शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

पाऊस लांबला, रत्नागिरीतील धरणांतील पाणीसाठा घटला; पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची भीती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 15:23 IST

जिल्ह्यातील तीन मध्यम पाटबंधारे तलावांसह ६७ लघू पाटबंधारे प्रकल्पांतील पाणीसाठा घटला

रत्नागिरी : मान्सूनचे आगमन लांबत असल्याने त्याचा परिणाम जिल्ह्यातील पाण्याचा साठ्यांवर हाेत आहे. पावसाअभावी पाणीसाठा कमी हाेत चालला आहे. जिल्ह्यातील तीन मध्यम पाटबंधारे तलावांसह ६७ लघू पाटबंधारे प्रकल्पांतील पाणीसाठा घटला आहे. सध्या पाणी साठ्याच्या सरासरी २३ टक्के साठा धरण क्षेत्रात शिल्लक आहे.जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यानंतर बिपरजॉय चक्रीवादळामुळे पावसाच्या आगमनावर परिणाम झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात २१ जूनपासून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, तोपर्यंत उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. आतापर्यंत २० दिवसांत जिल्ह्यात सरासरी ५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यातील धरण क्षेत्रात पडलेल्या पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे.उष्म्यामुळे धरण क्षेत्रातील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होते. त्यामुळे साठाही कमी होत आहे. कोयनेसारख्या धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे पात्र कोरडे झाले आहे. तशीच परिस्थिती जिल्ह्यातील अनेक धरणांमध्ये दिसत आहे. मध्यम प्रकल्पात नातूवाडीमध्ये ६.२३६ दशलक्ष घनमीटर, गडनदीमध्ये ५५.७०५ दशलक्ष घनमीटर, अर्जुना प्रकल्पात ५६.६७४ दशलक्ष घनमीटर, मुचकुुंदीमध्ये १४.६० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. नातूवाडीत प्रकल्पात एकूण साठ्याच्या २२.९० टक्केच पाणी उपलब्ध आहे.प्रकल्पाच्या पाण्यावर नळपाणी योजनांचे स्रोत अवलंबून असतात. धरणातील पाणी कमी होऊ लागले की ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम हाेताे. अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. सध्या जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचे आगमन अजून लांबल्यास पाणीटंचाईची तीव्रता अधिक वाढण्याची भीती व्यक्त हाेत आहे.

दहा टक्क्यांपेक्षा कमी साठा असलेली दहा धरणे आहेत. त्याचबराेबर धरणातील शून्य पाणीसाठा असलेल्या धरणांमध्ये चिंचाळी, सुकोंडी, टांगर, तिवरे, तेलेवाडी, केळंबा, हर्देखळे, पन्हाळे, कोंडगे, कशेळी, परुळे, गोपाळवाडी, जुवाटी, कोेंडवाडी यांचा समावेश आहे.

नद्यांमधीलही पाणी घटले(सध्याची पाणी पातळी मीटरमध्ये)जगबुडी - ३.४०वाशिष्ठी - ०.९०शास्त्री - ०.२०साेनवी - ०.००काजळी - ११.१८काेदवली - १.४०मुचकुंदी - ०.१०बावनदी - ०.९५

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDamधरणWaterपाणी