग -

मुल झाल्यानंतर तुमच्या आयुष्यात अनेक बदल होत असतात. त्यामुळे दोघांनी याविषयावर बोलून निर्णय घेणे गरजेचे आहे. लग्नाआधीच यावर बोलल्यास अधिक चांगले कारण लग्नानंतर याबाबत अनेक मतभेद होऊ शकतात. अशावेळी कमीत कमी एकमेकांची याबाबतची मते जाणून घ्या. 

3) दोघांपैकी एकच कमावत असेल तर -

घर चालवण्यासाठी तुम्ही दोघांनीही नोकरी करणे योग्य होईल की, एकाच्या पगारात भागणार आहे? याचा विचार करणे गरजेचे आहे. तिला हाऊसवाईफ व्हायला आवडेल की, तिला काम करायचंय? या गोष्टीही बोलायला हव्यात. 

4) पर्सनल स्पेस -

पर्सनल स्पेसबाबत आधीच दोघांनी बोललेलं अधिक बरं. पर्सनल स्पेसबाबत तुमच्या पार्टनरचा काय विचार आहे? हे जाणून घेणे महत्वाचे आहे. उगाच नंतर अडचणी निर्माण होण्यापेक्षा आधीच ही गोष्ट क्लिअर केलेली बरी. 

5) घरातील कामकाजात दोघांची भूमिका -

काय ती पारंपारिक पद्धतीने घर चालवण्यात सहज आहे किंवा घरातील जबाबदारी दोघांमध्ये बरोबरीत वाटली जावी? यावरही संवाद व्हायला हवा. दोघेही नोकरी करणारे असाल तर यावरुन वाद होण्याची शक्यता जास्त आहे.

7) दोघेही नोकरी करणार तर घर कोण सांभाळणार?

जर तुम्ही दोघांनीही लग्नानंतर नोकरी करण्याचा निर्णय घेतला असेल तर मग मुलं झाल्यावर त्यांची जबाबदारी कोण घेणार? याचाही विचार करा. नाहीतर मुलांचं संगोपन नीट करता येणार नाही. यावरुन दोघांमध्ये वाद पेटतील. 

8) भांडणं झाल्यावर काय?

प्रत्येकालाच असं वाटत असतं की, त्याच्या जीवनात भांडणासारख्या गोष्टी असू नये. पण संसार म्हटला की, काही गोष्टींमुळे भांडणं होत असतात. अशावेळी काय भूमिका घ्यावी, परिस्थिती कशी हाताळावी याचाही विचार होणे गरजेचे आहे. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपmarriageलग्न