शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

Shiv Sena: कोणता हा झेंडा घेऊ हाती? सामान्य शिवसैनिकांचा संभ्रम कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 19:24 IST

शिंदे यांच्या बंडाबाबत नेमकी कारवाई पक्षाकडून केली जात नसल्याने त्या गटातील संख्या रोज वाढतच आहे. त्यामुळे शिवसैनिकांचा संभ्रम वाढतच चालला आहे.

मनोज मुळ्येरत्नागिरी : शिवसेनेच्या जिल्ह्यातील चार आमदारांपैकी दोघांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिल्याने आपण काय करायचे, कोणासोबत जायचे असा प्रश्न सामान्य शिवसैनिकांसमोर आहे. शिंदे यांच्या बंडाबाबत नेमकी कारवाई पक्षाकडून केली जात नसल्याने त्या गटातील संख्या रोज वाढतच आहे. त्यामुळे शिवसैनिकांचा संभ्रम वाढतच चालला आहे. हातातला भगवा कायम ठेवावा की, बंडाचा झेंडा घ्यावा, यात असंख्य शिवसैनिक अडकले आहेत.मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारले आणि शिवसेनेत मोठा भूकंप झाला. दहा-बारा गेले, अजून जाणार अशा चर्चा पहिल्या दिवशी होत्या. दुसऱ्या दिवशीपासून जाणाऱ्यांची संख्या वाढली आणि शिवसैनिक गोंधळले. बंड यशस्वी होणार की पक्ष त्यांना परत आणणार, एवढेच प्रश्न शिवसैनिकांच्या मनात होते.

जिल्ह्यात उदय सामंत (रत्नागिरी), भास्कर जाधव (चिपळूण), राजन साळवी (राजापूर) आणि योगेश कदम (दापोली) हे शिवसेनेचे चार आमदार आहेत. यातील योगेश कदम यांनी सर्वांत आधी शिंदे गट गाठला आणि रविवारी मंत्री उदय सामंत गुवाहाटीला बंडखोर गटात सहभागी झाले.या दोन्ही आमदारांची पक्षातील कार्यकर्त्यांशी उत्तम संबंध आहेत. हे दोघेही शिवसेनेत सक्रिय होण्याच्या आधीपासूनच शिवसेना मजबूत होती. मात्र, या दोघांनी आपापल्या मतदारसंघात ही मजबुती वाढवली आहे. पक्षाइतकेच त्यांच्याशी प्रामाणिक आसलेल्या कार्यकर्त्यांची संख्याही खूप मोठी आहे. त्यामुळेच आता काय करायचे, असा प्रश्न अनेक कार्यकर्त्यांच्या मनात आहे.‘इधर चला मै, उधर चला...’

ज्यांनी बंडात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांच्या मतदारसंघात म्हणजेच दापोली, खेड, मंडणगड आणि रत्नागिरी तालुक्यात कार्यकर्ते संभ्रमित अवस्थेत आहेत. इकडे जायचे की तिकडे हा निर्णय घेताना त्यांना अडचण येत आहे. सध्या कोणी अधिकृतपणे बोलत नसले तरी आपापसात याच विषयाची चर्चा केली जात आहे.

दापोलीत आधीच फेरबदलशिंदे गटात सहभागी झालेल्या आमदारांपैकी योगेश कदम यांच्या मतदारसंघात शिवसेनेत आधीपासूनच दोन गट झाले आहेत. दापोली-मंडणगडच्या नगरपंचायत निवडणुकीत योगेश कदम यांना बाजूला केल्यानंतर पालकमंत्री अनिल परब यांनी तत्काळ संघटनेत फेरबदल केले. योगेश कदम यांच्याशी जवळीक असलेले पदाधिकारी बाजूला करण्यात आले. त्यामुळे तेथे पदाधिकारी बाजूला जाण्याची शक्यता कमी आहे.

सामंत यांची पकड२०१४ मध्ये उदय सामंत शिवसेनेत दाखल झाल्यानंतर त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी, कार्यकर्तेही शिवसेनेत गेले. यथावकाश त्यांना पदेही दिली गेली. त्यामुळे सद्यस्थितीत अनेक महत्त्वाच्या पदांवर सामंत यांच्याशी जवळीक असलेले पदाधिकारी आहेत. त्यावर सामंत यांची चांगली पकड आहे. सामंत यांनी कामे देऊन अनेकांच्या पोटापाण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यात शिवसेनेला मोठा फटका बसू शकेल.

राष्ट्रवादीशी आघाडी नकोराष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याला शिवसैनिकांचा मुळातच ठाम विरोध होता. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत शिवसेनेसमोर राष्ट्रवादी काँग्रेसचेच आव्हान आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणूक शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी झाली आहे. ज्यांच्याशी सातत्याने विरोधात लढलो आहोत, वाद घातले आहेत, आरोप केले आहेत, त्यांच्यासोबतच एकत्र राहण्याला शिवसैनिकांचा विरोध आहे. त्यामुळे पक्षासाेबत आहोत, असे सांगणाऱ्या अनेक सामान्य शिवसैनिकांनाही एकनाथ शिंदे यांचा मुद्दा पटलेला आहे.आम्ही सामंतांसोबतरत्नागिरी शिवसेनेतील जे पदाधिकारी उदय सामंत यांच्यासोबत शिवसेनेत आले, त्या सर्वांमध्ये यापुढेही सामंत यांच्यासोबतच राहण्याची भूमिका ठाम आहे. अर्थात लोकप्रतिनिधी म्हणून काम करणारे काही पदाधिकारी मात्र द्विधा मनस्थितीत आहेत. एकीकडे सामंत यांची साथ, त्यांचा वरदहस्त हवा असतानाच दुसरीकडे पद सोडावे लागेल, हे दु:खही आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv Senaशिवसेना