शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
3
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
4
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
5
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
6
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
7
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
8
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
9
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
10
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
11
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
12
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
13
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
14
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
15
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
16
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
17
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
18
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
19
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
20
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!

जनतेचे रक्षण करणारे पोलिस आधुनिकच हवेत : उदय सामंत; रत्नागिरी पोलिस दलामार्फत व्हीएमएस प्रणाली सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 17:06 IST

रत्नागिरी : जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांना आधुनिक केले पाहिजे. त्यांना सुविधा दिल्या पाहिजेत. त्याचबरोबर त्यांच्यावरचा ताण कमी केला पाहिजे. ...

रत्नागिरी : जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांना आधुनिक केले पाहिजे. त्यांना सुविधा दिल्या पाहिजेत. त्याचबरोबर त्यांच्यावरचा ताण कमी केला पाहिजे. पोलिसांबद्दल आदरयुक्त भीती असलीच पाहिजे, त्याचबरोबर पोलिसांनाही जनतेबद्दल प्रेम हवे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी पोलिस दलाच्या व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम, १० चारचाकी वाहने व १४ ई-बाइक यांच्या लोकार्पणप्रसंगी केले.शहरातील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात गुरुवारी रत्नागिरी पोलिस दलामार्फत व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टम (VMS), १० चारचाकी वाहने आणि १४ ‘सी प्रहरी’ (ई-बाइक) यांचा लोकार्पण सोहळा व उद्घाटनमंत्री सामंत यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. या आधुनिक प्रणालीचा उपयोग जनतेसाठी व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार भास्कर जाधव, आमदार किरण सामंत, विलास चाळके, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, डीवायएसपी राधिका फडके, परिवीक्षाधीन डीवायएसपी निखिल पाटील, शिवप्रसाद तारवे उपस्थित होते.

पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात नागरिकांच्या सुविधेसाठी रत्नागिरी पोलिस दलामार्फत VMS प्रणाली सुरू करण्यात आली आहे. गुन्हे रोखण्यासाठी गस्त वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पोलिसांकरिता १० चारचाकी वाहने तसेच पर्यटकांची सुरक्षितता आणि समुद्रकिनाऱ्यावरील दुर्घटना रोखण्यासाठी गस्त वाढविण्याच्या दृष्टीने १४ ‘सी प्रहरी‘ची (ई-बाइक) नव्याने रत्नागिरी पोलिस दलाच्या ताफ्यात भर पडली असल्याचे सांगितले.आमदार जाधव यांनी नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून गुन्ह्यांची एकल करून त्यांना शिक्षा देण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यांना तोंड देत पोलिस त्यांचे रक्षण करीत असल्याचे म्हटले. यावेळी पोलिस अधीक्षक आणि त्यांच्या जिल्हा दलाच्या कार्याबद्दल मंत्री सामंत आणि आमदार जाधव यांनी मनापासून काैतुक केले. कार्यक्रमादरम्यान सायबर, अपघात आदी गुन्ह्याबाबत माहितीपट दाखविण्यात आले. अपर पाेलिस अधीक्षक गायकवाड यांनी आभारप्रदर्शन केले. मंजिरी गोखले आणि कश्मिरा सावंत यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतPoliceपोलिस