शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पार्टनरच्या आयुष्यात तुमच्याशिवाय अजून कोणी असेल तर कसं ओळखाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 16:21 IST

रिलेशनशीपमध्ये असताना किंवा लग्न झालेलं असताना सुद्धा जेव्हा दोघाच्यामध्ये तिसरा व्यक्ती येतो.

(image credit- primetweet.com.ng)

रिलेशनशीपमध्ये असताना किंवा लग्न झालेलं असताना सुद्धा जेव्हा दोघांच्यामध्ये तिसरा व्यक्ती येतो तेव्हा अनेकदा  पार्टनर पासून लपवून ठेवलं जातं. अर्थात प्रत्येक  पुरूष किंवा महिलेने असं करण्यामागे वेगवेगळी कारणं असू शकतात. नात्यांमध्ये संशय नावाचा विचित्र प्रकार असतो. तो काही वेळेला खरा सुद्धा ठरत असतो. अनेक महिलांना असं वाटत असतं की आपल्या पतीचे आपल्यावर खूप प्रेम आहे किंवा आपला पती आपल्याशी एकनिष्ठ आहे. पण पत्नीवर प्रेम असताना देखील काहीवेळा इतर  महिेलेसोबत अफेअर असू शकतं.  जर तुम्हाला सुद्धा  असं वाटत असेल तर आज आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला कळेल की तुमच्या पार्टनरचं अफेअर आहे की नाही.

(Image credit-corish and co)

रिलेशनशीपमध्ये असलेल्या लोकांच्या वागण्यात जर बदल दिसून येत असेल तर त्यांचे अफेअर असू शकते. जर तुम्हाला असं वाटत असेल  की पार्टनरचं तुमच्याकडे लक्ष नाही. तर तुम्ही पार्टनरला क्रॉस चेक  करू शकता.  कारण तुमच्यापासून दूर जाण्याचं किंवा तुमच्याकडे लक्ष न देण्याचं कारण पार्टनरच्या आयुष्यात असलेला दुसरा व्यक्ती सुद्धा असू शकतो.  ( हे पण वाचा- तुमचा बॉयफ्रेंड अजूनही एक्स गर्लफ्रेंडशी बोलतो का हे कसं ओळखाल?)

(image credit-shesaid.com)

ऑफिसची किंवा कामाची वेळ संपल्यानंतर सुद्धा जर तुमचा पार्टनर लवकर घरी येत नसेल. सतत उशीरा येत असेल तर तुम्ही तुमच्या पार्टनरवर शंका घेऊ शकता. याशिवाय तुमचा पार्टनर जर घरी आल्यानंतर वेळ देत नसेल किंवा तुमच्याशी उद्धटपणे बोलत असेल तर याचा अर्थ असा होतो की पार्टनरचं तुमच्याकडे लक्ष नाही. घरी असताना सुद्धा जर तुमचा पार्टनर सतत फोनवर बोलत असेल  किंवा चॅटिंग चालू असेल तर  यामुळे तुमच्यात भांडण सुद्धा होऊ शकतात. पण अनेक घरांमध्ये पुरूष तासंनतास मोबाईलचा वापर करत असतात. पण पार्टनरला काहीही आक्षेप नसतो. 

पण जर तुमच्या पार्टनरचं बाहेर अफेअर असेल तर नातं तोडण्यासारखं यात काही नाही. असं सुद्धा असू शकतं की तुमचा पार्टनर काही  समस्यांमधून जात असेल. अशावेळी तुम्ही आपल्या पार्टनर सोबत बसून चर्चा करणं आवश्यक आहे. फक्त संशय आल्यानंतर तुम्ही कोणतीही मोठा निर्णय तडकाफडकी घेणे हे योग्य नाही. एका चांगल्या नात्यात मुलगा आणि मुलगी दोघांनीही आपलं नातं जपण्यासाठी काळजी घेणं गरजेचं असतं. त्यामुळे कारण नसताना संशय घेणं तुमच्या नात्यासाठी योग्य ठरणार नाही. ( हे पण वाचा - लग्नानंतर सुद्धा एक्सची आठवण येते? तर 'हा' फंडा वापरून नेहमी खूश रहा.)

टॅग्स :relationshipरिलेशनशिप