शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

राज्यपालांकडून न झालेल्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा विचार - मंत्री उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 18:28 IST

वैयक्तिक पातळीवर अशी याचिका दाखल करता येईल का, याबाबत आपण विधिज्ञांशी चर्चा करत असल्याचे त्यांनी सांगितले.

रत्नागिरी : सव्वावर्षापूर्वी राज्यपालांकडे विधान परिषदेसाठी १२ आमदारांची यादी कॅबिनेटच्या मंजुरीने पाठवण्यात आली आहे. मात्र त्यांनी ती अजून मंजूर केलेली नाही. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करता येईल का, असा विचार आपण करत असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. शिवसेनेकडून किंवा महाविकास आघाडीकडून नाही तर वैयक्तिक स्तरावर आपण असा विचार करत असल्याचे ते म्हणाले.रत्नागिरीत एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्याबाबत उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारंनी या निकालाबाबत सरकारची भूमिका पुणे येथे स्पष्ट केलीच आहे. या निकालानंतरची आवश्यक असलेली कार्यवाही विधानसभा अध्यक्ष, सभापती, विधानसभा सचिवालय करतील. विधीमंडळ त्याबाबत विचार करेल, असे ते म्हणाले.सव्वा वर्षापूर्वी कॅबिनेटकडून १२ आमदारांची नावे मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहे. त्यात उर्मिला मातोंडकर, नितीन बारगुडेपाटील, आनंद शिंदे, विदर्भातील काही सहकारी अशांचा समावेश आहे. या यादीला अजून मंजुरी मिळालेली नाही. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करता येईल का, याचा विचार आपण वैयक्तिक करत आहोत. त्याच्याशी पक्षाचा किंवा महाविकास आघाडीचा संबंध नाही. वैयक्तिक पातळीवर अशी याचिका दाखल करता येईल का, याबाबत आपण विधिज्ञांशी चर्चा करत असल्याचे त्यांनी सांगितले.ती कोणाच्या माध्यमातून करावी, याचाही विचार सुरू आहे. ज्याप्रमाणे १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला. त्या पद्धतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती करता येईल का, अशी विनंती न्यायालयाकडे करता येईल का, असा विचार सुरू आहे. तसे झाल्यास त्या १२ लोकांवरील अन्यायही दूर होईल.

सोमवारपर्यंत याबाबत काहीतरी निर्णयापर्यंत येऊ. यावर आपण स्वत: याचिका दाखल करु किंवा ज्या १२ जणांची नावे या यादीत आहेत, त्यांच्यापैकी कोणी याचिका दाखल करेल, असे काहीही निश्चित नाही. विधिज्ञांशी चर्चा करुन मगच त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. जर पुढे जाऊन काही फरक पडणार नाही, असा सल्ला विधिज्ञांनी दिला तर पुढे जाणार नाही, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMLAआमदारUday Samantउदय सामंतbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी