शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
11
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
12
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
13
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
14
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
15
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
16
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
17
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
18
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
19
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
20
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती

विधानसभा निवडणूक- इनकमिंगवरील श्रद्धेमुळे सर्वच पक्षांची सबुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:33 PM

विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्या असल्या तरी उमेदवार निवडीबाबत राजकीय पक्षांमध्ये अजून शांतताच आहे. या निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात पक्षांतरे अपेक्षित आहेत. या पक्षांतरावर श्रद्धा असल्याने उमेदवार निवडीबाबत राजकीय पक्षांनी सबुरी ठेवली आहे. या पक्षांतरांमुळे काही पक्षांचे उमेदवार बदलणार आहेत आणि काही उमेदवारांचे पक्ष बदलणार आहेत.

ठळक मुद्दे विधानसभा निवडणूक- इनकमिंगवरील श्रद्धेमुळे सर्वच पक्षांची सबुरी युतीचे दरवाजे अनेकांसाठी खुले

रत्नागिरी : विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्या असल्या तरी उमेदवार निवडीबाबत राजकीय पक्षांमध्ये अजून शांतताच आहे. या निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात पक्षांतरे अपेक्षित आहेत. या पक्षांतरावर श्रद्धा असल्याने उमेदवार निवडीबाबत राजकीय पक्षांनी सबुरी ठेवली आहे. या पक्षांतरांमुळे काही पक्षांचे उमेदवार बदलणार आहेत आणि काही उमेदवारांचे पक्ष बदलणार आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, गुहागर आणि दापोली या पाचही विधानसभा मतदार संघांमध्ये पक्षांतराच्या जोरदार हालचाली आहेत. काँग्रेस आघाडीमध्ये राजापूरची जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे. तेथे राष्ट्रवादीचे अजित यशवंतराव इच्छुक आहेत. त्यामुळे अजित यशवंतराव यांना काँग्रेसमध्ये घ्यावे, अशी मागणी काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी रत्नागिरीतील एका बैठकीत केली आहे.

याखेरीज राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव, आमदार संजय कदम यांच्याबाबतही पक्षांतराच्या मोठ्या चर्चा सुरू आहेत. भास्कर जाधव हे शिवसेनेत, तर संजय कदम भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. या दोन्ही आमदारांनी अजून त्यावर कोणतेही भाष्य केलेले नाही.अनेक नेत्यांच्या पक्षांतराबाबतची बोलणी सुरू असल्याने राजकीय पक्षांनी उमेदवार निवडीबाबत अजून कोणत्याही हालचाली केलेल्या नाहीत. प्रत्येक मतदारसंघात अशा घडामोडी घडण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे प्रचार नेमका कोणाचा करायचा, याबाबत कार्यकर्तेही अजून संभ्रमातच आहेत.पक्षांतराची चर्चाशिवसेना-भाजपची युती होण्याची शक्यता कमी असल्याने जर-तरच्या चर्चांना राजकीय वर्तुळात अधिक रंगत आली आहे. युती झाली तरी मतदारसंघ वाटपात काय होणार आणि त्याचे उमेदवार निवडीवर काय परिणाम होणार, याच्या चर्चाही जोर धरत आहेत. इच्छुकांनी मात्र मतदार संघात दौरे वाढवले असून, छोट्या-मोठ्या कार्यक्रमांनाही ते हजेरी लावू लागले आहेत.युती स्वबळ आजमावेलशिवसेना आणि भाजपमध्ये दाखल झालेल्या अन्य पक्षातील लोकांची संख्या आणि त्यांना विधानसभा निवडणुकीत द्यावयाची उमेदवारी यामुळे दोन्ही पक्ष स्वबळावर रिंगणात उतरतील, अशी अपेक्षा आहे. स्वबळाच्या लढाईत अजूनही अनेक पक्षांतरे होणे अपेक्षित आहे. त्यासाठीच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे विधानसभेची तयारी कोणीच सुरू केलेली नाही. 

टॅग्स :PoliticsराजकारणRatnagiriरत्नागिरी