शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

मुलांमधील एकाग्रता वाढवण्यासाठी हे करा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 15:34 IST

दैनंदिन जीवनात प्रगतीस येणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आपल्या जीवनशैलीमध्ये बरेच छोटे-मोठे बदल घडू लागले आहेत. याचे मानवी आयुष्यावर सकारात्मक तसंच नकारात्मक दोन्ही परिणाम झालेत, याचे स्पष्टीकरण नव्यानं मांडण्याची आवश्यकता नाही.

दैनंदिन जीवनात प्रगतीस येणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आपल्या जीवनशैलीमध्ये बरेच छोटे-मोठे बदल घडू लागले आहेत. याचे मानवी आयुष्यावर सकारात्मक तसंच नकारात्मक दोन्ही परिणाम झालेत, याचे स्पष्टीकरण नव्यानं मांडण्याची आवश्यकता नाही. ज्याप्रमाणे मैदानी खेळांची जागा-गेम्सनं, पाट्या-वरट्याची जागा मिक्सरनं, खलबत्याची जागा क्रशरनं घेतलीय त्याचप्रमाणे पौष्टिक पदार्थांऐवजी आता प्रत्येक घराघरात इंन्स्टंट आणि जंक फूडची जास्त चलती आहे. 

'2 Minutes'मध्ये झटपट आणि पटपट जेवण बनण्याच्या नादात जर आपल्या आहारात इंन्स्टंट आणि जंक फूडचा मोठ्या प्रमाणात समावेश होत असेल तर वेळीच सावध व्हा. धोका लक्षात घ्या.  कारण यामुळे आपल्या मुलाच्या स्वभावावर, एकाग्रतेवर वाईट परिणाम होतोय. याकडे दुर्लक्ष केले तर त्यामुळे होणारे नुकसान कदाचित आयुष्यात भरुन निघणार नाही. हल्लीची मुलं चंचल, रागीट, भांडखोर, चिडखोर, अस्थिर असतात, ही आणि यांसारखीच कित्येक वाक्य आपण दररोज ऐकतो. एकूणच काय त्यांच्यामध्ये एकाग्रतेचा अभाव आहे, हेच सर्वाना निदर्शनास आणून द्यायचे असते. यावर अनेक पालकांचं असंही म्हणणं असेल की आम्ही योग्यरित्या त्यांचे संगोपन करत आहोत, त्यांना घडवत आहोत, नवनवीन कलाकौशल्य आत्मसात करण्यास शिकवत आहोत, तरीही मुलांमध्ये एकाग्रतेची कमी जाणवतेय. यामागील तुम्हाला पडलेल्या प्रत्येक 'का'ची उत्तरं शोधूनही सापडली नसतील. स्वभावाला औषध नसतं, असं तुम्हाला वाटत असेल तर तसंच नाहीय. कारण स्वभावावर औषध म्हणजे 'योग्य, सकस आणि पौष्टिक आहार'

मिनिटामिनिटाला मुलांचे बदलत जाणाऱ्या स्वभावामागील प्रमुख कारण कदाचित न मिळणारा आहारदेखील असू शकतं. कौटुंबिक, भौगोलिक कारणांप्रमाणे सकस आणि पौष्टिक आहार न मिळाल्यानंही मुलांच्या एकाग्र शक्तीवर परिणाम होतो, असे निदर्शनास आले आहे.  मोठ्यांनीच जर पौष्टिक आहाराऐवजी वारंवार चहा,कॉफी, शीतपेयाचे वारंवार सेवन केले तर त्यांच्या शारीरिक-मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतात. तर मग लहान मुलांचं काय होत असावं, याचा विचार आपण गांभीर्यानं करणं आवश्यक आहे.   आपल्या मुलांनं आयुष्यात सकारात्मक, एखाद्या विषयाप्रती त्याचे लक्ष केंद्रित असावे, एकाग्रता असावी, असे हवे असल्यास त्यांच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये या पौष्टिक आहाराचा समावेश करावा1. ब्रेकफास्टमध्ये धान्यांचा समावेश करावाशरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाले की मुलांच्या शरीरातील ऊर्जा कमी होते. यामुळे त्यांचे लक्ष विचलित होते, त्यांचा स्वभाव चिडखोर होतो. चिडचिड कमी करण्यासाठी त्यांच्या नाश्त्यामध्ये धान्यांचा समावेश करावा. विशेषतः ब्राऊन राईस आणि बाजरीचा यादीत जरुर समावेश करावा. ब्राऊन राईसचे स्वादिष्ट पोहे हा देखील नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. कामाच्या धावपळीमुळे नाश्त्यामध्ये हे पदार्थ देणे शक्य नसल्यास दुपारच्या जेवणात त्यांचा समावेश करावा. या पदार्थांचे सेवन केल्यानं त्यांच्या शरीरात ऊर्जा निर्माण होईल आणि त्यांना वारंवार भूक लागणार नाही. यामुळे त्यांचे लक्ष केंद्रित राहण्यास मदत होईल. 

2. आरोग्यास साखर हानिकारक ''लहान पण देगा देवा मुंगी साखरचे रवा'', असे तुकाराम महाराजांनी म्हटलं खरं पण हीच साखर आयुष्यासाठी हानिकारक ठरू शकते. साखर चवीला जरी गोड असली त्याचे ती आरोग्यास अपायकारक आहे. त्यामुळे स्वयंपाक घरातून साखर हद्दपार केल्यास तुमचा निर्णय कौतुकास्पद ठरू शकतो. तुमच्या नकळत मुलं घराबाहेर किती प्रमाणात साखर पोटात घेत आहेत, यावर तुमचं नियंत्रण नसलं तरीही घरात त्यांच्या साखर खाण्यावर तुम्ही पूर्णतः नियंत्रण आणू शकता. साखरेच्या सेवनामुळे शरीरावर किती वाईट परिणाम होतात, याची माहिती देणारा सूचना फलक (नोट) स्वयंपाक घरात लावावा. ही नोट त्यांनी नियमित वाचलीच पाहिजे. जेणेकरुन त्यांच्या साखर खाण्याची सवय आपोआप कमी होण्यास मदत  होईल. मात्र हा बदल लगचेच घडून येत नाहीत, त्यामुळे वेगवेगळ्या कल्पना, युक्ती, नियोजनाद्वारे हा बदल घडवून आणावा.उदा. जर आपला दुधात दोन चमचे साखरऐवजी दीड चमचा साखर मिसळावी. हळूहळू साखरेचं प्रमाण आणखी कमी करावे. 

3 भूक भागवणारी खाद्यपदार्थ- आहारात कंदमुळांचा समावेश करावा- रताळ्याचे भाजलेल्या चकत्या किंवा फ्रेन्च फ्राईज्. हा स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ मुलांना नक्कीच आवडेल.  - अरबीची (कंदमुळे) भाजीही मुलांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. अरबीच्या गोल चकत्या कराव्यात, त्या पाण्यात उकडाव्याक आणि मग तळून मुलांना खायला द्याव्यात.

4. भोपळ्याची पोष्टिक पोळीपिष्टमय पदार्थांतून शरीराला सेरटोनिन नावाचे पोषकतत्त्व मिळते. योग्य प्रमाणात शरीराला सेरटोनिनचा पुरवठा झाल्यास मुलांचे मूड स्विंग्सचा समतोल योग्यरित्या सांभाळला जाऊ शकतो. शिवा, मुलं शांत आणि आनंदीदेखील राहतात. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स