रत्नागिरी: आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर पुणे, कोल्हापूरनंतर रत्नागिरीतराष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे तालुकाध्यक्ष अॅड. देवेंद्र ऊर्फ बंटी वणजू आणि शहराध्यक्ष अॅड. राकेश आंब्रे यांनी आपल्या पदांचे तडकाफडकी राजीनामे दिल्याने खळबळ उडाली आहे. महायुतीमधील जागावाटपावरून आणि "गलिच्छ राजकारणाला" कंटाळून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
वाचा: मंत्र्यांच्या सभा गाजविणाऱ्या रणरागिणीला उमेदवारी नाकारली, एकटी लढणार...'आम्हालाच राष्ट्रवादीचा कटू अनुभव आला'काही दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनी महायुतीत राष्ट्रवादीबद्दल तक्रार केली होती, त्यावर वणजू यांनी सडेतोड उत्तर दिले. "नगरपालिका निवडणुकीत आम्हाला दोन जागा देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात एकही जागा दिली नाही. त्यामुळे कटू अनुभव आम्हालाच आला आहे," असे वणजू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
वाचा: झेडपीसाठी उमेदवारी नाकारताच माजी आमदार पुत्राने ठोकला रामराम, भाजपच्या वाटेवरनिवडणुकीत सक्रिय राहणार नाहीवणजू आणि आंब्रे यांनी भविष्यातील भूमिकेवरही स्पष्ट भाष्य केले आहे. "यापुढे केवळ सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करू, कोणत्याही राजकीय प्रक्रियेत सक्रिय सहभाग नसेल," असे जाहीर केले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर दोन प्रमुख नेत्यांनी 'अलिप्त' राहण्याचा घेतलेला निर्णय राष्ट्रवादीसाठी मोठा फटका मानला जात आहे.
Web Summary : Ahead of local elections, Ajit Pawar's NCP faction in Ratnagiri suffered a blow as two key leaders resigned, citing dissatisfaction with seat allocation within the Mahayuti alliance and 'dirty politics'. They will remain ordinary workers, impacting NCP's election prospects.
Web Summary : स्थानीय चुनावों से पहले, अजित पवार की राकांपा गुट को रत्नागिरी में एक झटका लगा क्योंकि दो प्रमुख नेताओं ने महायुति गठबंधन के भीतर सीट आवंटन और 'गंदी राजनीति' से असंतुष्ट होकर इस्तीफा दे दिया। वे साधारण कार्यकर्ता बने रहेंगे, जिससे राकांपा की चुनावी संभावनाओं पर असर पड़ेगा।