शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

रत्नागिरी शहरावर पाणीसंकटाचे ढग, आठवड्यातून दोन दिवस पाणी कपातीचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 12:42 IST

नागरिकांना यापुढे काटकसरीने पाण्याचा वापर करावा लागणार

रत्नागिरी : रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या शीळ धरणातीलपाणीसाठा कमी झाल्याने शहरवासीयांना आतापासूनच पाणी संकटाला सामोरे जावे लागणार आहे. रत्नागिरी नगर परिषदेने आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना यापुढे काटकसरीने पाण्याचा वापर करावा लागणार आहे.

शीळ धरणाची साठवण क्षमता ४.३७१ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात २.०८२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता. हाच पाणीसाठा सध्या १.८२८ दशलक्ष घनमीटर इतका आहे. शहरात १० हजार नळजोडण्या असून, दररोज रत्नागिरी शहराला १८ ते १९ दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा केला जातो. नियमित तेवढाच पाणीपुरवठा सुरू असला तरी आठवड्यातून दोन दिवस कपात केली तरच पाणीसाठा पुरणार आहे.पाण्याचे योग्य नियोजन झाले नाही तर पावसाळा सुरू होईपर्यंत धरणातील पाणी पुरणे अशक्य आहे. त्यामुळे आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दर सोमवारी व गुरुवारी शहराला पाणीपुरवठा करण्यात येणार नसल्याने नागरिकांवर पाण्याचा वापर जपून करण्याची वेळ आली आहे.

‘अल-निनो’ या समुद्र प्रवाहाच्या सक्रियतेचा मान्सूनवर मोठा परिणाम झाल्याने सरासरी पर्जन्यमानापेक्षा गतवर्षी कमी पाऊस झाला. त्यामुळे शीळ धरणात पाणीसाठा कमी आहे. उष्म्यामुळे बाष्पीभवन होत असल्याने पाणीपातळी झपाट्याने घटत आहे. पाणीटंचाईवर मात करताना, मान्सून सुरू होईपर्यंत धरणातील शिल्लक पाणीसाठा पुरविण्याचे आव्हान नगर परिषद प्रशासनासमाेर आहे. पाणी कपातीचे नियोजन झाले नाही तर पावसाळा सुरू होईपर्यंत धरणातील पाणी पुरणे अशक्य आहे.

शीळ धरणामध्ये असलेला शिल्लक पाणीसाठा पावसाळा सुरू होईपर्यंत शहरवासीयांना पुरविण्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे. म्हणून आता आठवड्यातून दोन दिवस म्हणजेच सोमवार आणि गुरुवार असा दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून नगर परिषदेला सहकार्य करावे. - तुषार बाबर, मुख्याधिकारी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणीDamधरण