शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
4
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
5
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
6
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
7
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
8
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
9
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
10
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
11
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
12
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
13
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
14
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
15
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
16
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
17
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
18
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
19
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
20
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...

ज्यांना मते दिलीत ते कुठे गेले आता?, मंत्री उदय सामंतांचा सवाल; रत्नागिरीत वक्फ मंडळ कार्यालयाचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 12:09 IST

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आणि देशाचे संविधान बदलले जाणार आहे याबद्दल ज्यांनी तुमच्या मनात विष पेरले आणि ...

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आणि देशाचे संविधान बदलले जाणार आहे याबद्दल ज्यांनी तुमच्या मनात विष पेरले आणि त्यामुळेच तुम्ही ज्यांना मते दिलीत ते उद्धवसेना आणि काँग्रेसचे लोक आज कोठे आहेत, असा प्रश्न उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केला. वक्फ मंडळाच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग कार्यालयाचे उद्घाटन सामाजिक न्याय भवन येथे मंत्री सामंत यांच्या हस्ते झाले.उदय सामंत म्हणाले, तुम्हाला जसा मशिदीचा अभिमान आहे, तसा मला मंदिराचा अभिमान आहे. प्रत्येकाला तो असतो. पण, लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आपण कधीही जातपात, धर्म पाहून काम करत नाही. मच्छीमार असोत किंवा अन्य कोणी, सर्वांच्या समस्या सोडविण्यावर माझा भर असतो. यावेळी त्यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. ज्यांना तुम्ही मते दिलीत, त्यांचा एकही पदाधिकारी, कार्यकर्ता वक्फ मंडळ कार्यालयाचे उद्घाटन होताना फिरकलासुद्धा नाही, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

तुमच्या मनात मुद्दाम विष पेरण्यात आलेउदय सामंत म्हणाले, तुमच्या मनात मुद्दाम विष पेरण्यात आले आहे. आता मोदी पंतप्रधान होऊन बरेच दिवस झाले. एकतरी मुसलमान बांधव देशाबाहेर गेला का? तुमच्यामध्ये जाणीवपूर्वक गैरसमज पसरवले जात आहेत. मात्र, तसे काही मनात ठेवू नका. आपण तुमच्या समस्यांसाठी नेहमी उभे असू, असेही ते म्हणाले.

मंडळाचे काम सहा महिन्यांपूर्वीच सुरूआज मंडळाचे उद्घाटन होत असल्याचे जे लोक सांगत आहेत, त्यांचा अभ्यास थोडा कमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी दिलेल्या पाठबळामुळे मंडळ सहा महिन्यांपूर्वीच सुरू झाले आहे. या कार्यालयातील अंतर्गत सजावटीचे काम आता पूर्ण झाले आहे. त्याचे उद्घाटन आज करण्यात आले, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतMuslimमुस्लीमcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना