शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

लग्न ठरल्यानंतर प्रत्येक मुलींनी 'या' गोष्टी लक्षात घेणे गरजेचे असते!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 5:02 PM

लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना असते. लग्नानंतर आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळते. मग ती मुलगी असो किंवा मुलगा. हा दोघांच्याही आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय असतो.

लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना असते. लग्नानंतर आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळते. मग ती मुलगी असो किंवा मुलगा. हा दोघांच्याही आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय असतो. लग्नानंतर मुलगी दुसऱ्याच्या घरी जाते आणि तिचे आयुष्य बदलून जाते. त्यांच्या आयुष्यात फार बदल होतात. संपूर्ण जग बदलून जाते. या साऱ्या गोष्टी सांभाळून त्यांना सर्वांची मने जिंकायची असतात. त्यामुळे लग्न ठरल्यानंतर मुलींनी काही गोष्टी प्रामुख्याने लक्षात घेणे गरजेचे असते.  

कुटुंबाला वेळ द्या -

लग्नानंतर मुलगी नवऱ्याच्या घरी जाते. त्यामुळे आई-वडिलांना जास्तीत जास्त वेळ द्या. कारण मुलगी कितीही मोठी झाली तरीही आई-वडिलांसाठी ती नेहमी लहानच रहाते. त्यामुळे लग्न ठरल्याचा आनंद त्यांना होतोच, पण आता आपली मुलगी आपल्यासोबत राहणार नाही, या विचाराने ते बऱ्याचदा व्याकूळही होतात. त्यामुळे त्यांना समजून घेऊन शक्य तेवढा वेळ त्यांना द्या.

जोडीदाराला समजून घ्या -

लग्न ठरल्यापासून ते लग्न होईपर्यंतचा काळ हा आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांपैकी एक असतो. दोघांना एका नव्या आयुष्याची सुरुवात करायची असते. त्यासाठी एकमेकांना समजून घेणे जास्त गरजेचे असते. त्यामुळे एकमेकांचे स्वभाव, आवडीनिवडी, भविष्याबाबतच्या चर्चा यांसारख्या गोष्टींना प्राधान्य द्या.

मित्र-परिवार - 

लग्नानंतर प्रत्येकाच्याच प्रायॉरिटी चेंज होतात. त्यामुळे मित्रमैत्रिणींना आधी जसा वेळ द्यायचात तसा आता देणे शक्य नसते. त्यामुळे त्यांनाही वेळ द्या. एकत्र येऊन पिकनिकचा प्लॅन करा. अथवा कुठेतरी फिरायला जा.

आर्थिक स्वातंत्र्य -

तुमच्या होणाऱ्या नवऱ्याचा पगार किती आहे याहीपेक्षा तुम्ही स्वतः आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणे गरजेचे असते. आता काळ बदलला असल्यामुळे बऱ्याच मुली स्वतःच्या पायावर उभ्या असतात. त्यामुळे आर्थिक गोष्टींबाबतही दोघांनी चर्चा करणे गरजेचे असते. 

जोडीदाराच्या कुटुंबियांचा आदर करावा -

लग्नानंतर तुम्ही जोडीदाराच्या घरी राहणार असता. त्यामुळे त्याच्यासोबतच त्याच्या कुटुंबियांनाही समजून घेणे गरजेचे असते. त्यांचा आदर करणे गरजेचे असते. असे केल्यामुळे तुम्ही त्यांच्या मनात तुमच्यासाठी जागा करू शकाल.  

टॅग्स :relationshipरिलेशनशिपmarriageलग्नFamilyपरिवार