शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
5
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
6
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
7
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
8
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
9
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
10
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
11
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
12
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
13
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
15
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
16
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
17
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
18
बोरीवलीच्या नँसी व सुकरवाडी एसटी डेपोसाठी ३ महिन्यांत निविदा काढणार; परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा
19
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
20
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले

नवीन तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोकणच्या लाल मातीत बारमाही शेतीतून चांगल्या दर्जाचे उत्पन्न वेतोशी येथील परेश चंद्रकांत भावे मिळवत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोकणच्या लाल मातीत बारमाही शेतीतून चांगल्या दर्जाचे उत्पन्न वेतोशी येथील परेश चंद्रकांत भावे मिळवत आहेत. आंबा, काजू पिकांशिवाय भात, भुईमूग, सूर्यफूल तसेच विविध प्रकारच्या भाज्यांचे उत्पादन घेत आहेत. शेतातील पालापाचोळा एकत्र करून त्यापासून गांडूळखत युनिट तसेच गुरांच्या शेणापासून गोबरगॅस युनिट उभारले आहे. शेणापासून कंपोस्ट खत तयार करीत असून ९० टक्के सेंद्रिय उत्पादने घेत आहेत. रासायनिक खते किंवा कीटकनाशकांचा वापर मात्र गरजेपुरताच करीत आहेत.

परेश भावे कृषी पदवीधारक आहेत. शेतीची आवड असल्याने पदवीनंतर नोकरीच्या मागे न लागता शेतीकडे वळले. वडिलोपार्जित शेती करतानाच त्यांनी शेतीचा विस्तार वाढविला आहे. चाळीस एकर क्षेत्रावर त्यांनी आंबा कलमांची लागवड केली आहे. सेंद्रिय पद्धतीने आंब्याचे उत्पादन घेत असल्याने दर्जा चांगला आहे. वाशी, पुणे मार्केटसह खासगी विक्रीवर त्यांचा विशेष भर आहे. काजू बागेत ८०० ते ९०० झाडांची लागवड असून, वर्षाला अडीच ते तीन टन काजू त्यांना प्राप्त होतात. गावठी काजूसह विद्यापीठ प्रमाणित वेंगुर्ला ४, ५ वाणांची लागवड केली आहे. ओल्या काजूपेक्षा वाळलेला काजूची विक्री करणे परवडते.

पारंपरिक पद्धतीने भात लागवड करण्याऐवजी भात, तसेच भाजीपाला शेतीत नवनवीन तंत्रज्ञान व प्रयोग सतत करीत असतात. कृषी संशोधन केंद्र शिरगावने संशोधित केलेल्या वाणाची लागवड ते करीत आहेत. पेरणीपासून कापणीपर्यंत योग्य काळजी घेण्यात येत असल्यामुळे त्यांच्याकडील भाताचा दर्जा उत्तम आहे. भात काढल्यानंतर काही क्षेत्रावर सूर्यफूल, भूईमूग, कलिंगड, वांगी, मिरची, कुळीथ तसेच पालेभाज्यांमध्ये मुळा, माठ, मोहरीची लागवड करीत आहेत. योग्य नियोजन करून प्रत्येक पिकासाठी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली वाणांची निवड करून लागवड करीत आहेत. सध्या शेतीसाठी मनुष्यबळ फारसे लाभत नाही. त्यामुळे यांत्रिक अवजारांचा वापर ते अधिक करीत आहेत. बागायती असो वा शेतीतील गवत काढण्यासाठी ग्रास कटरचा वापर त्यांना फायदेशीर ठरत आहे. पॉवर टिलरमुळे नांगरणी तर पॉवर स्प्रेअरमुळे फवारणीचे काम सोपे झाले आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी म्हशी व गायींचा सांभाळ केला आहे. शेणापासून कंपोस्ट, जीवामृत तयार करतात. दुभत्या जनावरांसाठी ओल्या चाऱ्याची उपलब्धता व्हावी, यासाठी मका, ज्वारीची लागवड केली आहे.

शंभर नारळ, ३०० सुपारी लागवड असून नारळीबागेत त्यांनी मसाला लागवड करून लाखीबाग तयार केली आहे. त्यापासूनही चांगले उत्पन्न त्यांना प्राप्त होत आहे. बागेतच त्यांनी कंपोस्ट व गांडूळ खत युनिट तयार केले आहे. स्वत: खत तयार करीत असून स्वत:च्या शेतीसाठी त्याचा वापर करून नंतर उर्वरित खताची विक्री ते करीत आहेत. नियोजन असेल तर प्रत्येक गोष्टीतून फायदा होतो. शेतीमध्ये कष्ट प्रचंड आहेत. मात्र, मेहनतीचे फळ मिळतेच अशी त्यांची धारणा आहे. कातळावरील बागायतीसाठी बारमाही पाण्याकरिता शेततळे बांधले असून, पावसाचे वाया जाणारे पाणी साचत असल्याने त्याचा त्यांना फायदा होत आहे.

शेततळ्याचा फायदा

भावे यांनी कातळ जमिनीमध्ये शेततळे उभारले आहे. २०११ साली बांधण्यात आलेल्या शेततळ्यातील पाणी मे महिन्यापर्यंत पुरते. त्यामुळे बारमाही शेतीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. कोकणच्या लाल मातीमध्ये विविध प्रकारची पिके घेतात येतात, किंबहुना चांगल्या दर्जाचे उत्पन्न घेता येते, हे भावे यांनी सिद्ध केले असून, त्यासाठी आई-वडील, पत्नीचे सहकार्य लाभत आहे.