शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

गोड बोलणं, विनम्र वागणं आरोग्यासाठीही फायद्याचं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 11:15 IST

असे म्हटले जाते की, लहान मुलं ही मातीसारखी असतात, त्यांना संवेदनशील करण्यासाठी त्यांचे आई-वडील आणि परिवारातील सदस्य संवेदनशील असणं गरजेचं आहे.

(Image Credit : tripsavvy.com)

असे म्हटले जाते की, लहान मुलं ही मातीसारखी असतात, त्यांना संवेदनशील करण्यासाठी त्यांचे आई-वडील आणि परिवारातील सदस्य संवेदनशील असणं गरजेचं आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये थॅंक्स गिवींग डे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागे संवेदशीलतेचं महत्त्व जाणून घेणे, दुसऱ्यांचे आभार मानने, मदत करे, विनम्र होणे आणि संवेदलशीलता शिकवतात. पण विनम्र असण्याची अनेक फायदे होताना बघायला मिळतात. विनम्र असणे तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. चला जाणून घेऊ विनम्र असण्याचे फायदे.

१) तणावापासून बचाव

विनम्र किंवा संवेदनशील असण्याचा मोठा फायदा म्हणजे तुम्ही स्वत:ला शांत ठेवू शकता आणि या कारणाने तुमचा ताणही वाढत नाही. क्लिनिकल सायकॉलॉजीकल सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित एका अभ्यासात ही बाब स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ज्या लोकांनी वागणूक विनम्र असते, त्यांचे खूपसारे मित्र असतात. सोबतच या लोकांना एकटेपणा आणि तणाव कमी जाणवतो. 

२) मूड राहतो चांगला

लोक म्हणतात की, कर्म करा फळाची चिंता करु नका. पण हेच कर्म तुमच्या कामी येतं. जेव्हा तुम्ही लोकांसोबत चांगलं वागता, त्या बदलत्यात समोरची लोकंही तुमच्याशी चांगलं वागतात. यातून तुम्हाला तुमचं महत्त्व आणि प्रेमाची जाणीव होते. जेव्हा आपण दुसऱ्यांप्रति दया दाखवतो तेव्हा आपला मेंदु एंडोर्फिन हार्मोन्स रिलीज करण्याचा संकेत देतो. या हार्मोन्समुळे आनंदी आणि चांगलं जाणवतं. सोबतच सेरोटेनिन केमिकलचीही निर्मिती होते, जे तुम्हाला संतुष्ट झाल्याची जाणीव करुन देतं.  

३) ब्लड प्रेशरवर नियंत्रण

विनम्र असण्याचा प्रभाव तुमच्या आरोग्यावरही दिसतो. इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायकोफिजिओलॉजीमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, जे लोक इतरांना सामाजिक रुपाने सपोर्ट करतात, त्यांचं ब्लड प्रेशर इतर लोकांच्या तुलनेत कमी असतं. म्हणजे विनम्र असल्याने तुमचा तणाव वाढत नाही, त्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो. 

४) जास्त आयुष्य

विनम्र असण्याचा मोठा फायदा असाही आहे की, तुम्ही जास्त आयुष्य जगता. काही शोधांमधून हे सिद्ध झालं आहे की, जे लोक दुसऱ्यांप्रति संवेदनशील असतात ते जास्त आयुष्य जगतात. कारण विनम्र लोकांना आनंदी कसं रहावं याचीही कल्पना अधिक असते, ते फार जास्त तणाव घेत नाहीत. त्यामुळे अर्थातच त्याचं आयुष्य वाढतं. 

५) समाजात प्रतिष्ठा

विनम्र आणि संवेदनशील लोकांना समाजात नेहमीच चांगलं म्हटलं जातं. त्यांना लोकांकडून फार महत्त्व मिळतं. कोणत्याही मोठा निर्णय घेताना त्यांना सल्ला विचारला जातो. तसेच त्यांच्याकडे मदतीसाठी सर्वातआधी धाव घेतली जाते. त्यामुळे त्यांची समाजात एक वेगळीच प्रतिष्ठा तयार होते.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सrelationshipरिलेशनशिप