शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

'या' 5 कारणांमुळे नको असलेलं नातं जपण्यासाठी झटत राहतात महिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 17:01 IST

अनेकदा आपण ऐकतो की, लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात आणि नातं हे पृथ्वीवर निभावलं जातं. पण याच स्वर्गामध्ये बनलेल्या जोड्यांमध्ये आपापसात ताळमेळ नसेल तर हे नातं जास्त दिवस टिकत नाही.

(Image Credit : LovePanky)

अनेकदा आपण ऐकतो की, लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात आणि नातं हे पृथ्वीवर निभावलं जातं. पण याच स्वर्गामध्ये बनलेल्या जोड्यांमध्ये आपापसात ताळमेळ नसेल तर हे नातं जास्त दिवस टिकत नाही. अशातच विखुरलेलं नातं सावरण्यासाठी महिलांवर कळत नकळत एक प्रेशर येतं. जाणून घेऊया अशी कोणती 5 कारणं आहेत जी कोणत्याही महिलेला नात्यामध्ये तडजोड करण्यासाठी भाग पाडतात. 

(Image Credit : The Conversation)

कन्फ्यूजन 

मनसोपचार तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करुनही महिला आपल्या नात्याबाबत कन्फ्यूज राहतात. तसेच आपल्यासोबत होणारा त्रास आणि चुकीच्या वागणूकीसाठी त्या स्वतःलाच दोषी मानतात. ज्यामुळे त्यांच्या आतमध्ये लपलेला आत्मसन्मान कुठेतरी हरवून जातो आणि त्यांना असं वाटतं की, त्यांच्या जगण्याला काही अर्थच नाही.

 (Image Credit : Stylist)

लोकं काय म्हणतील?; याची भिती

अनेकदा महिला समाजाच्या भितीने किंवा लोकं काय म्हणतील याचा विचार करून आपलं नातं संपवत नाहीत. कितीही त्रास झाला तरिही त्या शेवटपर्यंत ते नातं टिकवण्याचा प्रयत्न करतात. एवढचं नाही तर अनेकदा त्या आपल्यासोबत होणाऱ्या चुकीच्या गोष्टींबाबत कोणालाही सांगणं टाळतात. 

(Image Credit : psychologytoday.com)

जोडीदार सुधारण्याची आशा 

अनेकदा असा समज असतो की, अशा नत्यामध्ये फक्त कमी शिकलेल्या महिलांच अडकतात. पण हा तुमचा गैरसमज आहे. शिकलेल्या आणि काम करणाऱ्या अनेक महिलाही नात्यामध्ये त्रास सहन करूनही ते नातं निभावत असतात. त्यांना नेहमी असं वाटत असतं की, जर त्या आपल्या जोडीदाराला सोडून निघून गेल्या तर त्यांचा जोडीदार पूर्णपणे तुटून जाईल. भावनांमध्ये गुंतून त्या वर्षानुवर्ष आपलं नातं निस्वार्थीपणे निभावत असतात. 

(Image Credit : DomesticShelters.org)

मुलांच्या भविष्यासाठी 

सिंगल पॅरेंट बनून मुलांची जबाबदारी निभावणं अत्यंत कठिण काम असतं. अशातच गोष्ट जेव्हा महिलांची असते. त्यावेळी त्यांच्या अडचणी आणखी वाढतात. अशातच आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी त्या स्वतःला या नात्यामध्ये बांधून घेतात. 

कुटुंबाचा दबाव 

आजही आपल्या देशामध्ये नातं तयार करणं आणि ते तोडणं अत्यंत अवघड आहे. जर एखादी महिला आपल्या नात्यामुळे खूश नसेल आणि त्यातून बाहेर येण्याचा विचार करत असेल तर तिच्या कुटुंबातील लोकं तिला ते नातं निभावण्याचा सल्ला देतात. अनेकदा कुटुंबातील लोक कुटुंब, समाज आणि मुलांची शपथ देऊन त्यांना आपलं नातं वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला देतात. 

आर्थिक स्थितीही ठरते कारण 

अनेकदा महिला आर्थिक स्वरूपात कमी असल्यामुळे आपल्या खर्चासाठी जोडीदारावर अवलंबून असतात. ज्या कारणामुळे त्रासदायक नात्यामध्ये राहणं त्यांना भाग पडतं. बऱ्याचदा महिला हादेखील विचार करतात की, जर त्या आपल्या पार्टनरला सोडून निघून गेल्या तर त्यांचं आणि त्यांच्या मुलांचं काय होईल? यांसारख्या विचारांनी हैराण होऊनच त्या नातं टिकवण्यासाठी सतत झटत राहतात. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. 

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप