शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

Ratnagiri: वर्ग सुटला अन् शाळेचे छप्पर कोसळले, सुदैवाने २८ विद्यार्थी वाचले; शिरवली येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 14:35 IST

दुर्घटनेनंतर पालकांनी खेडच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले

खेड (जि. रत्नागिरी) : गेले दोन दिवस काेसळणाऱ्या संततधार पावसामुळे शिरवली (ता. खेड) येथील प्राथमिक शाळेच्या एका वर्गखोलीचे काैलारू छप्पर सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कोसळले. सुदैवाने शाळा सुटल्यानंतर ही दुर्घटना घडल्याने शाळेतील २८ विद्यार्थी वाचले आहेत. अन्यथा माेठी दुर्घटना घडली असती.शिरवली येथील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा १९५४ मध्ये बांधण्यात आली आहे. या शाळेत पहिली ते सातवीचे वर्ग असून, २८ पटसंख्या आहे. या शाळेला सत्तर वर्षे होऊनही शाळेच्या दुरुस्तीसाठी कोणत्याही प्रकारचा निधी खर्च पडलेला नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. शाळेच्या दुरुस्तीबाबत ग्रामस्थांनी वारंवार पत्रव्यवहार करूनही शाळेच्या दुरुस्तीकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे नादुरुस्त शाळेच्या वर्गखाेलीचे छप्पर सोमवारी मुसळधार पावसात काेसळले. सुदैवाने वर्गात विद्यार्थी नसल्याने काेणालाही दुखापत झालेली नाही.

या दुर्घटनेनंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी मंगळवारी खेडच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. शाळेच्या इमारतीचे उर्वरित छतही मुसळधार पावसात केव्हाही पडू शकते, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करता जोपर्यंत विद्यार्थ्यांना सुरक्षित पर्याय व्यवस्था होत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना त्या शाळेत पाठवले जाणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून ही शाळा मोडकळीच आल्याबाबतचे पत्र ग्रामस्थांकडून गटशिक्षणाधिकारी यांना दिले जात आहे. मात्र, दुरुस्तीच्या कामासाठीही शासनाकडून निधी न आल्यामुळे दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळेच ही दुर्घटना घडली आहे. योग्यवेळी दुरुस्ती देखभाल झाली असती तर आज हे छप्पर काेसळले नसते. - वसंत गुरव, माजी सरपंच, शिरवली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसSchoolशाळा