शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

लसीकरणाला आजपासून पुन्हा सुरुवात -उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 4:29 AM

रत्नागिरी : लसीचा साठा संपल्यामुळे लसीकरण थांबले होते; परंतु आता लस उपलब्ध झाल्याने बुधवारपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात ...

रत्नागिरी : लसीचा साठा संपल्यामुळे लसीकरण थांबले होते; परंतु आता लस उपलब्ध झाल्याने बुधवारपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात होईल. रुग्ण संख्या वाढत असताना वैद्यकीय अधिकाऱ्याची कमतरता भासत आहे. एक नवे फिजिशियन जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. तसेच रत्नागिरी शहरासह तालुकास्तरावर खाजगी डाॅक्टरांच्या सहकार्याने कोरोना सेंटरमध्ये उपचार उपलब्ध करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सकांना केल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष, व्यापारी, टास्कफोर्स यांच्याशी बैठकीत चर्चा केल्यानंतर सांमत यांनी झूम ॲपद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राजकीय पक्षांच्या बैठकीला सर्व पक्षांचे प्रमुख उपस्थित होते. सर्वांनी आपल्या सूचना केल्या आहेत. त्या सूचनांची दखल शासन व प्रशासन घेईल; परंतु कोरोनाच्या काळात सर्वांना एकत्र येऊन लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन लढा देण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात २०३८ बेड उपलब्ध असून त्यामध्ये ५३७ ऑक्सिजन बेडचा समावेश आहे. येत्या आठ दिवसात ऑक्सिजन प्लांट जिल्हा रुग्णालयात सुरू केला जाईल, तोपर्यंत आवश्यक ऑक्सिजन साठा उपलब्ध आहे. औषधे,इंजेक्शन सज्ज ठेवण्यात आली आहेत. रुग्णसंख्या वाढल्यास महाविद्यालय, वसतिगृहे इतर इमारती ताब्यात घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्याची माहितीही मंत्री सामंत यांनी दिली.

व्यापाऱ्यांशीही चर्चा करण्यात आली आहे. त्यांनी ज्या सूचना केल्या आहेत, त्याची दखल घेतली जाईल. व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारून नका, असे आदेश दिले आहेत. लस उपलब्ध झाल्यानंतर व्यापाऱ्यांसाठी स्वतंत्र कॅम्प लावून लसीकरण केले जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

लसीचा साठा संपल्यामुळे लसीकरण थांबले होते; परंतु आता लस उपलब्ध झाल्याने बुधवारपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात होईल. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यास महाविद्यालये, वसतिगृहे व इतर इमारती ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला करण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधित परंतु लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरण करून ठेवले जातेय; परंतु असे रुग्ण घराबाहेर फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत रुग्ण स्वत:बरोबर इतरांचे जीव धोक्यात घालत आहेत. त्याची दखल घेऊन वेळ पडल्यास कोरोनाबाधित सर्व रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्याचा इशारा सामंत यांनी दिला आहे.