शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

रत्नागिरीतील वाटद धरणामध्ये तिघे बुडाले, एक मृत; कोल्हापूरचा तरुण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 11:39 IST

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील वाटद बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेले तिघेजण बुडाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. हे सर्वजण जेएसडब्ल्यू कंपनीतील कामगार ...

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील वाटद बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेले तिघेजण बुडाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. हे सर्वजण जेएसडब्ल्यू कंपनीतील कामगार असल्याचे समजते. त्यातील एकजण बचावला असून, दुसऱ्याचा मृतदेह सापडला आहे. मूळचा कोल्हापूर येथील त्यांचा तिसरा सहकारी ओंकार जाधव (२३) मात्र सायंकाळी उशिरापर्यंत बेपत्ता होता.मुसळधार पाऊस कोसळत असताना जेएसडब्ल्यू कंपनीतील विमिष नायर (३५, मूळ रा. गोवा, सध्या रा. वाटद खंडाळा), विक्रम नरेशचंद्र (३४, मूळ रा, उत्तरप्रदेश, सध्या वाटद खंडाळा) आणि ओंकार जाधव असे तिघेजण बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेले होते. २४ तासांहून अधिकवेळ सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे बंधाऱ्यात मोठा पाणीसाठा झाला आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यात हे तिघेजण बुडाले.आरडाओरडा झाल्यास आसपासचे लोक तेथे गेले. यातील विमिष नायर याने स्वत:ला कसेबसे वाचवले. मात्र, विक्रम नरेशचंद्र स्वत:ला वाचवू शकला नाही. त्याचा बुडून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह आसपासच असल्याने तो हाती लागला. मात्र, ओंकार जाधव बेपत्ता झाला आहे. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता. मात्र, तो सापडला नाही.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDamधरणDeathमृत्यूMissingबेपत्ता होणं