शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

भाज्या, फळे मुबलक, दर मात्र ‘जैसे थे’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:35 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आहे. बाजारात सर्व प्रकारच्या भाज्या, फळे मुबलक स्वरूपात उपलब्ध आहेत. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आहे. बाजारात सर्व प्रकारच्या भाज्या, फळे मुबलक स्वरूपात उपलब्ध आहेत. घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असल्याने फळांबरोबर सुका मेव्यालाही वाढती मागणी आहे.

गणेशोत्सव घरोघरी साजरा करण्यात येत असल्यामुळे सध्या बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. किराणा मालाच्या दुकानांतून तेल, साखर यासाठी विशेष मागणी होत आहे. गणेशोत्सवात श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात येते. कोरोनामुळे गेल्यावर्षीपासून पूजेचे स्वरूप घरगुती ठेवण्यात येत असले तरी लागणारे साहित्य खरेदी करण्यात येत आहे. मोदकाचे तयार पीठ, गूळ, वेलची यासह प्रसादासाठी साखर फुटाणे, खडीसाखर, सुका मेवा यांची खरेदी सुरू आहे.

बाजारात सध्या सर्वप्रकारच्या भाज्या व फळे मुबलक स्वरुपात उपलब्ध आहेत. बहुतांश भाज्या ६० ते ७० रुपये, फळांचे दर १०० ते २५०च्या घरात आहेत. देशी सफरचंदाची आवक मोठ्या प्रमाणात झाली असून, दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत.

गावठी भाज्यांसह काकडी, चिबूड, दुधी भोपळे बाजारात उपलब्ध आहेत. मुळा, माठ पालेभाज्यांसह भेंडी, कारली, गवार, पडवळ, दोडके, वालीच्या शेंगा, दुधी भोपळा विक्रीसाठी आले आहेत. ग्राहकांकडून गावठी भाज्यांची प्राधान्याने खरेदी केली जात आहे. चिबूड, काकडी नगावर विक्री होत असली तरी आकारानुसार दर सांगण्यात येत आहेत.

बाजारात कांदा २५ ते ३० रुपये तर बटाटा २२ ते २५ रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. बटाटा शंभर रुपयांना पाच किलो दराने विकण्यात येत आहे. लसूणची विक्री ५० रुपये किलाेने सुरू आहे.

बाजारात देशी सफरचंद मुबलक स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आकाराने लहान असलेली सफरचंद ६० ते १०० रुपये किलो दराने विकण्यात येत आहेत. दर सर्वसामान्यांच्या आवाक्यातील असून, सफरचंदासाठी वाढती मागणी आहे.

भाज्यांच्या दरात सतत चढ-उतार सुरू असतो. गावठी भाज्याही बाजारात उपलब्ध होऊ लागल्याने सध्यातरी दर नियंत्रणात आहेत. मात्र, अजून दर खाली येण्याची आवश्यकता आहे. शेतकरी भाज्या, टोमॅटोला दर मिळत नसल्याने रस्त्यावर फेकत असताना, आमच्या शहरात मात्र दर भरमसाठ आहेत. दरावर नियंत्रण नसल्यामुळेच एकप्रकारे ग्राहकांची लूट सुरू आहे.

- ऋतुजा शिंदे, रत्नागिरी

एकीकडे शेतकरी दर मिळत नसताना आंदोलन करत आहेत तर दुसरीकडे मात्र व्यापारी भाज्यांचे दर भरमसाठ आकारून ग्राहकांची लूट करत आहेत. कांदा-बटाट्याचे दर अद्याप अनियंत्रित आहेत. भाज्याही ५० ते ७० रुपयांच्या घरात आहेत. डाळी, कडधान्यांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्यामुळे ग्राहकांची फरपट होत आहे. दरावर नियंत्रणाची गरज आहे.

- प्रणाली पाटील, रत्नागिरी