शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

लव्ह मॅरेज तर केलं, पण आता खाने के लाले?.

By admin | Updated: June 2, 2017 19:45 IST

अनेक जण लव्हमॅरेज करतात. जेव्हा प्रेमात असतात, तेव्हा त्यांना फक्त प्रेम आणि प्रेमच दिसत असतं, त्याशिवाय दुसर्‍या कोणत्या गोष्टीचा विचारच त्यांच्या मनात येत नाही.

अनेक जण लव्हमॅरेज करतात. जेव्हा प्रेमात असतात, तेव्हा त्यांना फक्त प्रेम आणि प्रेमच दिसत असतं, त्याशिवाय दुसर्‍या कोणत्या गोष्टीचा विचारच त्यांच्या मनात येत नाही. आपल्या भविष्याचं काय, जबाबदार्‍यांचं काय, त्या आपण कशा पद्धतीने पार पाडणार याचा काहीच विचार त्यांनी केलेला नसतो. ते घरच्यांच्या विरोधात जाऊन ते लग्न तर करतात, पण काही दिवसांतच त्यांना दाल-आटे का भाव समजायला लागतो. बर्‍याचदा त्यावरुनच भांडणंही व्हायला लागतात आणि या प्रेमात खटके उडायला लागतात.

 
 
 
 
 
अशावेळी नेमकं काय होतं?
 
 
 
जेव्हा प्रेम नवं असतं, तेव्हा सगळा भर असतो, तो त्यानं तिला फिरायला नेणं, गिफ्ट्स देणं यावर. अशा वेळी तो जे कमवत असतो ते त्यांना सहज पुरतं. पण जर का अशात पळून जाऊन लग्न  करायची वेळ आली, तर?
1. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आर्थिक गणित गडगडतं. कारण एकूण जगण्याच्या खर्चाचा मोठा हिस्सा आईवडील उचलत असतात. आणि जेव्हा अचानक स्वतंत्रपणे संसार करायची वेळ येते तेव्हा पैसे पुरेनासे होतात.
2. घरातले आर्थिक व्यवहार, घरखर्चाचे तपशील, प्रायॉरिटीज याचा दोघांनीही विचार केलेला नसतो. त्यामुळेही आर्थिक घोळ होतात.
3. अशावेळी सामान्यपणे मुलाला पैशांचं जास्त टेन्शन येतं. आणि मुलीला भावनिक एकटेपणा जाणवायला लागतो. कारण अजूनही आपल्याकडे कमावण्याची मूळ जबाबदारी पुरुषाची आणि घराची जबाबदारी स्त्रीची असंच समजलं जातं.
 
 
 
4. पळून जाऊन, इच्छेविरुद्ध केलेलं लग्न असेल, तर मुलाकडचे त्याची आर्थिक कोंडी करतात. मुलीकडची माणसं रागावून मुलीशी संबंध तोडतात. आणि त्यामुळे हा धोका अजूनच वाढतो.
5. अशा वेळी प्रत्येक प्रश्न समजुतीनं सोडवला नाही, तर घरचे त्यांच्यात सहज फूट पाडून घरी परत ये, दुकान तुझ्या नावावर करून देतो, असं काही तरी आमिष मुलाच्या घरची मंडळी दाखवतात. जर का बायको आर्थिक चणचणीवरून कटकट करत असेल, तर मुलगा त्याकडे सहज ओढला जाऊ शकतो.
6. कधीकधी मुलीच्या घरचे तिला सांगतात, की ‘वडिलांनी जेवण सोडलंय, आईनं अंथरूण धरलंय, एकदा तरी घरी येऊन जा. आम्ही काही बोलणार नाही’ आता हे खरंही असू शकतं. पण असंही असू शकतं, मुलगी घरच्यांवर विश्वास ठेवून घरी जाते आणि मग भावनिक चक्रात अडकते. किंवा तिला कोंडून ठेवतात आणि ती परत येऊ शकत नाही.
  हे टाळण्यासाठी सांसारिक जबाबदार्‍यांचा आधी विचार करणं आणि त्यासाठी मनाची तयारी हाच सवरेत्तम मार्ग आहे. आपल्या जबाबदार्‍यांचं आपल्याला भान नसलं तर मग मोठीच आफत ओढवते आणि ही लव्ह मॅरेजेस मग निष्फळ ठरतात. परिस्थितीनं दिलेले ‘फटके’ इतके जोरदार ठरतात, की मग आपल्या निर्णयाचा पश्चात्तापही व्हायला लागतो. त्यासाठी या सार्‍या गोष्टींचा मुळातूनच विचार करायला हवा.