शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
4
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
5
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
6
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
7
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
9
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
10
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
11
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
12
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
13
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
14
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
15
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
16
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
17
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
18
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
20
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?

नवीन तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोकणच्या लाल मातीत बारमाही शेतीतून चांगल्या दर्जाचे उत्पन्न वेतोशी येथील परेश चंद्रकांत भावे मिळवत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोकणच्या लाल मातीत बारमाही शेतीतून चांगल्या दर्जाचे उत्पन्न वेतोशी येथील परेश चंद्रकांत भावे मिळवत आहेत. आंबा, काजू पिकांशिवाय भात, भुईमूग, सूर्यफूल तसेच विविध प्रकारच्या भाज्यांचे उत्पादन घेत आहेत. शेतातील पालापाचोळा एकत्र करून त्यापासून गांडूळखत युनिट तसेच गुरांच्या शेणापासून गोबरगॅस युनिट उभारले आहे. शेणापासून कंपोस्ट खत तयार करीत असून ९० टक्के सेंद्रिय उत्पादने घेत आहेत. रासायनिक खते किंवा कीटकनाशकांचा वापर मात्र गरजेपुरताच करीत आहेत.

परेश भावे कृषी पदवीधारक आहेत. शेतीची आवड असल्याने पदवीनंतर नोकरीच्या मागे न लागता शेतीकडे वळले. वडिलोपार्जित शेती करतानाच त्यांनी शेतीचा विस्तार वाढविला आहे. चाळीस एकर क्षेत्रावर त्यांनी आंबा कलमांची लागवड केली आहे. सेंद्रिय पद्धतीने आंब्याचे उत्पादन घेत असल्याने दर्जा चांगला आहे. वाशी, पुणे मार्केटसह खासगी विक्रीवर त्यांचा विशेष भर आहे. काजू बागेत ८०० ते ९०० झाडांची लागवड असून, वर्षाला अडीच ते तीन टन काजू त्यांना प्राप्त होतात. गावठी काजूसह विद्यापीठ प्रमाणित वेंगुर्ला ४, ५ वाणांची लागवड केली आहे. ओल्या काजूपेक्षा वाळलेला काजूची विक्री करणे परवडते.

पारंपरिक पद्धतीने भात लागवड करण्याऐवजी भात, तसेच भाजीपाला शेतीत नवनवीन तंत्रज्ञान व प्रयोग सतत करीत असतात. कृषी संशोधन केंद्र शिरगावने संशोधित केलेल्या वाणाची लागवड ते करीत आहेत. पेरणीपासून कापणीपर्यंत योग्य काळजी घेण्यात येत असल्यामुळे त्यांच्याकडील भाताचा दर्जा उत्तम आहे. भात काढल्यानंतर काही क्षेत्रावर सूर्यफूल, भूईमूग, कलिंगड, वांगी, मिरची, कुळीथ तसेच पालेभाज्यांमध्ये मुळा, माठ, मोहरीची लागवड करीत आहेत. योग्य नियोजन करून प्रत्येक पिकासाठी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली वाणांची निवड करून लागवड करीत आहेत. सध्या शेतीसाठी मनुष्यबळ फारसे लाभत नाही. त्यामुळे यांत्रिक अवजारांचा वापर ते अधिक करीत आहेत. बागायती असो वा शेतीतील गवत काढण्यासाठी ग्रास कटरचा वापर त्यांना फायदेशीर ठरत आहे. पॉवर टिलरमुळे नांगरणी तर पॉवर स्प्रेअरमुळे फवारणीचे काम सोपे झाले आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी म्हशी व गायींचा सांभाळ केला आहे. शेणापासून कंपोस्ट, जीवामृत तयार करतात. दुभत्या जनावरांसाठी ओल्या चाऱ्याची उपलब्धता व्हावी, यासाठी मका, ज्वारीची लागवड केली आहे.

शंभर नारळ, ३०० सुपारी लागवड असून नारळीबागेत त्यांनी मसाला लागवड करून लाखीबाग तयार केली आहे. त्यापासूनही चांगले उत्पन्न त्यांना प्राप्त होत आहे. बागेतच त्यांनी कंपोस्ट व गांडूळ खत युनिट तयार केले आहे. स्वत: खत तयार करीत असून स्वत:च्या शेतीसाठी त्याचा वापर करून नंतर उर्वरित खताची विक्री ते करीत आहेत. नियोजन असेल तर प्रत्येक गोष्टीतून फायदा होतो. शेतीमध्ये कष्ट प्रचंड आहेत. मात्र, मेहनतीचे फळ मिळतेच अशी त्यांची धारणा आहे. कातळावरील बागायतीसाठी बारमाही पाण्याकरिता शेततळे बांधले असून, पावसाचे वाया जाणारे पाणी साचत असल्याने त्याचा त्यांना फायदा होत आहे.

शेततळ्याचा फायदा

भावे यांनी कातळ जमिनीमध्ये शेततळे उभारले आहे. २०११ साली बांधण्यात आलेल्या शेततळ्यातील पाणी मे महिन्यापर्यंत पुरते. त्यामुळे बारमाही शेतीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. कोकणच्या लाल मातीमध्ये विविध प्रकारची पिके घेतात येतात, किंबहुना चांगल्या दर्जाचे उत्पन्न घेता येते, हे भावे यांनी सिद्ध केले असून, त्यासाठी आई-वडील, पत्नीचे सहकार्य लाभत आहे.