शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

जनतेचे रक्षण करणारे पोलिस आधुनिकच हवेत : उदय सामंत; रत्नागिरी पोलिस दलामार्फत व्हीएमएस प्रणाली सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 17:06 IST

रत्नागिरी : जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांना आधुनिक केले पाहिजे. त्यांना सुविधा दिल्या पाहिजेत. त्याचबरोबर त्यांच्यावरचा ताण कमी केला पाहिजे. ...

रत्नागिरी : जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांना आधुनिक केले पाहिजे. त्यांना सुविधा दिल्या पाहिजेत. त्याचबरोबर त्यांच्यावरचा ताण कमी केला पाहिजे. पोलिसांबद्दल आदरयुक्त भीती असलीच पाहिजे, त्याचबरोबर पोलिसांनाही जनतेबद्दल प्रेम हवे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी पोलिस दलाच्या व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम, १० चारचाकी वाहने व १४ ई-बाइक यांच्या लोकार्पणप्रसंगी केले.शहरातील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात गुरुवारी रत्नागिरी पोलिस दलामार्फत व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टम (VMS), १० चारचाकी वाहने आणि १४ ‘सी प्रहरी’ (ई-बाइक) यांचा लोकार्पण सोहळा व उद्घाटनमंत्री सामंत यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. या आधुनिक प्रणालीचा उपयोग जनतेसाठी व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार भास्कर जाधव, आमदार किरण सामंत, विलास चाळके, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, डीवायएसपी राधिका फडके, परिवीक्षाधीन डीवायएसपी निखिल पाटील, शिवप्रसाद तारवे उपस्थित होते.

पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात नागरिकांच्या सुविधेसाठी रत्नागिरी पोलिस दलामार्फत VMS प्रणाली सुरू करण्यात आली आहे. गुन्हे रोखण्यासाठी गस्त वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पोलिसांकरिता १० चारचाकी वाहने तसेच पर्यटकांची सुरक्षितता आणि समुद्रकिनाऱ्यावरील दुर्घटना रोखण्यासाठी गस्त वाढविण्याच्या दृष्टीने १४ ‘सी प्रहरी‘ची (ई-बाइक) नव्याने रत्नागिरी पोलिस दलाच्या ताफ्यात भर पडली असल्याचे सांगितले.आमदार जाधव यांनी नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून गुन्ह्यांची एकल करून त्यांना शिक्षा देण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यांना तोंड देत पोलिस त्यांचे रक्षण करीत असल्याचे म्हटले. यावेळी पोलिस अधीक्षक आणि त्यांच्या जिल्हा दलाच्या कार्याबद्दल मंत्री सामंत आणि आमदार जाधव यांनी मनापासून काैतुक केले. कार्यक्रमादरम्यान सायबर, अपघात आदी गुन्ह्याबाबत माहितीपट दाखविण्यात आले. अपर पाेलिस अधीक्षक गायकवाड यांनी आभारप्रदर्शन केले. मंजिरी गोखले आणि कश्मिरा सावंत यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतPoliceपोलिस