शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत खवळलेल्या समुद्रात पडून तरुणी बेपत्ता, भगवती किल्ल्यानजीकची घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 13:15 IST

अपघात की आत्महत्या हा प्रश्नच 

रत्नागिरी : शहरातील भगवती किल्ल्याजवळील पाणभुयार स्पॉटजवळ एक तरुणी खवळलेल्या समुद्रात पडून बेपत्ता झाली. ही तरुणी सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरुन पाण्यात पडली की तिने समुद्रात उडी घेत आत्महत्या केली, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. रविवार २९ जून रोजी दुपारी साडेबारा वाजता घडलेल्या या प्रकारानंतर सायंकाळी उशिरापर्यंत तिला शोधण्याचे सर्वच प्रयत्न अयशस्वी झाले. ती कोण आहे, याचा उलगडाही सायंकाळी उशिरापर्यंत झालेला नव्हता.सुटीच्या दिवशी भगवती किल्ल्याजवळ असलेली शिवसूष्टी पाहण्यासाठी स्थानिक लोकांसह बाहेरील पर्यटकांचीही मोठी गर्दी दिवसभर असते. रविवारी २९ जून रोजीही दुपारी येथे पर्यटकांची गर्दी होती. त्यावेळी २३ ते २५ वर्षीय तरुणी पाण-भुयार स्पॉटजवळ असलेल्या रेलिंगच्या पुढे जाऊन सेल्फी काढण्यात गुंग होती. सेल्फी काढताना तिने आपले चप्पल आणि स्कार्फ बाजूला काढून ठेवले होते. आजुबाजुला अन्य काही पर्यटकही निसर्गाचा आनंद लुटत असताना अचानक ती तरुणी अचानक सुमारे २०० ते २५० फूट खोल समुद्राच्या पाण्यात पडलेली दिसली.आजूबाजूच्या पर्यटकांनी आरडाओरडा करताच त्या ठिकाणी एकच गर्दी झाली. काहींनी शहर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु तत्पूर्वी ती तरुणी खवळलेल्या समुद्रात दिसेनाशी झाली.दरम्यान, या तरुणीचा शोध घेण्यासाठी रत्नदुर्ग माऊंटेनियर्स आणि एनडीआरएफच्या पथकाला बोलावण्यात आले. परंतु सोसाट्याचा वारा आणि खवळलेला समुद्र यामुळे त्या तरुणीचा शोध घेण्यात अडथळे येत आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत ही मोहीम सुरू होती.

धोकादायक ठिकाणी जाणे टाळारत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी संबंधित अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर, शहर पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर यांच्याशी चर्चा करुन त्यांना भविष्यात अशाप्रकारच्या घटना त्याठिकाणी घडू नयेत यासाठी काही उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या. तसेच नागरिकांनी पावसाळ्यात धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.

सोबत कोणीच नव्हते?ही तरुणी खाली पडल्यानंतर कोणीही तिच्याबाबत माहिती देण्यासाठी पुढे आले नाही. त्यामुळे ती तेथे एकटीच आली होती का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जर ती एकटीच आली होती तर तिने आत्महत्या केली आहे का, असा प्रश्नही केला जात आहे.