शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

उद्धव ठाकरेंचे उत्तर शाळेतील भांडणासारखे, ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर मंत्री उदय सामंतांनी केलं भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 18:13 IST

तीनही नेत्यांची मने घट्ट

रत्नागिरी : आमच्यातील वाद हे महाराष्ट्रापेक्षा छाेटे आहेत, असे सांगून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकारात्मकता दाखवली आहे. पण, समाेरच्यांकडून कशा पद्धतीने ते कमी लेखण्यात आलं हे दिसलं आणि उद्धव ठाकरे यांचे उत्तर म्हणजे शाळेतील भांडणासारखे असल्याचे भाष्य राज्याचे उद्याेगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बाेलताना केले.रत्नागिरी दाैऱ्यावर आलेल्या मंत्री उदय सामंत यांनी रविवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, राज ठाकरे यांनी मुलाखतीत महाराष्ट्र आपल्या सगळ्यांपेक्षा माेठा आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. आमची भांडणं महाराष्ट्रापेक्षा छाेटी आहेत, हे त्यांनी सांगितले. पण, त्याची लिंक कशी जाेडली गेली, का जाेडली गेली, कशामुळे जाेडली गेली, हे माहीत नाही. राज ठाकरे सकारात्मक बाेलले असतील, पण समाेरून अटी, शर्तींंवर ते आमच्यासाेबत आले पाहिजेत, भाजपाबराेबर त्यांनी बाेलता कामा नये, असे सांगण्यात आले. हे प्राथमिक शाळेतील भांडणासारखं राजकारणात सुरू झालं आहे. त्याचा विचार करण्याएवढे राज ठाकरे नक्कीच माेठे आहेत, असेही मंत्री सामंत म्हणाले.

तीनही नेत्यांची मने घट्टमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांची मने घट्ट आहेत, एकत्र आहेत आणि काॅंक्रीट आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून आम्ही जिंकू असा विश्वास आहे.

अटी घालून नमवणे शक्य नाहीयुती काेणाबराेबर करायची हे राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. पण, ते स्वत:चा विचार असणारे आणि स्वत:चा विचार कधीही बाजूला न करणारे एक नेते आहेत. त्यामुळे त्यांना अटी घालून नमवणे काेणाला शक्य नाही. अटी, शर्ती घालून झुकणारे राज ठाकरे नाहीत. अटी घातल्यावर ते काेणाबराेबर युती करतील, असे मला वाटत नाही, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे