शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

महागाईमुळे यावर्षी लाडका बाप्पाही महागला!

By admin | Updated: July 16, 2017 18:23 IST

गणेशमूर्तीशाळांमध्ये मात्र सध्या कामाची लगबग

आॅनलाईन लोकमतरत्नागिरी , दि. १५ : वर्षभर ज्यांच्या आगमनाची प्रतीक्षा असते, त्या बाप्पांचे आगमन दि. २५ आॅगस्ट रोजी होणार आहे. गणेशोत्सवाला जेमतेम महिना शिल्लक राहिला असला, तरी गणेशमूर्तीशाळांमध्ये मात्र सध्या कामाची लगबग सुरू आहे. कोकणात घरोघरी गणेशमूर्ती आणून गणेशोत्सव साजरा केला जातो. बहुतांश मूर्तीकारांनी अक्षय्यतृतीयेच्या मुहुर्तावर माती भिजवून मूर्तीकामाचा शुभारंभ केला. कोकणात प्रामुख्याने शाडूच्या गणेशमूर्ती तयार केल्या जातात. ही शाडूची माती गुजरात राज्यातील भावनगर येथून मागवली जाते. भावनगरहून पेण येथे ही माती आयात केल्यानंतर महाराष्ट्रभर या मातीचे वितरण केले जाते. सध्या इंधनाच्या वाढत्या दरामुळे वाहतूक खर्च वाढला असल्याने शाडू मातीच्या दरातही वाढ झाली आहे.

गतवर्षी शाडू मातीचे पोते ३०० ते ३२५ रूपये दराने विकण्यात येत होते. यावर्षी त्याच पोत्याची विक्री ३५० ते ४०० रूपये दराने सुरू आहे.याच भिजवलेल्या मातीचा गोळा साच्यात ठेवून त्याला सुंदर गणेशमूर्तीचा आकार देण्यात येतो. मूर्तीवरील कोरीव काम, सुबक रंगकाम करण्यासाठी कुशल कारागिरांची आवश्यकता असते. कोकणातील ग्रामीण भागात सध्या कारागिरांची उणीव भासत आहे. शेतीची कामेही सुरू असल्याने मजूर नियमित येत नाहीत. मजुरी दरातील वाढ तसेच रंगाचे दरात झालेली वाढ यामुळे गणेशमूर्तीच्या दरावर परिणाम होणार आहे.

गणपतीबाप्पा सर्वाचा लाडका देव असल्याने भक्त त्याला विविध रूपांमध्ये पाहणे पसंत करतो. मुंबईतला गणेशोत्सव सर्वांना भूरळ घालत असल्याने तेथील विविध आकारातील, रूपातील आकर्षक मूर्तीे फोटोच्या स्वरूपात किंवा व्हॉट्सअ‍ॅप, मोबाईलद्वारे फोटो पाठवून मूर्ती तयार करण्यास सांगण्यात येत आहे. इंटरनेटवरील सोशल साईटस्द्वारे कार्टुन्सपासून पौराणिक कथेतील अर्जुन, परशुराम, महादेव, बालगणेश, हनुमान तसेच जय मल्हार, बाहुबली या रुपातील गणेशमूर्ती तयार करण्यासाठी ग्राहक आग्रही असल्याचे दिसून येत आहे.

घरगुती गणेशमूर्ती सव्वा इंचापासून ते साडेतीन चार फुटापर्यंत तर सार्वजनिक गणेशमूर्ती या चार फुटापासून दहा ते बारा फूट उंचीच्या तयार केल्या जात आहेत. काही मूर्तीकारांनी शाडूची माती महाग पडत असल्याने लाल चिकण मातीचा वापर सुरू केला आहे. शाडू मातीपासून तयार करण्यात आलेल्या मूर्ती वाळण्यास जास्त दिवस जात असल्यामुळे मूर्तीकार सध्या कामात व्यस्त आहेत.

लाल मातीची असो वा शाडूची मूर्ती ती पाण्यात लवकर विरघळते. या मातीपासून कोणतेही प्रदूषण होत नसल्याने त्यापासून गणपती तयार करण्यात येत आहेत. लाल मातीतील कठीण गुणधर्मामुळे मूर्ती चांगली बनत असल्यामुळे बहुतांश कारखानदारही लाल मातीचा वापर करू लागले आहेत.