शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

पक्षात राहून विरोधात काम करणाराच खरा शत्रू, कार्यकर्ता मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 15:59 IST

शिवसेनेतील लोकांनी तरी प्रभाकर शिंदे यांना जरी मतदान केले असते, तरी पक्षाचे डिपॉझीट वाचले असते

चिपळूण : चिपळूण मतदारसंघात ज्यावेळी राष्ट्रवादीचे पहिले आमदार निवडून आले, तेव्हा माझ्याविरोधात कोणी काम केले, हे समोर आहे. शिवसेनेतील लोकांनी तरी प्रभाकर शिंदे यांना जरी मतदान केले असते, तरी पक्षाचे डिपॉझीट वाचले असते. विरोधकांपेक्षा पक्षात राहून पक्षाच्या विरोधात काम करणारा हाच शत्रू असतो आणि तेच धोकादायक ठरत आहे, असे रोखठोक विधान उद्धवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी केले.शहरातील बांदल सभागृहात उद्धवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यात अपेक्षेप्रमाणे आमदार भास्कर जाधव यांनी जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत संगमेश्वर तालुक्यातील कार्यकर्त्याना उमेदवारी नको होती, पक्षाचा आमदार हवा होता. मात्र, चिपळूणमध्ये आपल्याविरोधात बैठका सुरू होत्या. आता कित्येक वर्षे वाट पाहावी लागणार आहे.मेळाव्यात उपनेते बाळ माने, सहदेव बेटकर, जिल्हाप्रमुख बाळाराम खेडेकर, दत्ता कदम, जिल्हा संघटक संतोष थेराडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अरुणा आंबे, विभाग प्रमुख सचिन शेट्ये, बाळा कदम, तालुकाप्रमुख पप्या चव्हाण, युवासेनेचे विक्रांत जाधव, भय्या कदम उपस्थित होते.

चिपळूणची जागा घालवली कोणी?

  • उद्धवसेनेला चिपळूणची जागा परत मिळावी अशी मागणी आता केली जात आहे; पण आधीच्या निवडणुकीत उद्धवसेनेला मिळत असलेली जागा घालवली कोणी, असा प्रश्न आमदार जाधव यांनी केला.
  • संतोष थेराडे, प्रताप शिंदे, बाळा कदम, विनोद झगडे, तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारा. चिपळूणची जागा कोणामुळे गेली, तुम्ही ही जागा घालवलीत, असा थेट हल्लाही त्यांनी यावेळी केला.
  • शरद पवार यांनी ही जागा उद्धवसेनेला दिली होती. मीच त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यानुसार बैठक लावून मी प्रयत्नही सुरू केले होते. मात्र, मला जागा मिळू नये म्हणून विरोध सुरू झाला, बैठका सुरू झाल्या. काहींनी तर दुकानेच थाटली. शेवटी घडायचे तेच घडले. आता कित्येक वर्षे येथे उद्धवसेनेचा आमदार होण्याची वाट बघत बसा, अशी खदखद त्यांनी व्यक्त केली.

कार्यकर्त्यांचे कान टोचलेआज पक्षाची स्थिती वाईट आहे. कोणी निघून गेला की काहीच फरक पडत नाही, हे वारंवार सांगितले जाते. मात्र, परिस्थिती तशी नाही. जाणारा कार्यकर्ता आपणच मोठा केलेला असतो. त्याचे कर्तृत्व पाहूनच त्याला पद दिलेले असते. त्यामुळे नेहमी फरक पडत नाही, असे म्हणण्यापेक्षा कोणी गेले तरी फरक पडू देणार नाही, असा निर्धार करून पुढे जाऊया आणि जुन्यांना घेऊन पूर्वीचे वैभव प्राप्त करूया, अशा शब्दांत आमदार जाधव यांनी कान टोचले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBhaskar Jadhavभास्कर जाधवChiplunचिपळुण