शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

ValentinesDay2020 : या प्रेमाला उपमा नाही! अन् तिने घेतला कॅन्सरग्रस्त तरुणाशी विवाह करण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 18:36 IST

काहींचं प्रेम अपवादात्मक असतं. अगदी मोठ्यात मोठ्या संकटाच्यावेळीही ते आपल्या जोडीदाराची साथ सोडत नाहीत.

रत्नागिरी - प्रेमात पडल्यावर सुख-दु:खात, प्रत्येक प्रसंगात अखेरपर्यंत साथ देण्याची वचने अनेक जण घेतात. पण प्रत्यक्षात मोजकेच लोक अशी वचने पाळतात. मात्र काहींचं प्रेम अपवादात्मक असतं. अगदी मोठ्यात मोठ्या संकटाच्यावेळीही ते आपल्या जोडीदाराची साथ सोडत नाहीत. अशीच एक कहाणी रत्नागिरीमधून समोर आली आहे. इथे एका तरुणीने कॅन्सरग्रस्त तरुणासोबत लग्नगाठ बांधली आहे. खरंतर कॅन्सरचे नाव ऐकले तरी अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा उठतो. मात्र रत्नागिरीतील प्रथमेश आणि सोनाली यांच्या प्रेमात हा भयानक आजारही आड येऊ  शकला नाही.  रत्नागिरीजवळच्या एका गावात राहणाऱ्या प्रथमेशला वयाच्या 20 व्या वर्षी कर्करोग असल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्याला केमोथेरेपीसारख्या वेदनादायी उपचारांचा सामना करावा लागला. कॅन्सरचा सामना करत असलेल्या प्रथमेशची ही अवस्था त्याच्याच गावात राहत असलेल्या सोनालीने पाहिली होती. पेशाने नर्स असलेल्या सोनालीने या कठीण काळात त्याला आधार दिला. दरम्यान, दोघांची चांगली ओळखही झाली. 

त्यानंतर प्रथमेशला कर्करोग आहे हे माहीत असूनही तिने त्याच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. मात्र तिच्या ह्या निर्णयाला तिच्या कुटुंबीयांकडून भीतीपोटी विरोध होत होता. मात्र ती आपल्या निश्चयावर ठाम राहिली. आज या दोघांच्याही विवाहाला दीड वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांच्या सुखाचा संसार सुरू आहे. आज अगदी छोट्या छोट्या कारणांवरून जोडप्यांमध्ये मतभेद होत असताना प्रथमेश आणि सोनालीची प्रेमकहाणी अशा जोडप्यांसाठी मार्गदर्शक ठरणारी आहे. 

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टRatnagiriरत्नागिरीcancerकर्करोगFamilyपरिवार