शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

तुमच्या बॉयफ्रेन्डमध्ये हे 7 गुण असतील तर लगेच लग्नाला द्या होकार !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 2:35 PM

आजची जनरेशन  लग्न संस्थेकडे शंकेच्या दृष्टीने बघू लागली आहे. या जनरेशनला लिव्ह इन रिलेशनशिप मान्य आहे. त्यांना प्रेम मान्य आहे. पण त्यातील किती तरुणी आपल्या बॉयफ्रेन्डसोबत लग्न करतात यात शंका आहे.

आत्ताच्या जनरेशनमधील तरुण-तरुणींना लग्न करण्यात रस नाही, असं एक निरीक्षण आहे. घरातील लोकांनी मुलींसाठी मुलं पाहणं हा रिवाज गेली कित्येक वर्ष सुरु आहे. आत्ताही अशी लग्न होतात पण प्रमाण कमी झालंय. आजची जनरेशन  लग्न संस्थेकडे शंकेच्या दृष्टीने बघू लागली आहे. या जनरेशनला लिव्ह इन रिलेशनशिप मान्य आहे. त्यांना प्रेम मान्य आहे. पण त्यातील किती तरुणी आपल्या बॉयफ्रेन्डसोबत लग्न करतात यात शंका आहे. कारण आजूबाजूच्या लग्न झालेल्यांच्या विविध घटना पाहून ही जनरेशन  जरा लग्नापासून पळताना दिसते. पण तुमच्या बॉयफ्रेन्डमध्ये खालील गुण असतील तर तुम्ही त्याच्याशी लग्नाचा विचार करु शकता.

1) ऐकून घेणारा

बोलतात सगळेच. सगळ्यांनाच ओरडता येतं. पण असे फार कमी असतात जे चांगले ऐकून घेणारे असतात. हे फारच दुर्मिळ वैशिष्ट्य आहे. अनेकदा अशी स्थिती येते की, तुम्हाला वाटत असतं की, तुमचं कुणीतरी ऐकावं. खासकरुन जेव्हा तुम्ही निराश असता. अशावेळी तुम्हाला तुमच्या बॉयफ्रेन्डची मदत मिळत असेल, तो तुमची ही गरज भागवत असेल तर तुम्ही लकी आहात. जर त्याच्याशी बोलून तुम्हाला हलकं वाटत असेल, तुमचा आत्मविश्वास वाढत असेल, तर तो व्यक्ती नक्कीच मॅरेज मटेरिअल आहे. 

2) तुम्हाला सपोर्ट करणारा आणि तुमचं यश एन्जॉय करणारा

मुलींसाठी हा बदलता काळ फारच वेगवेगळ्या दृष्टीने संघर्षांचा आहे. खासकरुन मध्यम वर्गीय मुलींना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी खूप धडपड करावी लागते. जर अशात तुमचा बॉयफ्रेन्ड तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सपोर्ट करत असेल तर तो तुमच्यासाठी परफेक्ट आहे. जर तो तुमचं यश एन्जॉय करत असेल आणि तुमच्या आनंदात तो सहभागी होत असेल तर त्याच्याशी लग्नाचा विचार करु शकता. 

तुम्हाला या सवयी असतील तर तुमचं रिलेशनशिप आहे धोक्यात

3) त्याच्या यशात तुम्हाला स्थान देत असेल

फक्त सोबत फिरणं, पार्ट्या करणं हे न करता तो जर तुम्हाला त्याच्या यशात सहभागी करुन घेत असेल, त्या यशात तुमचाही वाटा सांगून तो तुम्हाला स्पेशल फिल करवत असेल, तर आणखी काय हवंय. तो तुमचा चांगला लाईफ पार्टनर होऊ शकतो.

4) इतरांशी कसा वागतो

तुम्हाला सोडून तुमचा बॉयफ्रेन्ड इतरांशी कसा वागतो हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तो मोठ्यांशी कसा वागतो, लहानांशी कसा वागतो, महिलांशी कसा वागतो हे महत्वाचं आहे. जर तो सारख्याच प्रेमाने सर्वांचा सन्मान करत असेल, त्यांचा आदर करत असेल तर तुम्ही त्याला लाईफ पार्टनर बनवण्याचा विचार करु शकता.

5) त्याच्या निर्णयात तुमचं मत

निर्णय लहान असो वा मोठा तो जर तुम्हाला त्याच्या निर्णयात सहभागी करुन घेत असेल, तुमच्याकडूनही त्यात सल्ला घेत असेल, तुमचं मत विचारत असेल तर ही फारच चांगली बाब आहे. असे गुण फारच कमी लोकांमध्ये आढळतात. त्यामुळे तुमच्या बॉयफ्रेन्डमध्ये जर हा गुण असेल तर त्याने तुमचं नातं आणखीन मजबूत होऊ शकतं. 

अशा पुरूषांवर जास्त फिदा होतात महिला !

6) तुमचा ऐकमेकांवर विश्वास आहे

विश्वास हा कोणत्याही यशस्वी नात्याचा मुख्य पाया आहे. विश्वास असेल तर प्रेम टिकतं, वाढतं. विश्वास नसेल तर प्रेम असूच शकत नाही. जर तुम्हा दोघांचाही ऐकमेकांवर विश्वास असेल तर तुम्हाला कुणीही वेगळं करु शकत नाही. 

7) राग मनात धरुन न ठेवणारा

वाद-विवाद, भांडण हे प्रत्येक नात्यात होत असतात. पण ही भांडणं, वाद, इगो विसरुन आपण पुन्हा नव्याने कशी सुरुवात करतो हे जास्त महत्वाचं असतं. भांडण जास्त न लांबवता समजूतदारपणा घेणे हा गुण फारच कमी लोकांमध्ये बघायला मिळतो. 

मुळात कोणताही व्यक्ती 100 टक्के परफेक्ट नसतो. पण जेव्हा दोन वेगळे व्यक्ती एकत्र येतात तेव्हा त्यांना त्यांचं नातं परफेक्ट बनवायचं असतं.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपBeauty Tipsब्यूटी टिप्स