शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

नातं अडचणीत आल्याचे संकेत आहेत पार्टनरमधील 'हे' ५ बदल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 11:42 IST

ज्या व्यक्तीवर तुम्ही सर्वात जास्त प्रेम करत असाल आणि त्याच्यावर विश्वास करत असाल अशा व्यक्तीच्या वागण्यात अचानक बदल झाला तर तुम्हाला विचित्र वाटत असतं.

आपणा सर्वांच्या आयुष्यात काही नाती फार खास असतात. प्रत्येक नात्यात काहीना काही कारणांनी छोट्या-मोठ्या तक्रारी होत असतात. पण ज्या व्यक्तीवर तुम्ही सर्वात जास्त प्रेम करत असाल आणि त्याच्यावर विश्वास करत असाल अशा व्यक्तीच्या वागण्यात अचानक बदल झाला तर तुम्हाला विचित्र वाटत असतं. अशावेळी तुम्हाला काही कळत नसतं आणि तुम्ही चुकीचे निर्णय घेता. त्यामुळे तुम्हाला तुमच्या पार्टनरमध्ये खालील काही बदल दिसत असतील तर समजा तुमचं नातं बिघडतंय. 

वागण्यात अचानक बदल

व्यक्तीच्या वागण्यात अचानक बदल होणे हा नातं अडचणीत येण्याचा संकेत आहे. पार्टनरचं तुमच्या बोलण्याकडे लक्ष नसणं. गंभीर गोष्टी ऐकूनही न ऐकल्यासारखं करणं, तुमच्या प्रश्नांवर उडवा-उडवीची उत्तरे देणं तसेच सतत चिडणं इत्यादी. याप्रकारची लक्षणे दिसत असतील तर नातं अडचणीत आहे असं समजा. 

प्रत्येक गोष्टीत लुडबूड करणं

तुमचं बोलणं लपून ऐकणं, तुमच्या व्हॉट्सअॅप किंवा फेसबुकवर लक्ष ठेवणं. तुमच्या ई-मेलवर लक्ष देणं हेही तुमचं नातं चुकीच्या मार्गाने जात असल्याचा संकेत आहे. अशावेळी त्या व्यक्तीसोबत रागाने वागण्यापेक्षा त्या व्यक्तीसोबत प्रेमाने आणि शांततेने बोलायला हवे. 

सतत भांडत राहणं

जर तुमचा पार्टनर छोट्या छोट्या गोष्टींवरुन तुमच्याशी भांडत असेल, तुम्हाला टोमणे मारत असेल तर या नात्यामध्ये दरी निर्माण होत असल्याचं समजा. विनाकारण चिडचिड करणे तेव्हाच होतं जेव्हा समोरच्यावर ती व्यक्ती रागावलेली असते. त्यामुळे सर्वातआधी ही गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करा की, तुमच्या पार्टनरला कोणती गोष्ट खटकते आहे.

विनाकारण वाद

नात्यांमध्ये वाद होत असतात. पण त्या वादाचं कारण शोधा आणि वाद दूर करण्याचा प्रयत्न करा. सर्वातआधी हे जाणून घ्या की, दोन व्यक्तींमध्ये वाद झाला असेल आणि एका वाद घालत असेल तर दुसऱ्याने शांत रहावं. प्रत्येक गोष्ट तर्क-वितर्क आणि वाद करु नका. कधी कधी गोष्टी ऐकून घेणंही चांगलं असतं. सोबतच एकमेकांच्या कमजोरीची खिल्ली उडवू नका आणि वाद होत असताना अशा गोष्टी काढूही नका. 

कसं वाचवावं नातं?

जर नात्यामध्ये असुरक्षिततेची भावना येत असेल आणि नातं कोणत्याही स्थितीत वाचवायचं असेल तर हे सगळं का होतंय याचं कारण शोधा. तुमच्या पार्टनरच्या समस्येचं कारण तुम्ही तर नाही ना? आपल्या सवयी, स्वभाव आणि लाइफस्टाइलवर नजर टाका. तुमचं काही चुकतंय का? याचा विचार करा. तुमच्या सवयींनी तर तुमच्या पार्टनरला असुरक्षित जाणवून दिले नाही ना? कारण शोधल्यास होऊ शकतं की, तुमच्या पार्टनरच्या अशा वागण्याला तुम्हीच जबाबदार असू शकता. कारण शोधल्यावर काही गैरसमज असतील तर दूर करुन नातं वाचवलं जाऊ शकतं.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट