शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

Uday Samant: 'ती' भाजपची जुनी पद्धतच, मंत्री उदय सामंतांनी लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 15:58 IST

मुख्यमंत्र्यांनी अपक्षांची बैठक का बाेलावली हे विचारण्याचा मला अधिकार नाही. ताे त्यांचा अधिकार आहे. अपक्षांच्या विकासात्मक काही अडीअडचणी असतील त्या साेडविण्यासाठी त्यांनी बैठक बाेलावली असेल.

रत्नागिरी : रत्नागिरी विमानतळाचे काम संपत आले आहे याची जाणीव भाजपवाल्यांना झाली आहे. ही त्यांची एक स्टाईल आहे. काम पूर्ण होत असल्याचे दिसले की, आम्हीच केले हे दाखविण्याची त्यांची पद्धत आहे. श्रेय कोणालाही घेऊ देत पण रत्नागिरीच्या धावपट्टीवरुन विमान टेकऑफ झाले पाहिजे, ही आमची जबाबदारी आहे. त्यासाठीच राज्य सरकारने निधी दिला आहे, अशी स्पष्ट भूमिका उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मांडली.मंत्री उदय सामंत शुक्रवारी रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रत्नागिरीचे विमानतळ लवकरच सुरु होणार असल्याचे सांगितले.अपक्षांची बैठक झाल्यानंतरच कळेलमुख्यमंत्र्यांनी अपक्षांची बैठक का बाेलावली हे विचारण्याचा मला अधिकार नाही. ताे त्यांचा अधिकार आहे. अपक्षांच्या विकासात्मक काही अडीअडचणी असतील त्या साेडविण्यासाठी त्यांनी बैठक बाेलावली असेल. ती बैठक झाल्यानंतरच त्यांनी बैठक का बाेलावली आहे, हे कळेल, असे मत मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.ही 'त्यांची' एक स्टाईलविमानतळाच्या कामाकडे खासदारांचे दुर्लक्ष हाेत असल्याचा आराेप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. विमानतळाचे काम नारायण राणे यांच्या प्रयत्नातून पूर्ण करण्यात येणार असल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्याबाबत मंत्री सामंत यांना विचारले असता ते म्हणाले की, त्यांना मी शुभेच्छा देताे. रत्नागिरी विमानतळाचे काम संपत आले आहे याची जाणीव भाजपवाल्यांना झाली आहे. ही त्यांची एक स्टाईल आहे. काम पूर्ण हाेत असल्याचे दिसले की, आम्हीच केले हे दाखविण्याची त्यांची पद्धत आहे. खरंतरं मला आनंद वाटताे, मला त्यांचे अभिनंदन करायचे आहे. त्यांनी रत्नागिरीकरांना दाखवून दिले आहे की, रत्नागिरी विमानतळाचे काम आता हाेणार आहे.ही आमची जबाबदारीखासदार विनायक राऊत यांनी चिपीचे विमानतळ सुरु करून दाखवले. रत्नागिरीच्या बाबतीत ते सकारात्मक असून, या विमानतळासाठी राज्य सरकारने १०० काेटी रुपये दिले आहेत. त्यासंदर्भातील भूसंपादनाची नाेटीस देणे, त्यासाठी बैठका घेणे हे मी स्वत: केले आहे. त्यामुळे श्रेय काेणालाही लाटू दे त्याच्याशी मला घेणदेण नाही. हा रत्नागिरीकरांच्या विकासाचा प्रश्न आहे. या धावपट्टीवरुन विमान टेकऑफ झाले पाहिजे, ही आमची जबाबदारी आहे. त्यासाठीच राज्य सरकारने निधी दिला आहे, असे मंत्री उदय सामंत म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतBJPभाजपा