शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंचे उत्तर शाळेतील भांडणासारखे, ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर मंत्री उदय सामंतांनी केलं भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 18:13 IST

तीनही नेत्यांची मने घट्ट

रत्नागिरी : आमच्यातील वाद हे महाराष्ट्रापेक्षा छाेटे आहेत, असे सांगून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकारात्मकता दाखवली आहे. पण, समाेरच्यांकडून कशा पद्धतीने ते कमी लेखण्यात आलं हे दिसलं आणि उद्धव ठाकरे यांचे उत्तर म्हणजे शाळेतील भांडणासारखे असल्याचे भाष्य राज्याचे उद्याेगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बाेलताना केले.रत्नागिरी दाैऱ्यावर आलेल्या मंत्री उदय सामंत यांनी रविवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, राज ठाकरे यांनी मुलाखतीत महाराष्ट्र आपल्या सगळ्यांपेक्षा माेठा आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. आमची भांडणं महाराष्ट्रापेक्षा छाेटी आहेत, हे त्यांनी सांगितले. पण, त्याची लिंक कशी जाेडली गेली, का जाेडली गेली, कशामुळे जाेडली गेली, हे माहीत नाही. राज ठाकरे सकारात्मक बाेलले असतील, पण समाेरून अटी, शर्तींंवर ते आमच्यासाेबत आले पाहिजेत, भाजपाबराेबर त्यांनी बाेलता कामा नये, असे सांगण्यात आले. हे प्राथमिक शाळेतील भांडणासारखं राजकारणात सुरू झालं आहे. त्याचा विचार करण्याएवढे राज ठाकरे नक्कीच माेठे आहेत, असेही मंत्री सामंत म्हणाले.

तीनही नेत्यांची मने घट्टमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांची मने घट्ट आहेत, एकत्र आहेत आणि काॅंक्रीट आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून आम्ही जिंकू असा विश्वास आहे.

अटी घालून नमवणे शक्य नाहीयुती काेणाबराेबर करायची हे राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. पण, ते स्वत:चा विचार असणारे आणि स्वत:चा विचार कधीही बाजूला न करणारे एक नेते आहेत. त्यामुळे त्यांना अटी घालून नमवणे काेणाला शक्य नाही. अटी, शर्ती घालून झुकणारे राज ठाकरे नाहीत. अटी घातल्यावर ते काेणाबराेबर युती करतील, असे मला वाटत नाही, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे