शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

रत्नागिरी जिल्ह्याला गुवाहाटी दौऱ्याचे फलित लवकरच मिळेल : उदय सामंत

By संदीप बांद्रे | Published: December 02, 2022 7:22 PM

जिल्ह्याबाहेरील लोकांकडून माथी भडकवण्याचे काम

चिपळूण : जिल्ह्याला साडेसात वर्षानंतर विद्यमान सरकारमुळे स्थानिक पालकमंत्री मिळाला. पालकमंत्री या नात्याने एका दिवसात ३०० कोटीची कामे मंजूर करू शकलाे. मुख्यमंत्री आल्यास ते ३ हजार कोटीचा निधी देतील. हे गुवाहाटी दौऱ्याचे फलित असून, त्याचे फळ लवकरच जिल्ह्याला मिळेल, असा विश्वास पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चिपळूण येथे व्यक्त केला.उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शहरातील विविध विकासकामांची भूमिपूजन व उद्घाटने शुक्रवारी पार पडली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, यावेळी पालकमंत्री सामंत यांनी विविध विकास कामांसाठी सुमारे २०० कोटी निधीची घोषणा केली. चिपळुणात पूरपरिस्थिती न येण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. लाल व निळ्या पूररेषेबाबत लवकरच मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल.नगर परिषदच्या बहाद्दूरशेख नाका येथील औद्योगिक वसाहतीत बचत गटाच्या इमारतीसाठी १ कोटी रुपये, गोवळकोट किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याची जागा संपादीत करण्यासाठी आवश्यक निधी, शहरातील रस्त्यासाठी नगरोत्थानमधून साडेचार कोटीचा निधी मंजूर केल्याचे सांगितले.तसेच शिंदे - फडणवीस सरकारच्या माध्यमातून चिपळूण शहराचा ऐतिहासिक ठेवा जपण्याचा प्रयत्न केला जाईल. चिपळूणवर पुराचे पुन्हा गंभीर संकट येऊ नये, यासाठी सत्ताधारी राज्यसरकार कटीबद्ध असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्ह्याबाहेरील लोकांकडून माथी भडकवण्याचे कामनाणार प्रकल्पाविषयी सुरुवातीला आपली व इतरांचीही भूमिका विरोधी होती हे मान्य आहे, पण थेट कायम स्वरूपी ७ हजार नोकऱ्या देणाऱ्या या प्रकल्पाला आता विरोध करून चालणार नाही. जिल्ह्यातील तरूणांना नोकऱ्या हव्या असतील तर येणाऱ्या प्रकल्पांना विरोध करून चालणार नाही. प्रकल्प येण्यासाठी आता समर्थन करणाऱ्या संघर्ष समित्या स्थापन व्हायला हव्यात. मात्र, दुर्दैवाने सध्या जिल्ह्याबाहेरील लोक स्थानिकांची माथी भडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. घरा-घरात भांडणे लावण्याचे प्रकार त्यांनी सुरू केलेत. जिल्ह्यात प्रकल्प आले तरच जिल्ह्याचा कायापालट होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतguwahati-pcगौहती