शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

रत्नागिरीत खवळलेल्या समुद्रात पडून तरुणी बेपत्ता, भगवती किल्ल्यानजीकची घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 13:15 IST

अपघात की आत्महत्या हा प्रश्नच 

रत्नागिरी : शहरातील भगवती किल्ल्याजवळील पाणभुयार स्पॉटजवळ एक तरुणी खवळलेल्या समुद्रात पडून बेपत्ता झाली. ही तरुणी सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरुन पाण्यात पडली की तिने समुद्रात उडी घेत आत्महत्या केली, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. रविवार २९ जून रोजी दुपारी साडेबारा वाजता घडलेल्या या प्रकारानंतर सायंकाळी उशिरापर्यंत तिला शोधण्याचे सर्वच प्रयत्न अयशस्वी झाले. ती कोण आहे, याचा उलगडाही सायंकाळी उशिरापर्यंत झालेला नव्हता.सुटीच्या दिवशी भगवती किल्ल्याजवळ असलेली शिवसूष्टी पाहण्यासाठी स्थानिक लोकांसह बाहेरील पर्यटकांचीही मोठी गर्दी दिवसभर असते. रविवारी २९ जून रोजीही दुपारी येथे पर्यटकांची गर्दी होती. त्यावेळी २३ ते २५ वर्षीय तरुणी पाण-भुयार स्पॉटजवळ असलेल्या रेलिंगच्या पुढे जाऊन सेल्फी काढण्यात गुंग होती. सेल्फी काढताना तिने आपले चप्पल आणि स्कार्फ बाजूला काढून ठेवले होते. आजुबाजुला अन्य काही पर्यटकही निसर्गाचा आनंद लुटत असताना अचानक ती तरुणी अचानक सुमारे २०० ते २५० फूट खोल समुद्राच्या पाण्यात पडलेली दिसली.आजूबाजूच्या पर्यटकांनी आरडाओरडा करताच त्या ठिकाणी एकच गर्दी झाली. काहींनी शहर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु तत्पूर्वी ती तरुणी खवळलेल्या समुद्रात दिसेनाशी झाली.दरम्यान, या तरुणीचा शोध घेण्यासाठी रत्नदुर्ग माऊंटेनियर्स आणि एनडीआरएफच्या पथकाला बोलावण्यात आले. परंतु सोसाट्याचा वारा आणि खवळलेला समुद्र यामुळे त्या तरुणीचा शोध घेण्यात अडथळे येत आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत ही मोहीम सुरू होती.

धोकादायक ठिकाणी जाणे टाळारत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी संबंधित अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर, शहर पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर यांच्याशी चर्चा करुन त्यांना भविष्यात अशाप्रकारच्या घटना त्याठिकाणी घडू नयेत यासाठी काही उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या. तसेच नागरिकांनी पावसाळ्यात धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.

सोबत कोणीच नव्हते?ही तरुणी खाली पडल्यानंतर कोणीही तिच्याबाबत माहिती देण्यासाठी पुढे आले नाही. त्यामुळे ती तेथे एकटीच आली होती का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जर ती एकटीच आली होती तर तिने आत्महत्या केली आहे का, असा प्रश्नही केला जात आहे.