शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वेत चोरट्यांचा धुमाकूळ-- प्रवासादरम्यान दोन प्रवाशांना लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 16:53 IST

कोकण रेल्वे मार्गावर धावणाºया गाड्यांमध्ये दिवसेंदिवस चोºयांचे प्रमाण वाढत आहे. कोकण रेल्वेमधील दोन चोºयांमध्ये प्रवाशांचा रोख रकमेसह एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.

ठळक मुद्देरोख रक्कमेसह ४० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास-- पोलिसांपुढे आव्हानचोºयांच्या वाढत्या प्रकाराने प्रवासी त्रस्त. - प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न.

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर धावणाºया गाड्यांमध्ये दिवसेंदिवस चोºयांचे प्रमाण वाढत आहे. कोकणरेल्वेमधील दोन चोºयांमध्ये प्रवाशांचा रोख रकमेसह एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कोकणरेल्वेतील वाढत्या चोºयांमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. शुभम विनोदकुमार वर्मा (रा. माहियानवाली, गंगानगर, राजस्थान) हे दादर ते मडगाव असा प्रवास करीत होते. त्यावेळी त्यांची गाडी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर आली असता, त्यांच्या बॅगेतून रोख १४,३०० रुपये अज्ञाताने लंपास केले.  फिर्यादी वर्मा यांनी दोन अज्ञात व्यक्तींबद्दल संशय व्यक्त केला असून, हा गुन्हा दिनांक १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास घडला. 

कोकण रेल्वे मार्गावर धावणाºया कोचूवेली गाडीने फिर्यादी गीता भामभानी (रा. रानी सतीनगर, एस. व्ही. रोड, मालाड) या कोचूवेली ते लोकमान्य टिळक टर्मिनस असा प्रवास करीत होत्या. या गाडीतील कोच क्रमांक एस - १ मधील आसन क्रमांक ७९ शयनयानमधून त्या प्रवास करीत होत्या. ही गाडी १५ नोव्हेंबर रोजी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी रेल्वेस्थानकावर आली असता, गीता यांच्या चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांच्या बॅगेतून रोख १० हजार रुपये आणि १६ हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकण २६ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने लंपास केला. याप्रकरणी गीता भामभानी यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. 

कोकण रेल्वेतील या दोन्ही चोºयांचा तपास रत्नागिरी शहर पोलिसांकडून सुरु आहे.  मागील तीन-चार महिन्यांमध्ये रेल्वेमध्ये चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलिसांसमोर या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान उभे राहिले आहे. त्याचबरोबर प्रवाशांच्या सामानाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, रेल्वे प्रशासनाने यावर योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहेत.  या वाढत्या चोºयांमुळे कोकण रेल्वे प्रशासनही हैराण झाले आहे.  मध्यंतरी रेल्वेत पेयामध्ये गुंगीचे औषध देऊन प्रवाशांना लुटण्याचे प्रकार वाढले होते. मात्र, आता चोरट्यांनी थेट  गाडीमधून प्रवाशांचा मुद्देमालच लंपास करण्याच्या घटना वाढल्या आहेत. 

टॅग्स :konkanकोकणrailwayरेल्वे