शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत खवळलेल्या समुद्रात पडून तरुणी बेपत्ता, भगवती किल्ल्यानजीकची घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 13:15 IST

अपघात की आत्महत्या हा प्रश्नच 

रत्नागिरी : शहरातील भगवती किल्ल्याजवळील पाणभुयार स्पॉटजवळ एक तरुणी खवळलेल्या समुद्रात पडून बेपत्ता झाली. ही तरुणी सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरुन पाण्यात पडली की तिने समुद्रात उडी घेत आत्महत्या केली, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. रविवार २९ जून रोजी दुपारी साडेबारा वाजता घडलेल्या या प्रकारानंतर सायंकाळी उशिरापर्यंत तिला शोधण्याचे सर्वच प्रयत्न अयशस्वी झाले. ती कोण आहे, याचा उलगडाही सायंकाळी उशिरापर्यंत झालेला नव्हता.सुटीच्या दिवशी भगवती किल्ल्याजवळ असलेली शिवसूष्टी पाहण्यासाठी स्थानिक लोकांसह बाहेरील पर्यटकांचीही मोठी गर्दी दिवसभर असते. रविवारी २९ जून रोजीही दुपारी येथे पर्यटकांची गर्दी होती. त्यावेळी २३ ते २५ वर्षीय तरुणी पाण-भुयार स्पॉटजवळ असलेल्या रेलिंगच्या पुढे जाऊन सेल्फी काढण्यात गुंग होती. सेल्फी काढताना तिने आपले चप्पल आणि स्कार्फ बाजूला काढून ठेवले होते. आजुबाजुला अन्य काही पर्यटकही निसर्गाचा आनंद लुटत असताना अचानक ती तरुणी अचानक सुमारे २०० ते २५० फूट खोल समुद्राच्या पाण्यात पडलेली दिसली.आजूबाजूच्या पर्यटकांनी आरडाओरडा करताच त्या ठिकाणी एकच गर्दी झाली. काहींनी शहर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु तत्पूर्वी ती तरुणी खवळलेल्या समुद्रात दिसेनाशी झाली.दरम्यान, या तरुणीचा शोध घेण्यासाठी रत्नदुर्ग माऊंटेनियर्स आणि एनडीआरएफच्या पथकाला बोलावण्यात आले. परंतु सोसाट्याचा वारा आणि खवळलेला समुद्र यामुळे त्या तरुणीचा शोध घेण्यात अडथळे येत आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत ही मोहीम सुरू होती.

धोकादायक ठिकाणी जाणे टाळारत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी संबंधित अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर, शहर पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर यांच्याशी चर्चा करुन त्यांना भविष्यात अशाप्रकारच्या घटना त्याठिकाणी घडू नयेत यासाठी काही उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या. तसेच नागरिकांनी पावसाळ्यात धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.

सोबत कोणीच नव्हते?ही तरुणी खाली पडल्यानंतर कोणीही तिच्याबाबत माहिती देण्यासाठी पुढे आले नाही. त्यामुळे ती तेथे एकटीच आली होती का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जर ती एकटीच आली होती तर तिने आत्महत्या केली आहे का, असा प्रश्नही केला जात आहे.