शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
3
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
4
सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
5
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
6
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
7
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
8
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
9
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
10
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
11
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
12
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
14
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
15
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
16
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
17
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
18
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
19
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
20
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?

Uday Samant: 'ती' भाजपची जुनी पद्धतच, मंत्री उदय सामंतांनी लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 15:58 IST

मुख्यमंत्र्यांनी अपक्षांची बैठक का बाेलावली हे विचारण्याचा मला अधिकार नाही. ताे त्यांचा अधिकार आहे. अपक्षांच्या विकासात्मक काही अडीअडचणी असतील त्या साेडविण्यासाठी त्यांनी बैठक बाेलावली असेल.

रत्नागिरी : रत्नागिरी विमानतळाचे काम संपत आले आहे याची जाणीव भाजपवाल्यांना झाली आहे. ही त्यांची एक स्टाईल आहे. काम पूर्ण होत असल्याचे दिसले की, आम्हीच केले हे दाखविण्याची त्यांची पद्धत आहे. श्रेय कोणालाही घेऊ देत पण रत्नागिरीच्या धावपट्टीवरुन विमान टेकऑफ झाले पाहिजे, ही आमची जबाबदारी आहे. त्यासाठीच राज्य सरकारने निधी दिला आहे, अशी स्पष्ट भूमिका उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मांडली.मंत्री उदय सामंत शुक्रवारी रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रत्नागिरीचे विमानतळ लवकरच सुरु होणार असल्याचे सांगितले.अपक्षांची बैठक झाल्यानंतरच कळेलमुख्यमंत्र्यांनी अपक्षांची बैठक का बाेलावली हे विचारण्याचा मला अधिकार नाही. ताे त्यांचा अधिकार आहे. अपक्षांच्या विकासात्मक काही अडीअडचणी असतील त्या साेडविण्यासाठी त्यांनी बैठक बाेलावली असेल. ती बैठक झाल्यानंतरच त्यांनी बैठक का बाेलावली आहे, हे कळेल, असे मत मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.ही 'त्यांची' एक स्टाईलविमानतळाच्या कामाकडे खासदारांचे दुर्लक्ष हाेत असल्याचा आराेप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. विमानतळाचे काम नारायण राणे यांच्या प्रयत्नातून पूर्ण करण्यात येणार असल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्याबाबत मंत्री सामंत यांना विचारले असता ते म्हणाले की, त्यांना मी शुभेच्छा देताे. रत्नागिरी विमानतळाचे काम संपत आले आहे याची जाणीव भाजपवाल्यांना झाली आहे. ही त्यांची एक स्टाईल आहे. काम पूर्ण हाेत असल्याचे दिसले की, आम्हीच केले हे दाखविण्याची त्यांची पद्धत आहे. खरंतरं मला आनंद वाटताे, मला त्यांचे अभिनंदन करायचे आहे. त्यांनी रत्नागिरीकरांना दाखवून दिले आहे की, रत्नागिरी विमानतळाचे काम आता हाेणार आहे.ही आमची जबाबदारीखासदार विनायक राऊत यांनी चिपीचे विमानतळ सुरु करून दाखवले. रत्नागिरीच्या बाबतीत ते सकारात्मक असून, या विमानतळासाठी राज्य सरकारने १०० काेटी रुपये दिले आहेत. त्यासंदर्भातील भूसंपादनाची नाेटीस देणे, त्यासाठी बैठका घेणे हे मी स्वत: केले आहे. त्यामुळे श्रेय काेणालाही लाटू दे त्याच्याशी मला घेणदेण नाही. हा रत्नागिरीकरांच्या विकासाचा प्रश्न आहे. या धावपट्टीवरुन विमान टेकऑफ झाले पाहिजे, ही आमची जबाबदारी आहे. त्यासाठीच राज्य सरकारने निधी दिला आहे, असे मंत्री उदय सामंत म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतBJPभाजपा