शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

उदय सामंत दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री, भाजप आमदाराचा पराभव करुन पहिल्यांदा विधानसभेत केला होता प्रवेश

By मनोज मुळ्ये | Updated: August 9, 2022 13:09 IST

२०१९ साली सलग चौथ्यांदा आमदार झालेले उदय सामंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात प्रथम कॅबिनेट मंत्री झाले.

मनोज मुळ्येरत्नागिरी : सन २००४ पासून तब्बल अठरा वर्षे सलग रत्नागिरी विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या उदय सामंत यांनी तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. एकदा राज्यमंत्री तर एकदा कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले होते. आता दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली.१९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र झाल्यानंतर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून ते प्रथम प्रकाशझोतात आले. २००४ साली वयाच्या २९व्या वर्षी त्यांनी विद्यमान भाजप आमदाराचा पराभव करुन प्रथम विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर २००९च्या निवडणुकीतही ते विजयी झाले. त्या टर्ममध्ये २०१३ साली ते नगरविकास, बंदरे, वने अशा नऊ खात्यांचे राज्यमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री झाले.२०१४ साली विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि आधीपेक्षा वाढीव मताधिक्याने विजयी झाले. २०१४ ते २०१९ या काळात मंत्रिपद नसले तरी त्यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले. २०१६ साली ते विधानमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष होते., २०१८ साली महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली.२०१९ साली सलग चौथ्यांदा आमदार झालेले उदय सामंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात प्रथम कॅबिनेट मंत्री झाले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणून आपल्या अडीच वर्षाच्या कार्यकालात त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यापीठाला एकापेक्षा अधिकवेळा भेट दिली आणि तेथील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले. हे कॅबिनेट मंत्रिपद देतानाच त्यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचीही जबाबदारी देण्यात आली. त्यांच्या पाठपुराव्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाची प्रक्रिया सुरू झाली आहे. रत्नागिरीतील वैद्यकीय महाविद्यालयालाही सरकारने तत्त्वत: मान्यता दिली आहे. त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळेच रामटेकच्या कवि कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे उपकेंद्र रत्नागिरीत सुरू झाले आहे.एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकावल्यानंतर उदय सामंत यांनी त्यांची साथ देण्याचा निर्णय घेतला. आमदारकी आणि मंत्रिपदाचा अनुभव लक्षात घेत मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यातच त्यांना मंत्रिपद मिळेल अशी शक्यता होती आणि तसेच घडले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतEknath Shindeएकनाथ शिंदेministerमंत्री