शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

नातं अडचणीत आल्याचे संकेत आहेत पार्टनरमधील 'हे' ५ बदल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 11:42 IST

ज्या व्यक्तीवर तुम्ही सर्वात जास्त प्रेम करत असाल आणि त्याच्यावर विश्वास करत असाल अशा व्यक्तीच्या वागण्यात अचानक बदल झाला तर तुम्हाला विचित्र वाटत असतं.

आपणा सर्वांच्या आयुष्यात काही नाती फार खास असतात. प्रत्येक नात्यात काहीना काही कारणांनी छोट्या-मोठ्या तक्रारी होत असतात. पण ज्या व्यक्तीवर तुम्ही सर्वात जास्त प्रेम करत असाल आणि त्याच्यावर विश्वास करत असाल अशा व्यक्तीच्या वागण्यात अचानक बदल झाला तर तुम्हाला विचित्र वाटत असतं. अशावेळी तुम्हाला काही कळत नसतं आणि तुम्ही चुकीचे निर्णय घेता. त्यामुळे तुम्हाला तुमच्या पार्टनरमध्ये खालील काही बदल दिसत असतील तर समजा तुमचं नातं बिघडतंय. 

वागण्यात अचानक बदल

व्यक्तीच्या वागण्यात अचानक बदल होणे हा नातं अडचणीत येण्याचा संकेत आहे. पार्टनरचं तुमच्या बोलण्याकडे लक्ष नसणं. गंभीर गोष्टी ऐकूनही न ऐकल्यासारखं करणं, तुमच्या प्रश्नांवर उडवा-उडवीची उत्तरे देणं तसेच सतत चिडणं इत्यादी. याप्रकारची लक्षणे दिसत असतील तर नातं अडचणीत आहे असं समजा. 

प्रत्येक गोष्टीत लुडबूड करणं

तुमचं बोलणं लपून ऐकणं, तुमच्या व्हॉट्सअॅप किंवा फेसबुकवर लक्ष ठेवणं. तुमच्या ई-मेलवर लक्ष देणं हेही तुमचं नातं चुकीच्या मार्गाने जात असल्याचा संकेत आहे. अशावेळी त्या व्यक्तीसोबत रागाने वागण्यापेक्षा त्या व्यक्तीसोबत प्रेमाने आणि शांततेने बोलायला हवे. 

सतत भांडत राहणं

जर तुमचा पार्टनर छोट्या छोट्या गोष्टींवरुन तुमच्याशी भांडत असेल, तुम्हाला टोमणे मारत असेल तर या नात्यामध्ये दरी निर्माण होत असल्याचं समजा. विनाकारण चिडचिड करणे तेव्हाच होतं जेव्हा समोरच्यावर ती व्यक्ती रागावलेली असते. त्यामुळे सर्वातआधी ही गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करा की, तुमच्या पार्टनरला कोणती गोष्ट खटकते आहे.

विनाकारण वाद

नात्यांमध्ये वाद होत असतात. पण त्या वादाचं कारण शोधा आणि वाद दूर करण्याचा प्रयत्न करा. सर्वातआधी हे जाणून घ्या की, दोन व्यक्तींमध्ये वाद झाला असेल आणि एका वाद घालत असेल तर दुसऱ्याने शांत रहावं. प्रत्येक गोष्ट तर्क-वितर्क आणि वाद करु नका. कधी कधी गोष्टी ऐकून घेणंही चांगलं असतं. सोबतच एकमेकांच्या कमजोरीची खिल्ली उडवू नका आणि वाद होत असताना अशा गोष्टी काढूही नका. 

कसं वाचवावं नातं?

जर नात्यामध्ये असुरक्षिततेची भावना येत असेल आणि नातं कोणत्याही स्थितीत वाचवायचं असेल तर हे सगळं का होतंय याचं कारण शोधा. तुमच्या पार्टनरच्या समस्येचं कारण तुम्ही तर नाही ना? आपल्या सवयी, स्वभाव आणि लाइफस्टाइलवर नजर टाका. तुमचं काही चुकतंय का? याचा विचार करा. तुमच्या सवयींनी तर तुमच्या पार्टनरला असुरक्षित जाणवून दिले नाही ना? कारण शोधल्यास होऊ शकतं की, तुमच्या पार्टनरच्या अशा वागण्याला तुम्हीच जबाबदार असू शकता. कारण शोधल्यावर काही गैरसमज असतील तर दूर करुन नातं वाचवलं जाऊ शकतं.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट