शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

‘रत्नागिरी हापूस’चे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 17:49 IST

यावर्षीच्या एकूण हंगामात आंबा उत्पादन २५ ते ३० टक्केच

रत्नागिरी : स्थानिक बाजारपेठेतरत्नागिरी हापूस’ विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. मात्र, आंब्याचे दर अजूनही सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारे असल्याने सर्वसामान्यांसाठी आंबा ‘अगाेड’च आहे. सध्या बाजारात ८०० ते १६०० रुपये डझन दराने आंब्याची विक्री केली जात आहे. हा दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.यावर्षी नैसर्गिक दृष्टचक्रामुळे जेमतेम २५ ते ३० टक्केच आंबा उत्पादन आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासूनच उष्म्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे फळांची माेठ्या प्रमाणात गळ झाली. शिवाय फळे भाजली असून, फळांवर डाग पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे. वाढत्या उष्म्यामुळे तयार आंबा शेतकरी विक्रीसाठी मुंबई, पुणे बाजारात पाठवत आहेत. मात्र, आंब्याची आवक वाढल्याने दरही घसरले आहेत. त्यामुळे आता स्थानिक बाजारात आंबा विक्रीसाठी येऊ लागला आहे.स्थानिक बाजारपेठेत सध्या हापूस ८०० ते १६०० रुपये डझन आहे. हा दर सर्वसामान्यांना न परवडणारा आहे. शिमगाेत्सवासाठी गावी आलेल्या काही चाकरमान्यांनी किरकाेळ स्वरूपात हापूसची खरेदी केली. मात्र, चढ्या दरामुळे खरेदीचे प्रमाण कमी आहे. सध्या पायरीलाही हापूसचा दर असल्याने आंबा अजूनही ‘अगाेड’च राहिला आहे.

कच्चा-पिका आंबाकच्चा व पिका दोन्ही प्रकारचा आंबा विक्रीसाठी उपलब्ध आहे. पिकलेल्या आंब्याला कच्च्यापेक्षा डझनाला १०० ते २०० रुपये जास्त मोजावे लागत आहेत. सहा डझनपासून चार डझन आकाराची फळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कच्च्यापेक्षा पिकलेल्या आंब्याला वाढती मागणी असून, एक व दोन डझनचे बाॅक्स विक्रीसाठी आले आहेत.

यावर्षीच्या एकूण हंगामात आंबा उत्पादन २५ ते ३० टक्केच आहे. सुरुवातीचा आंबा कमी आहे. एप्रिलमध्ये आवक वाढेल, पुन्हा मे मध्ये आवक कमी होईल. गतवर्षी या हंगामात आंबा उत्पादन जास्त असल्यामुळे दर कमी होते. परंतु, यावर्षी आंबा उत्पादन कमी असल्यामुळे दर टिकून आहेत. - सतीश पवार, विक्रेता, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाMarketबाजार