शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

रत्नागिरी शहरावर पाणीसंकटाचे ढग, आठवड्यातून दोन दिवस पाणी कपातीचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 12:42 IST

नागरिकांना यापुढे काटकसरीने पाण्याचा वापर करावा लागणार

रत्नागिरी : रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या शीळ धरणातीलपाणीसाठा कमी झाल्याने शहरवासीयांना आतापासूनच पाणी संकटाला सामोरे जावे लागणार आहे. रत्नागिरी नगर परिषदेने आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना यापुढे काटकसरीने पाण्याचा वापर करावा लागणार आहे.

शीळ धरणाची साठवण क्षमता ४.३७१ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात २.०८२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता. हाच पाणीसाठा सध्या १.८२८ दशलक्ष घनमीटर इतका आहे. शहरात १० हजार नळजोडण्या असून, दररोज रत्नागिरी शहराला १८ ते १९ दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा केला जातो. नियमित तेवढाच पाणीपुरवठा सुरू असला तरी आठवड्यातून दोन दिवस कपात केली तरच पाणीसाठा पुरणार आहे.पाण्याचे योग्य नियोजन झाले नाही तर पावसाळा सुरू होईपर्यंत धरणातील पाणी पुरणे अशक्य आहे. त्यामुळे आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दर सोमवारी व गुरुवारी शहराला पाणीपुरवठा करण्यात येणार नसल्याने नागरिकांवर पाण्याचा वापर जपून करण्याची वेळ आली आहे.

‘अल-निनो’ या समुद्र प्रवाहाच्या सक्रियतेचा मान्सूनवर मोठा परिणाम झाल्याने सरासरी पर्जन्यमानापेक्षा गतवर्षी कमी पाऊस झाला. त्यामुळे शीळ धरणात पाणीसाठा कमी आहे. उष्म्यामुळे बाष्पीभवन होत असल्याने पाणीपातळी झपाट्याने घटत आहे. पाणीटंचाईवर मात करताना, मान्सून सुरू होईपर्यंत धरणातील शिल्लक पाणीसाठा पुरविण्याचे आव्हान नगर परिषद प्रशासनासमाेर आहे. पाणी कपातीचे नियोजन झाले नाही तर पावसाळा सुरू होईपर्यंत धरणातील पाणी पुरणे अशक्य आहे.

शीळ धरणामध्ये असलेला शिल्लक पाणीसाठा पावसाळा सुरू होईपर्यंत शहरवासीयांना पुरविण्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे. म्हणून आता आठवड्यातून दोन दिवस म्हणजेच सोमवार आणि गुरुवार असा दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून नगर परिषदेला सहकार्य करावे. - तुषार बाबर, मुख्याधिकारी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणीDamधरण