शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
3
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
4
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
5
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
6
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
7
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
9
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
10
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
11
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
12
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
14
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

परीक्षा घेणारेच पेपर फाेडतात; मग विश्वास ठेवायचा काेणावर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 11:48 AM

टीईटी परीक्षेतील घोटाळा उघडकीस आला असून, परिषदेचा कारभार मनस्ताप वाढवणारा ठरला आहे.

मेहरुन नाकाडे

रत्त्नागिरी : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा परिषदेतर्फे भावी शिक्षकांसाठीपरीक्षा घेण्यात येते. वास्तविक कोरोनामुळे दीड वर्ष लांबलेली परीक्षा घेण्यात आली; परंतु परीक्षा घेणाऱ्यांनीच पेपरफुटीचा घोळ घातल्याने भावी शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. टीईटी परीक्षेतील घोटाळा उघडकीस आला असून, परिषदेचा कारभार मनस्ताप वाढवणारा ठरला आहे.

शिक्षकाची नोकरी मिळविण्यासाठी टीईटी परीक्षा सक्तीची आहे. ही परीक्षा कोरोनामुळे दीड वर्ष लांबली. पेपर क्रमांक १ चे गणित व पेपर क्रमांक २ चे मानसशास्त्र कठीण होते. एकूणच परीक्षा घेताना काठिण्यपातळी राखली गेली. परीक्षेचा निकालही दोन ते तीन टक्के लावला जातो. त्यामुळे परीक्षा पास होणे हे दिव्य असल्याने विद्यार्थी त्याच्यासाठी अथक परिश्रम घेतात; परंतु पेपरफुटीचा घोटाळा बाहेर आल्यामुळे आतापर्यंत विद्यार्थ्यांचे परिश्रम वाया गेले आहेत.

परीक्षा पध्दतीवरील विश्वास कमी होत आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी यापुढे परीक्षा द्यावी का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यापुढे परीक्षा पध्दतीच रद्द करून रिक्त जागांवर गुणवत्तेनुसार शिक्षक भरती करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून करण्यात येत आहे.

दीड वर्षानंतर परीक्षा, त्यातही घाेळ

टीईटी परीक्षेत पेपरफुटीमधील घोटाळा उघडकीस आला असल्याने भविष्यात परीक्षा परिषदेवरील विश्वास कमी होऊ लागला आहे.

कोरोनामुळे लांबलेली परीक्षा गेल्या महिन्यात झाली; परंतु परीक्षेतील काठिण्यपातळी राखली गेली. गणित व मानसशास्त्र विषयातील प्रश्न कठीण असल्याने विद्यार्थ्यांना घाम फुटला होता.

जिल्ह्याचा विस्तार पाहता, दोन स्वतंत्र केंद्र ठेवण्याऐवजी एकच केंद्र ठेवले, त्यात उशिरा पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना पेपरला बसता आले नसल्याने नुकसान झाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीexamपरीक्षाTeacherशिक्षक