शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

तक्रार अशी करा की ऐकली गेली पाहिजे, प्रश्नांचा करू नका भडीमार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 11:55 AM

पत्नीची नेहमी तक्रार असते की, पती त्यांना वेळ देत नाहीत आणि तेच पतीची तक्रार असते की, पत्नी जास्त खर्च करते. तशा या तक्रारी फारच सामान्य आहेत.

(Image Credit : www.rd.com)

पत्नीची नेहमी तक्रार असते की, पती त्यांना वेळ देत नाहीत आणि तेच पतीची तक्रार असते की, पत्नी जास्त खर्च करते. तशा या तक्रारी फारच सामान्य आहेत. पण काही गोष्टी अशा असतात ज्या सांगणे आणि समजून घेणे दोन्ही गरजेच्या असतात. जेणेकरून नातं चांगलं रहावं. अशा अनेक तक्रारी असतात ज्या मनाच्या एका कोपऱ्यात वर्षानुवर्षे असतात, पण कधी सांगू शकत नाहीत किंवा असं म्हणूया की, संधी मिळत नाही. नात्यांमध्ये तक्रारी होणे सामान्य बाब आहे. खासकरून तेव्हा जेव्हा नातं आयुष्यभरासाठी असतं. अशात तक्रारी या दूर करण्यातच फायदा असतो. त्यासाठी तक्रार निट ऐकून घेणे महत्त्वाचे आहे.

भावना व्यक्त करा

काही वाईट वाटलं असेल आणि बोलण्यात अडचण येत असेल तर या स्थितीतून बाहेर पडा. बोलणं गरजेचं आहे. मनात साचवून ठेवाल तर रागात साचलेलं सगळं बाहेर पडेल. मनातलं सांगून टाकणं नात्याच्या मजबूतीसाठी महत्त्वाचं असतं. त्यामुळे अशा वेळेचा शोध घ्या जेव्हा तुम्हाला दोघांनाही पुरेसा वेळ असेल. दोघांचाही मूड शांत असेल अशी वेळ निवडा. बोलण्याची सुरूवात शांतपणे करा. सामान्य भाषेत जे सांगायचं ते सांगा.

(Image Credit : www.rd.com)

काय करू नये - बोलण्याची सुरूवात करताच टिका, आरोप, चिडचिड करू नका. याने समोरची व्यक्ती एकतर निघून जाईल नाही तर संवाद वादात बदलेल. समोरच्याला हे वाटू देऊ नका की, तुम्ही त्याला दोष देताय, त्यांना असं वाटावं की, तुम्ही तुमच्या मनातलं त्याच्याशी बोलताय.

जे सांगायचं ते स्पष्ट सांगा

(Image Credit : amansquest.com)

तुम्ही जेव्हा बोलण्याची सुरूवात करता आणि पार्टनरला सांगता की, तुम्हाला त्यांच्या वागण्याबाबत कसं वाटतं, तेव्हा यावेळी स्पष्ट बोला. त्या गोष्टींबाबत सांगा ज्या तुम्हाला खटकतात. जेणेकरून समोरच्याला समजून घेऊ शकेल आणि आपल्या वागण्यात बदल आणू शकेल.

(Image Credit : www.bustle.com)

काय करू नये - हवेत गोष्टी केल्याने काहीही फायदा होत नाही. जे काही बोलायचंय किंवा सांगायचंय ते स्पष्ट असावं. तुम्ही समोरच्यावर दोषरोप करताय असं वाटायला नको.

जे मनात आहे ते बोला

(Image Credit : www.allrelationshipmatters.com.au)

जर तुम्हाला वाटत असेल की, समोरची व्यक्ती तुमच्या भावना समजू शकत नाही. तेव्हा मनातत्या मनात अंदाज बांधत बसण्यापेक्षा यावर मोकळेपणाने बोला. जर तुम्हाला वाटतं की, पतीने तुम्हाला वेळ द्यावा तर याबाबत त्यांना सांगा. पतीला जर वाटत असेल तर की, तुम्ही प्रत्येक गोष्टीतील लुडबूड कमी करावी किंवा प्रश्न कमी विचारावे तर या गोष्टीतही बदल व्हायला हवा. मनात जे आहे ते एकमेकांशी बोलणार नाही तर समस्येचं समाधान कसं निघणार? याचा विचार करा.

(Image Credit : www.mensstyle.com.au)

काय करू नये - मनात गैरसमज ठेवू नका. या गोष्टीची वाट बघू नका की, समोरची व्यक्ती बोलणं सुरू करेल. तक्रारींचा पेटारा जेवढ्या लवकर उघडाल तेवढ्या लवकर समस्या दूर होईल.

समस्या समजून घ्या

(Image Credit : thestir.cafemom.com)

आता बोलणं सुरू झालंच आहे तर हे जाणून घेणं गरजेचं आहे की, समस्या काय आहे. सोबतच हेही विचारा की, त्यांच्या वेगळ्या वागण्याचं कारण काय आहे. शांतपणे विचारलं तर तेही तुमच्यासमोर स्पष्टपणे बोलू शकतील. दोघांनीही समस्या समजून घेणं महत्त्वाचं आहे.

काय करू नये - समस्या जाणून घेताना प्रश्नांचा भडीमार करू नका. तसेच प्रश्न विचारल्यावर उत्तर देण्यासाठी समोरच्याला वेळ द्या. लागोपाठ प्रश्न विचारल्याने समोरच्या व्यक्तीची चिडचिड होणे स्वाभाविक आहे.

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप