शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

Shiv Sena: कोणता हा झेंडा घेऊ हाती? सामान्य शिवसैनिकांचा संभ्रम कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 19:24 IST

शिंदे यांच्या बंडाबाबत नेमकी कारवाई पक्षाकडून केली जात नसल्याने त्या गटातील संख्या रोज वाढतच आहे. त्यामुळे शिवसैनिकांचा संभ्रम वाढतच चालला आहे.

मनोज मुळ्येरत्नागिरी : शिवसेनेच्या जिल्ह्यातील चार आमदारांपैकी दोघांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिल्याने आपण काय करायचे, कोणासोबत जायचे असा प्रश्न सामान्य शिवसैनिकांसमोर आहे. शिंदे यांच्या बंडाबाबत नेमकी कारवाई पक्षाकडून केली जात नसल्याने त्या गटातील संख्या रोज वाढतच आहे. त्यामुळे शिवसैनिकांचा संभ्रम वाढतच चालला आहे. हातातला भगवा कायम ठेवावा की, बंडाचा झेंडा घ्यावा, यात असंख्य शिवसैनिक अडकले आहेत.मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारले आणि शिवसेनेत मोठा भूकंप झाला. दहा-बारा गेले, अजून जाणार अशा चर्चा पहिल्या दिवशी होत्या. दुसऱ्या दिवशीपासून जाणाऱ्यांची संख्या वाढली आणि शिवसैनिक गोंधळले. बंड यशस्वी होणार की पक्ष त्यांना परत आणणार, एवढेच प्रश्न शिवसैनिकांच्या मनात होते.

जिल्ह्यात उदय सामंत (रत्नागिरी), भास्कर जाधव (चिपळूण), राजन साळवी (राजापूर) आणि योगेश कदम (दापोली) हे शिवसेनेचे चार आमदार आहेत. यातील योगेश कदम यांनी सर्वांत आधी शिंदे गट गाठला आणि रविवारी मंत्री उदय सामंत गुवाहाटीला बंडखोर गटात सहभागी झाले.या दोन्ही आमदारांची पक्षातील कार्यकर्त्यांशी उत्तम संबंध आहेत. हे दोघेही शिवसेनेत सक्रिय होण्याच्या आधीपासूनच शिवसेना मजबूत होती. मात्र, या दोघांनी आपापल्या मतदारसंघात ही मजबुती वाढवली आहे. पक्षाइतकेच त्यांच्याशी प्रामाणिक आसलेल्या कार्यकर्त्यांची संख्याही खूप मोठी आहे. त्यामुळेच आता काय करायचे, असा प्रश्न अनेक कार्यकर्त्यांच्या मनात आहे.‘इधर चला मै, उधर चला...’

ज्यांनी बंडात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांच्या मतदारसंघात म्हणजेच दापोली, खेड, मंडणगड आणि रत्नागिरी तालुक्यात कार्यकर्ते संभ्रमित अवस्थेत आहेत. इकडे जायचे की तिकडे हा निर्णय घेताना त्यांना अडचण येत आहे. सध्या कोणी अधिकृतपणे बोलत नसले तरी आपापसात याच विषयाची चर्चा केली जात आहे.

दापोलीत आधीच फेरबदलशिंदे गटात सहभागी झालेल्या आमदारांपैकी योगेश कदम यांच्या मतदारसंघात शिवसेनेत आधीपासूनच दोन गट झाले आहेत. दापोली-मंडणगडच्या नगरपंचायत निवडणुकीत योगेश कदम यांना बाजूला केल्यानंतर पालकमंत्री अनिल परब यांनी तत्काळ संघटनेत फेरबदल केले. योगेश कदम यांच्याशी जवळीक असलेले पदाधिकारी बाजूला करण्यात आले. त्यामुळे तेथे पदाधिकारी बाजूला जाण्याची शक्यता कमी आहे.

सामंत यांची पकड२०१४ मध्ये उदय सामंत शिवसेनेत दाखल झाल्यानंतर त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी, कार्यकर्तेही शिवसेनेत गेले. यथावकाश त्यांना पदेही दिली गेली. त्यामुळे सद्यस्थितीत अनेक महत्त्वाच्या पदांवर सामंत यांच्याशी जवळीक असलेले पदाधिकारी आहेत. त्यावर सामंत यांची चांगली पकड आहे. सामंत यांनी कामे देऊन अनेकांच्या पोटापाण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यात शिवसेनेला मोठा फटका बसू शकेल.

राष्ट्रवादीशी आघाडी नकोराष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याला शिवसैनिकांचा मुळातच ठाम विरोध होता. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत शिवसेनेसमोर राष्ट्रवादी काँग्रेसचेच आव्हान आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणूक शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी झाली आहे. ज्यांच्याशी सातत्याने विरोधात लढलो आहोत, वाद घातले आहेत, आरोप केले आहेत, त्यांच्यासोबतच एकत्र राहण्याला शिवसैनिकांचा विरोध आहे. त्यामुळे पक्षासाेबत आहोत, असे सांगणाऱ्या अनेक सामान्य शिवसैनिकांनाही एकनाथ शिंदे यांचा मुद्दा पटलेला आहे.आम्ही सामंतांसोबतरत्नागिरी शिवसेनेतील जे पदाधिकारी उदय सामंत यांच्यासोबत शिवसेनेत आले, त्या सर्वांमध्ये यापुढेही सामंत यांच्यासोबतच राहण्याची भूमिका ठाम आहे. अर्थात लोकप्रतिनिधी म्हणून काम करणारे काही पदाधिकारी मात्र द्विधा मनस्थितीत आहेत. एकीकडे सामंत यांची साथ, त्यांचा वरदहस्त हवा असतानाच दुसरीकडे पद सोडावे लागेल, हे दु:खही आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv Senaशिवसेना