शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

Uday Samant: 'ती' भाजपची जुनी पद्धतच, मंत्री उदय सामंतांनी लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 15:58 IST

मुख्यमंत्र्यांनी अपक्षांची बैठक का बाेलावली हे विचारण्याचा मला अधिकार नाही. ताे त्यांचा अधिकार आहे. अपक्षांच्या विकासात्मक काही अडीअडचणी असतील त्या साेडविण्यासाठी त्यांनी बैठक बाेलावली असेल.

रत्नागिरी : रत्नागिरी विमानतळाचे काम संपत आले आहे याची जाणीव भाजपवाल्यांना झाली आहे. ही त्यांची एक स्टाईल आहे. काम पूर्ण होत असल्याचे दिसले की, आम्हीच केले हे दाखविण्याची त्यांची पद्धत आहे. श्रेय कोणालाही घेऊ देत पण रत्नागिरीच्या धावपट्टीवरुन विमान टेकऑफ झाले पाहिजे, ही आमची जबाबदारी आहे. त्यासाठीच राज्य सरकारने निधी दिला आहे, अशी स्पष्ट भूमिका उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मांडली.मंत्री उदय सामंत शुक्रवारी रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रत्नागिरीचे विमानतळ लवकरच सुरु होणार असल्याचे सांगितले.अपक्षांची बैठक झाल्यानंतरच कळेलमुख्यमंत्र्यांनी अपक्षांची बैठक का बाेलावली हे विचारण्याचा मला अधिकार नाही. ताे त्यांचा अधिकार आहे. अपक्षांच्या विकासात्मक काही अडीअडचणी असतील त्या साेडविण्यासाठी त्यांनी बैठक बाेलावली असेल. ती बैठक झाल्यानंतरच त्यांनी बैठक का बाेलावली आहे, हे कळेल, असे मत मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.ही 'त्यांची' एक स्टाईलविमानतळाच्या कामाकडे खासदारांचे दुर्लक्ष हाेत असल्याचा आराेप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. विमानतळाचे काम नारायण राणे यांच्या प्रयत्नातून पूर्ण करण्यात येणार असल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्याबाबत मंत्री सामंत यांना विचारले असता ते म्हणाले की, त्यांना मी शुभेच्छा देताे. रत्नागिरी विमानतळाचे काम संपत आले आहे याची जाणीव भाजपवाल्यांना झाली आहे. ही त्यांची एक स्टाईल आहे. काम पूर्ण हाेत असल्याचे दिसले की, आम्हीच केले हे दाखविण्याची त्यांची पद्धत आहे. खरंतरं मला आनंद वाटताे, मला त्यांचे अभिनंदन करायचे आहे. त्यांनी रत्नागिरीकरांना दाखवून दिले आहे की, रत्नागिरी विमानतळाचे काम आता हाेणार आहे.ही आमची जबाबदारीखासदार विनायक राऊत यांनी चिपीचे विमानतळ सुरु करून दाखवले. रत्नागिरीच्या बाबतीत ते सकारात्मक असून, या विमानतळासाठी राज्य सरकारने १०० काेटी रुपये दिले आहेत. त्यासंदर्भातील भूसंपादनाची नाेटीस देणे, त्यासाठी बैठका घेणे हे मी स्वत: केले आहे. त्यामुळे श्रेय काेणालाही लाटू दे त्याच्याशी मला घेणदेण नाही. हा रत्नागिरीकरांच्या विकासाचा प्रश्न आहे. या धावपट्टीवरुन विमान टेकऑफ झाले पाहिजे, ही आमची जबाबदारी आहे. त्यासाठीच राज्य सरकारने निधी दिला आहे, असे मंत्री उदय सामंत म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतBJPभाजपा