शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
2
IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलिन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली
3
"ज्यांनी तुम्हाला हिंदुत्व शिकवलं त्या बाळासाहेबांच्या कुटुंबाला..."; बाळा नांदगावकरांचा टोला
4
"मुंबईचे मारेकरी कोण? राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरले"; भाजपाचा ठाकरेंना टोला
5
निर्मला सीतारामन यांचं एक वक्तव्य आणि 'या' शेअर्सना लागले पंख; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
6
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
7
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
8
Chandrapur Farmer : किडनी वीक पण कर्ज फेड ! सावकाराच्या सांगण्यावरून शेतकऱ्याने ८ लाखांना विकली किडनी; कंबोडियात जाऊन केले ऑपेरेशन
9
निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
10
धक्कादायक! ७ वर्षांच्या मुलीचा तिसऱ्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू, आईनेच खाली फेकल्याचा संशय  
11
“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
12
IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली
13
Marriage: लग्नात आधी वधू वरमाला का घालते? त्यामागे काय आहे धार्मिक आणि सामाजिक कारण 
14
कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी
15
विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा पोहचले वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे घेतले आशीर्वाद
16
"अरे मर्दा, मागे तर बघ, आम्ही बिहारहून आलोय!" Vaibhav Suryavanshi याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
17
८ दिवसांत १८० टक्क्यांची तेजी; सातत्यानं 'या' शेअरला लागतंय अपर सर्किट, केडियांचीही आहे गुंतवणूक
18
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
19
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
20
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
Daily Top 2Weekly Top 5

पक्षात राहून विरोधात काम करणाराच खरा शत्रू, कार्यकर्ता मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 15:59 IST

शिवसेनेतील लोकांनी तरी प्रभाकर शिंदे यांना जरी मतदान केले असते, तरी पक्षाचे डिपॉझीट वाचले असते

चिपळूण : चिपळूण मतदारसंघात ज्यावेळी राष्ट्रवादीचे पहिले आमदार निवडून आले, तेव्हा माझ्याविरोधात कोणी काम केले, हे समोर आहे. शिवसेनेतील लोकांनी तरी प्रभाकर शिंदे यांना जरी मतदान केले असते, तरी पक्षाचे डिपॉझीट वाचले असते. विरोधकांपेक्षा पक्षात राहून पक्षाच्या विरोधात काम करणारा हाच शत्रू असतो आणि तेच धोकादायक ठरत आहे, असे रोखठोक विधान उद्धवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी केले.शहरातील बांदल सभागृहात उद्धवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यात अपेक्षेप्रमाणे आमदार भास्कर जाधव यांनी जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत संगमेश्वर तालुक्यातील कार्यकर्त्याना उमेदवारी नको होती, पक्षाचा आमदार हवा होता. मात्र, चिपळूणमध्ये आपल्याविरोधात बैठका सुरू होत्या. आता कित्येक वर्षे वाट पाहावी लागणार आहे.मेळाव्यात उपनेते बाळ माने, सहदेव बेटकर, जिल्हाप्रमुख बाळाराम खेडेकर, दत्ता कदम, जिल्हा संघटक संतोष थेराडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अरुणा आंबे, विभाग प्रमुख सचिन शेट्ये, बाळा कदम, तालुकाप्रमुख पप्या चव्हाण, युवासेनेचे विक्रांत जाधव, भय्या कदम उपस्थित होते.

चिपळूणची जागा घालवली कोणी?

  • उद्धवसेनेला चिपळूणची जागा परत मिळावी अशी मागणी आता केली जात आहे; पण आधीच्या निवडणुकीत उद्धवसेनेला मिळत असलेली जागा घालवली कोणी, असा प्रश्न आमदार जाधव यांनी केला.
  • संतोष थेराडे, प्रताप शिंदे, बाळा कदम, विनोद झगडे, तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारा. चिपळूणची जागा कोणामुळे गेली, तुम्ही ही जागा घालवलीत, असा थेट हल्लाही त्यांनी यावेळी केला.
  • शरद पवार यांनी ही जागा उद्धवसेनेला दिली होती. मीच त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यानुसार बैठक लावून मी प्रयत्नही सुरू केले होते. मात्र, मला जागा मिळू नये म्हणून विरोध सुरू झाला, बैठका सुरू झाल्या. काहींनी तर दुकानेच थाटली. शेवटी घडायचे तेच घडले. आता कित्येक वर्षे येथे उद्धवसेनेचा आमदार होण्याची वाट बघत बसा, अशी खदखद त्यांनी व्यक्त केली.

कार्यकर्त्यांचे कान टोचलेआज पक्षाची स्थिती वाईट आहे. कोणी निघून गेला की काहीच फरक पडत नाही, हे वारंवार सांगितले जाते. मात्र, परिस्थिती तशी नाही. जाणारा कार्यकर्ता आपणच मोठा केलेला असतो. त्याचे कर्तृत्व पाहूनच त्याला पद दिलेले असते. त्यामुळे नेहमी फरक पडत नाही, असे म्हणण्यापेक्षा कोणी गेले तरी फरक पडू देणार नाही, असा निर्धार करून पुढे जाऊया आणि जुन्यांना घेऊन पूर्वीचे वैभव प्राप्त करूया, अशा शब्दांत आमदार जाधव यांनी कान टोचले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBhaskar Jadhavभास्कर जाधवChiplunचिपळुण