शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

'या' कारणांमुळे नात्यांमध्ये वाढतयं पर्सनल स्पेसचं महत्त्व!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 5:53 PM

काही लोकं लग्नानंतर 'मी' आणि 'आपण' या दोन शब्दांना समान महत्त्व देतात. आता नवीन जोडपी लग्नाच्या जुन्या चौकटी तोडून लग्नाच्या वेगळ्या व्याख्या तयार करताना दिसत आहेत.

काही लोकं लग्नानंतर 'मी' आणि 'आपण' या दोन शब्दांना समान महत्त्व देतात. आता नवीन जोडपी लग्नाच्या जुन्या चौकटी तोडून लग्नाच्या वेगळ्या व्याख्या तयार करताना दिसत आहेत. ते एकमेकांवर हक्क गाजवण्यापेक्षा एकमेकांना पर्सनल स्पेस देताना दिसत आहेत. त्यांना याची जाणीव आहे की, कधी त्यांना एकांत पाहिजे आणि कधी आपल्या जोडीदारासोबत वेळ घालवायचा आहे. 

भांडण होणं चांगलं

आधी असं समजलं जात असे की, जर नात्यामध्ये भांडण होत असेल तर ते नातं कमजोर आहे किंवा नात्यामध्ये फूट पडत आहे. पण आताच्या पिढीचा असा समज आहे की, भांडणांमुळे नात्यामध्ये प्रेम वाढतं. पण ही भांडण वेळीच सोडवणं गरजेचं असतं. तसेच नवीन जोडप्यांच्या म्हणण्यानुसार नवरा-बायको असणं म्हणजे दोघांचे विचार एकच असणं गरजेचं नसतं. दोघांमध्येही मतभेद होऊ शकतात आणि अनेकदा जबाबदाऱ्या, राहण्याची पद्धत किंवा इतर अन्य छोट्या छोट्या गोष्टींवर भांडणं होऊ शकतात. अनेकदा मतभेदांचं रूपांतरही भांडणांमध्ये होतं. परंतु या छोट्या छोट्या मतभेदांना आपापसात सोडवण्याची कलाही या जोडप्यांमध्ये आहे. 

घरातील गोष्टी बाहेर कराव्यात

आधी घरातल्या गोष्टी घरातच सोडवण्याचा सल्ला देण्यात येत असे. थोरामोठ्यांच्या म्हणण्याप्रमाणे आधी घरातील गोष्टी या घरातील चार भिंतींमध्येच सोडवल्या गेल्या पाहिजेत. त्यांची चर्चा घराबाहेरील लोकांसोबत करू नये. पण या जुन्या विचारांनाही नवीन जोडप्यांनी पूर्णविराम दिला असून जोपर्यंत त्यांना वाटते की ही समस्या ते सोडवू शकतात. तोपर्यंत ते यामध्ये तिसऱ्या व्यक्तिला येऊ देत नाहीत. पण जेव्हा प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे त्यांना जाणवते त्यावेळी ते घराबाहेरील सदस्याचा सल्ला घेऊन ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. 

घटस्फोटाचा विषय

लग्न म्हणजे दोन व्यक्तिंना एकमेकांची साथ देण्यासाठी तयार करण्यात आलेली सामाजिक-पारिवारिक संस्था होय. अनेकदा या नात्यामध्ये फूट पडते आणि त्यावेळी वेगळं होणं हा एकच पर्याय समोर असतो. पण अशा परिस्थितीतही ही जोडपी एकमेकांना समजून घेताना दिसतात. अनेक जोडपी अशी आहेत ज्यांना मुलं झाल्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला आहे तरिसुद्धा मुलांच्या संगोपनाची जबाबदारी ते एकत्र येऊन पार पाडत आहेत. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपmarriageलग्नLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट