शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

उदय सामंत दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री, भाजप आमदाराचा पराभव करुन पहिल्यांदा विधानसभेत केला होता प्रवेश

By मनोज मुळ्ये | Updated: August 9, 2022 13:09 IST

२०१९ साली सलग चौथ्यांदा आमदार झालेले उदय सामंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात प्रथम कॅबिनेट मंत्री झाले.

मनोज मुळ्येरत्नागिरी : सन २००४ पासून तब्बल अठरा वर्षे सलग रत्नागिरी विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या उदय सामंत यांनी तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. एकदा राज्यमंत्री तर एकदा कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले होते. आता दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली.१९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र झाल्यानंतर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून ते प्रथम प्रकाशझोतात आले. २००४ साली वयाच्या २९व्या वर्षी त्यांनी विद्यमान भाजप आमदाराचा पराभव करुन प्रथम विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर २००९च्या निवडणुकीतही ते विजयी झाले. त्या टर्ममध्ये २०१३ साली ते नगरविकास, बंदरे, वने अशा नऊ खात्यांचे राज्यमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री झाले.२०१४ साली विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि आधीपेक्षा वाढीव मताधिक्याने विजयी झाले. २०१४ ते २०१९ या काळात मंत्रिपद नसले तरी त्यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले. २०१६ साली ते विधानमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष होते., २०१८ साली महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली.२०१९ साली सलग चौथ्यांदा आमदार झालेले उदय सामंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात प्रथम कॅबिनेट मंत्री झाले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणून आपल्या अडीच वर्षाच्या कार्यकालात त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यापीठाला एकापेक्षा अधिकवेळा भेट दिली आणि तेथील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले. हे कॅबिनेट मंत्रिपद देतानाच त्यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचीही जबाबदारी देण्यात आली. त्यांच्या पाठपुराव्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाची प्रक्रिया सुरू झाली आहे. रत्नागिरीतील वैद्यकीय महाविद्यालयालाही सरकारने तत्त्वत: मान्यता दिली आहे. त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळेच रामटेकच्या कवि कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे उपकेंद्र रत्नागिरीत सुरू झाले आहे.एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकावल्यानंतर उदय सामंत यांनी त्यांची साथ देण्याचा निर्णय घेतला. आमदारकी आणि मंत्रिपदाचा अनुभव लक्षात घेत मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यातच त्यांना मंत्रिपद मिळेल अशी शक्यता होती आणि तसेच घडले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतEknath Shindeएकनाथ शिंदेministerमंत्री