शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

chiplun flood : पूरमुक्तीच्या चळवळीत श्रेयवादाचा लढा, मंत्रालयातील आजच्या बैठकीकडे चिपळूणवासीयांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 1:59 PM

चिपळूण बचाव समितीच्या आंदोलनाची दखल घेऊन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्रालयात १३ डिसेंबर रोजी गाळप्रश्नी महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

चिपळूण : चिपळूण बचाव समितीच्या आंदोलनाची दखल घेऊन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्रालयात १३ रोजी गाळप्रश्नी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला समितीच्या पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले असले, तरी पालकमंत्री, खासदार व स्थानिक आमदारांना निमंत्रण नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात श्रेयवाद लढाई सुरु झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे आता महसूलमंत्र्याच्या या बैठकीत गाळप्रश्नी ताेडगा निघणार का, हेच पाहायचे आहे.

वाशिष्ठी आणि शिव नदीतील गाळ काढावा, पूररेषेला स्थगिती मिळावी, या मागणीसाठी चिपळूण बचाव समितीने गेल्या सात दिवसापासून साखळी उपोषण सुरू केले आहे. याप्रश्नी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मागणी केल्यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समवेत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेण्यात येणार असल्याचे बचाव समितीला पत्रद्वारे कळवले होते. मात्र, त्यानंतर अवघ्या २४ तासात महसूलमंत्री थोरात यांनी १३ डिसेंबर रोजी मंत्रालयात स्वतंत्र बैठक आयोजित केली आहे.

या बैठकीला चिपळूण बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनाही निमंत्रित केले आहे. या पदाधिकाऱ्यांमध्ये तालुक्याशी प्रत्यक्ष संबंध नसणाऱ्यांचाही समावेश आहे. परंतु, या लढ्यात सुरुवातीपासून पाठपुरावा करत असलेले आमदार शेखर निकम यांच्यासह खासदार विनायक राऊत, पालकमंत्री अॅड. अनिल परब यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे गाळप्रश्नी काॅंग्रेसने श्रेय घेण्यासाठी ही बैठक बाेलावल्याची चर्चा रंगू लागली आहे. मात्र त्याचवेळी थोरात यांच्या बैठकीकडेही सर्वाचे लक्ष वेधले आहे. या बैठकीतून गाळ उपसा, त्यासाठी लागणार निधी व रॉयल्टीबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत या आंदोलनाला उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, भाजपचे प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे. विविध पक्षाचे पदाधिकारी एकत्रित येऊन पक्षविरहीत लढाई सुरू ठेवण्याचा प्रयत्न बचाव समितीकडून केला जात आहे. मात्र, महसूल मंत्र्यांनी बाेलावलेल्या बैठकीमुळे श्रेयवादाची ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे.

श्रेयवादापेक्षा प्रश्न सुटणे महत्त्वाचे

चिपळुणातील गाळप्रश्नी सारेच राजकीय नेतेमंडळी एकवटले आहेत. सर्वांकडून प्रयत्न सुरू असतानाच आमदार शेखर निकम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्याचवेळी खासदार विनायक राऊत यांनी महसूलमंत्र्यांसमवेत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेण्याबाबत पत्र दिले. त्यानंतर काॅंग्रेसने थेट बैठकच बाेलावल्याने श्रेयवादाची ठिणगी पडली. याप्रश्नी श्रेयवादाची लढाई खेळण्यापेक्षा चिपळूणवासीयांचा प्रश्न सुटणे गरजेचे आहे, असा सूर निघत आहे.

चिपळूणच्या गाळप्रश्नी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून या प्रश्नावर तोडगा निघाल्यास किंवा निधी उपलब्ध केल्यास आनंदच होणार आहे. प्रयत्न कोणाचेही असोत मात्र हा प्रश्न सुटणे गरजेचा आहे. - उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीchiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात