शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

पाऊस लांबला, रत्नागिरीतील धरणांतील पाणीसाठा घटला; पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची भीती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 15:23 IST

जिल्ह्यातील तीन मध्यम पाटबंधारे तलावांसह ६७ लघू पाटबंधारे प्रकल्पांतील पाणीसाठा घटला

रत्नागिरी : मान्सूनचे आगमन लांबत असल्याने त्याचा परिणाम जिल्ह्यातील पाण्याचा साठ्यांवर हाेत आहे. पावसाअभावी पाणीसाठा कमी हाेत चालला आहे. जिल्ह्यातील तीन मध्यम पाटबंधारे तलावांसह ६७ लघू पाटबंधारे प्रकल्पांतील पाणीसाठा घटला आहे. सध्या पाणी साठ्याच्या सरासरी २३ टक्के साठा धरण क्षेत्रात शिल्लक आहे.जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यानंतर बिपरजॉय चक्रीवादळामुळे पावसाच्या आगमनावर परिणाम झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात २१ जूनपासून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, तोपर्यंत उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. आतापर्यंत २० दिवसांत जिल्ह्यात सरासरी ५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यातील धरण क्षेत्रात पडलेल्या पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे.उष्म्यामुळे धरण क्षेत्रातील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होते. त्यामुळे साठाही कमी होत आहे. कोयनेसारख्या धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे पात्र कोरडे झाले आहे. तशीच परिस्थिती जिल्ह्यातील अनेक धरणांमध्ये दिसत आहे. मध्यम प्रकल्पात नातूवाडीमध्ये ६.२३६ दशलक्ष घनमीटर, गडनदीमध्ये ५५.७०५ दशलक्ष घनमीटर, अर्जुना प्रकल्पात ५६.६७४ दशलक्ष घनमीटर, मुचकुुंदीमध्ये १४.६० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. नातूवाडीत प्रकल्पात एकूण साठ्याच्या २२.९० टक्केच पाणी उपलब्ध आहे.प्रकल्पाच्या पाण्यावर नळपाणी योजनांचे स्रोत अवलंबून असतात. धरणातील पाणी कमी होऊ लागले की ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम हाेताे. अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. सध्या जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचे आगमन अजून लांबल्यास पाणीटंचाईची तीव्रता अधिक वाढण्याची भीती व्यक्त हाेत आहे.

दहा टक्क्यांपेक्षा कमी साठा असलेली दहा धरणे आहेत. त्याचबराेबर धरणातील शून्य पाणीसाठा असलेल्या धरणांमध्ये चिंचाळी, सुकोंडी, टांगर, तिवरे, तेलेवाडी, केळंबा, हर्देखळे, पन्हाळे, कोंडगे, कशेळी, परुळे, गोपाळवाडी, जुवाटी, कोेंडवाडी यांचा समावेश आहे.

नद्यांमधीलही पाणी घटले(सध्याची पाणी पातळी मीटरमध्ये)जगबुडी - ३.४०वाशिष्ठी - ०.९०शास्त्री - ०.२०साेनवी - ०.००काजळी - ११.१८काेदवली - १.४०मुचकुंदी - ०.१०बावनदी - ०.९५

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDamधरणWaterपाणी