शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

बंदी असूनही आंबा घाटातून अवजड वाहनांची वाहतूक, पोलीस बंदोबस्ताबाबत प्रश्न चिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2021 2:05 PM

साखरपा- मुर्शी तपासणी नाक्यावर पोलीस बंदोबस्त असतानाही अवजड वाहने सहीसलामत जात असल्याने पोलीस बंदोबस्ताबाबतच प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.

साखरपा : रत्नागिरी - कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटातून अवजड वाहनांना बंदी असतानाही अवजड वाहनांची वाहतूक सुरु आहे. आश्चर्याची बाब म्हणजे साखरपा- मुर्शी तपासणी नाक्यावर पोलीस बंदोबस्त असतानाही बुधवारी तीन वाहने सहीसलामत जात असल्याने पोलीस बंदोबस्ताबाबतच प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.२२ जुलै २०२१रोजी झालेल्या अतिवृष्टीत आंबा घाटात दरड कोसळून महामार्ग चौदा दिवस बंद होता. महामार्गाचे काम संथगतीने सुरू असल्याने पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू झालेली नाही. चारचाकी वाहनांना आंबा घाटातून वाहतुकीस परवानगी देण्यात आली होती. तब्बल अडीच ते तीन महिन्यांनी सहाचाकी वाहनांना वाहतुकीस परवानगी देण्यात आली. अद्याप या मार्गावर जड वाहनांना प्रवेश बंद आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत अवजड वाहनांची वाहतूकही सुरू झाल्याचे दिसत आहे.गेले आठ दिवसात अशी वाहने मुर्शी तपासणी नाक्यावरून जात आहेत. याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही ही अवजड वाहने धावत आहेत. वाहने जाण्याच्या वेळेतच पोलीस अन्यत्र जात असल्याने वाहनांची तपासणी होत नसल्याचे दिसत आहे. वाहनांची येण्याची वेळ आणि पोलीस नसण्याची वेळ योग्य साधली जात असल्याने यामागचे गौडबंगाल काय आहे, याचा तपास घेण्याची मागणी होत आहे. या वाहनांचा अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी