शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

साडवलीत ट्रकमधील आठ लाखाचा मुद्देमाल चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 15:58 IST

घराशेजारी उभ्या असलेल्या ट्रकमधील मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना साडवली येथे बुधवारी मध्यरात्री घडली आहे. कोल्हापूर येथून ट्रान्सपोर्टचा माल भरून आलेला ट्रक साडवली येथे उभा केला होता. यातील तब्बल ८ लाख १४ हजार ३८७ रूपये किमतीचा माल चोरीला गेल्याची फिर्याद ट्रकमालक सुभाष जाधव यांनी देवरूख पोलीस ठाण्यात दिली आहे.

ठळक मुद्देसाडवलीत ट्रकमधील आठ लाखाचा मुद्देमाल चोरीसचोरीची फिर्याद देवरूख पोलीस ठाण्यात

देवरूख : घराशेजारी उभ्या असलेल्या ट्रकमधील मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना साडवली येथे बुधवारी मध्यरात्री घडली आहे. कोल्हापूर येथून ट्रान्सपोर्टचा माल भरून आलेला ट्रक साडवली येथे उभा केला होता. यातील तब्बल ८ लाख १४ हजार ३८७ रूपये किमतीचा माल चोरीला गेल्याची फिर्याद ट्रकमालक सुभाष जाधव यांनी देवरूख पोलीस ठाण्यात दिली आहे.सुभाष कृष्णा जाधव ( साडवली ) यांनी आपल्या ७०९ (एमएच- ०४ - सीए- ८७४३) या ट्रकमधून कोल्हापूर येथून ट्रान्सपोर्टचा माल आणला होता. हा माल संगमेश्वर येथे न्यायचा होता. खोबऱ्याची पोती, चहा पावडर, मिरची पावडर, हळद पावडर, कापड बंडल आणि सनमायका, प्लायवूड असा लाखोंचा माल ट्रकमध्ये भरला होता. जाधव बुधवारी रात्री उशीरा कोल्हापुरहून साडवली येथे आल्याने हा माल गुरूवारी सकाळी संगमेश्वर येथे पोहोच करू, असे ठरवून त्यांनी आपला ट्रक आपल्या घराशेजारी उभा करून ठेवला होता.रात्री ११.३० ते ५.३० या वेळेत चोरट्याने ही गाडी पळवून नेली व आतील ८ लाख १४ हजार ३८७ रूपयांचा ऐवज लंपास केला. अनावधानाने ट्रकची चावी ट्रकला राहिल्याची संधी चोरट्याने साधल्याची माहिती प्राप्त झाली आहे. गुरूवारी सकाळी जाधव यांचा मुलगा घराबाहेर आला असता त्याला ट्रक जागेवर दिसला नाही. त्याने ही बाब लगेच वडिलांना सांगितली. यावरून जाधव यांनी गाडीची शोधाशोध सुरू केली. जाधव यांना त्यांच्या एका नातेवाईकाचा फोन आला व त्यांनी तुमचा ट्रक कोसुंबच्या माळावर असल्याचे सांगितले.जाधव यांनी कोसुंबचा माळ गाठत गाडी असल्याची खात्री केली. यावेळी ट्रकमधील माल चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. गाडीमधील तब्बल ६ लाख ७० हजार रूपये किमतीची खोबºयाची १४९ पोती, ३३ हजार रूपयांची चहा पावडर, मिरची पावडर, हळद पावडर, कापड बंडल, प्लायवूड आणि सनमायका असा १ लाख ११ हजार ३८७ किमतीचा माल चोरट्यांनी चोरून नेला असल्याचे नमूद केले आहे.साखरप्यात नाकाबंदीचोरीचे स्वरूप लक्षात घेवून श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. मात्र हे श्वान मागोवा घेण्यात अपयशी ठरल्याचे दिसून आले. सायंकाळी उशीरापर्यंत चोरट्यांचा मागोवा घेण्याचे काम देवरूख पोलीसांकडून सुरू होते. यासाठी साखरपा येथेही नाकाबंदी करण्यात आली होती

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरीPoliceपोलिस