शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

रत्नागिरी शहरावर पाणीसंकटाचे ढग, आठवड्यातून दोन दिवस पाणी कपातीचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 12:42 IST

नागरिकांना यापुढे काटकसरीने पाण्याचा वापर करावा लागणार

रत्नागिरी : रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या शीळ धरणातीलपाणीसाठा कमी झाल्याने शहरवासीयांना आतापासूनच पाणी संकटाला सामोरे जावे लागणार आहे. रत्नागिरी नगर परिषदेने आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना यापुढे काटकसरीने पाण्याचा वापर करावा लागणार आहे.

शीळ धरणाची साठवण क्षमता ४.३७१ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात २.०८२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता. हाच पाणीसाठा सध्या १.८२८ दशलक्ष घनमीटर इतका आहे. शहरात १० हजार नळजोडण्या असून, दररोज रत्नागिरी शहराला १८ ते १९ दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा केला जातो. नियमित तेवढाच पाणीपुरवठा सुरू असला तरी आठवड्यातून दोन दिवस कपात केली तरच पाणीसाठा पुरणार आहे.पाण्याचे योग्य नियोजन झाले नाही तर पावसाळा सुरू होईपर्यंत धरणातील पाणी पुरणे अशक्य आहे. त्यामुळे आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दर सोमवारी व गुरुवारी शहराला पाणीपुरवठा करण्यात येणार नसल्याने नागरिकांवर पाण्याचा वापर जपून करण्याची वेळ आली आहे.

‘अल-निनो’ या समुद्र प्रवाहाच्या सक्रियतेचा मान्सूनवर मोठा परिणाम झाल्याने सरासरी पर्जन्यमानापेक्षा गतवर्षी कमी पाऊस झाला. त्यामुळे शीळ धरणात पाणीसाठा कमी आहे. उष्म्यामुळे बाष्पीभवन होत असल्याने पाणीपातळी झपाट्याने घटत आहे. पाणीटंचाईवर मात करताना, मान्सून सुरू होईपर्यंत धरणातील शिल्लक पाणीसाठा पुरविण्याचे आव्हान नगर परिषद प्रशासनासमाेर आहे. पाणी कपातीचे नियोजन झाले नाही तर पावसाळा सुरू होईपर्यंत धरणातील पाणी पुरणे अशक्य आहे.

शीळ धरणामध्ये असलेला शिल्लक पाणीसाठा पावसाळा सुरू होईपर्यंत शहरवासीयांना पुरविण्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे. म्हणून आता आठवड्यातून दोन दिवस म्हणजेच सोमवार आणि गुरुवार असा दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून नगर परिषदेला सहकार्य करावे. - तुषार बाबर, मुख्याधिकारी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणीDamधरण