शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
4
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
5
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
6
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
7
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
8
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
9
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
10
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
11
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
12
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
13
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
14
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
15
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
16
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
17
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
18
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
19
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
20
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 

नातं अडचणीत आल्याचे संकेत आहेत पार्टनरमधील 'हे' ५ बदल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 11:42 IST

ज्या व्यक्तीवर तुम्ही सर्वात जास्त प्रेम करत असाल आणि त्याच्यावर विश्वास करत असाल अशा व्यक्तीच्या वागण्यात अचानक बदल झाला तर तुम्हाला विचित्र वाटत असतं.

आपणा सर्वांच्या आयुष्यात काही नाती फार खास असतात. प्रत्येक नात्यात काहीना काही कारणांनी छोट्या-मोठ्या तक्रारी होत असतात. पण ज्या व्यक्तीवर तुम्ही सर्वात जास्त प्रेम करत असाल आणि त्याच्यावर विश्वास करत असाल अशा व्यक्तीच्या वागण्यात अचानक बदल झाला तर तुम्हाला विचित्र वाटत असतं. अशावेळी तुम्हाला काही कळत नसतं आणि तुम्ही चुकीचे निर्णय घेता. त्यामुळे तुम्हाला तुमच्या पार्टनरमध्ये खालील काही बदल दिसत असतील तर समजा तुमचं नातं बिघडतंय. 

वागण्यात अचानक बदल

व्यक्तीच्या वागण्यात अचानक बदल होणे हा नातं अडचणीत येण्याचा संकेत आहे. पार्टनरचं तुमच्या बोलण्याकडे लक्ष नसणं. गंभीर गोष्टी ऐकूनही न ऐकल्यासारखं करणं, तुमच्या प्रश्नांवर उडवा-उडवीची उत्तरे देणं तसेच सतत चिडणं इत्यादी. याप्रकारची लक्षणे दिसत असतील तर नातं अडचणीत आहे असं समजा. 

प्रत्येक गोष्टीत लुडबूड करणं

तुमचं बोलणं लपून ऐकणं, तुमच्या व्हॉट्सअॅप किंवा फेसबुकवर लक्ष ठेवणं. तुमच्या ई-मेलवर लक्ष देणं हेही तुमचं नातं चुकीच्या मार्गाने जात असल्याचा संकेत आहे. अशावेळी त्या व्यक्तीसोबत रागाने वागण्यापेक्षा त्या व्यक्तीसोबत प्रेमाने आणि शांततेने बोलायला हवे. 

सतत भांडत राहणं

जर तुमचा पार्टनर छोट्या छोट्या गोष्टींवरुन तुमच्याशी भांडत असेल, तुम्हाला टोमणे मारत असेल तर या नात्यामध्ये दरी निर्माण होत असल्याचं समजा. विनाकारण चिडचिड करणे तेव्हाच होतं जेव्हा समोरच्यावर ती व्यक्ती रागावलेली असते. त्यामुळे सर्वातआधी ही गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करा की, तुमच्या पार्टनरला कोणती गोष्ट खटकते आहे.

विनाकारण वाद

नात्यांमध्ये वाद होत असतात. पण त्या वादाचं कारण शोधा आणि वाद दूर करण्याचा प्रयत्न करा. सर्वातआधी हे जाणून घ्या की, दोन व्यक्तींमध्ये वाद झाला असेल आणि एका वाद घालत असेल तर दुसऱ्याने शांत रहावं. प्रत्येक गोष्ट तर्क-वितर्क आणि वाद करु नका. कधी कधी गोष्टी ऐकून घेणंही चांगलं असतं. सोबतच एकमेकांच्या कमजोरीची खिल्ली उडवू नका आणि वाद होत असताना अशा गोष्टी काढूही नका. 

कसं वाचवावं नातं?

जर नात्यामध्ये असुरक्षिततेची भावना येत असेल आणि नातं कोणत्याही स्थितीत वाचवायचं असेल तर हे सगळं का होतंय याचं कारण शोधा. तुमच्या पार्टनरच्या समस्येचं कारण तुम्ही तर नाही ना? आपल्या सवयी, स्वभाव आणि लाइफस्टाइलवर नजर टाका. तुमचं काही चुकतंय का? याचा विचार करा. तुमच्या सवयींनी तर तुमच्या पार्टनरला असुरक्षित जाणवून दिले नाही ना? कारण शोधल्यास होऊ शकतं की, तुमच्या पार्टनरच्या अशा वागण्याला तुम्हीच जबाबदार असू शकता. कारण शोधल्यावर काही गैरसमज असतील तर दूर करुन नातं वाचवलं जाऊ शकतं.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट