शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ ते ३० भाजपा आमदार फोडण्याचं सगळं प्लॅनिंग ठरलं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
3
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
4
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
5
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
6
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
7
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
8
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
9
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
10
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
11
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
12
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
13
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
14
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
15
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
16
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
17
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
18
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
19
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
20
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम

जयगड-डिंगणी रेल्वे प्रकल्पाचे काम स्थानिकांना विश्वासात घेऊन करा : सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 2:37 PM

जयगड-डिंगणी रेल्वे प्रकल्पाचे काम हे प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या गावातील ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच करा, अशा सूचना राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिल्या आहेत.

ठळक मुद्देरेल्वेलाईनच्या बांधकामाबाबत घेतली माहिती, समस्यांबाबतही केली फुणगूस ग्रामस्थांशी चर्चाभूसंपादनाबाबत स्थानिक आमदारांशी चर्चा करू

रत्नागिरी : जयगड-डिंगणी रेल्वे प्रकल्पाचे काम हे प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या गावातील ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच करा, अशा सूचना राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिल्या आहेत. जेडीआरएलच्या मालवाहतूक रेल्वे लाईनच्या कामामुळे उद्भवणाऱ्या  समस्यांबाबत आयोजित बैठकीमध्ये देसाईवाडी - फुणगूस येथे ते बोलत होते.

यावेळी जेडीआरएलचे प्रकल्प समन्वयक राजीव लिमये, अमित चौधरी, वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. एस. के. थोरात, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सावर्डेकर, संगमेश्वरचे तहसीलदार संदीप कदम, जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता बी. डी. साळवी, उपअभियंता पाणीपुरवठा बी. आर. शिंदे, प्रकल्प अभियंता पाटणकर, जिल्हा परिषद शाखा अभियंता पी. एस. पोवार, फुणगूसच्या संरपच प्राची भोसले उपस्थित होत्या.

यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले की, या रेल्वे प्रकल्पाला गावाचा विरोध नाही. प्रकल्प झाल्याने येथील गावांचा विकास होणार आहे. परंतु, प्रकल्पामुळे येथील ग्रामस्थांना येत असलेल्या समस्या व अडचणीही दूर करणे गरजेचे आहे. मी राज्याच्या उद्योगमंत्र्याबरोबरच फुणगूसचा ग्रामस्थही आहे, त्यामुळे या प्रकल्पामुळे येथील गावांना निर्माण होणाºया समस्या दूर करण्यासाठी कटीबध्द आहे.

पाणीपुरवठ्याविषयी बोलताना देसाई म्हणाले की, या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या गावांना विहीर व सोबत पाणीयोजना देण्यात येणार आहे. त्यामुळे अशी पाणीपुरवठा योजना तयार करा की, ज्यामुळे बाधीत गावातील पाण्याच्या प्रश्न कायमाचा सुटेल. भूसंपादनबाबत बोलताना उद्योगमंत्री म्हणाले की, भूसंपादीत करण्यात येणाऱ्या जमिनीच्या दराबाबत आपण स्थानिक आमदारांसोबत सविस्तर चर्चा करु, असे ते म्हणाले.ग्रामस्थ, अधिकाऱ्यांशी केली चर्चा..यावेळी उद्योगमंत्र्यांनी गावातील सहाण तसेच प्रकल्पाच्या कामात अवजड वाहनांमुळे खराब झालेले रस्ते, पाणीपुरवठा, भूसंपादन याविषयी निर्माण होणाऱ्या अडचणी, समस्यांबाबत गावकरी व अधिकारी यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली.रस्ते दुरुस्त करा...प्रकल्पाचे काम करताना सहाणेच्या जमिनीला अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. प्रकल्पाचे काम सुरु असलेल्या ठिकाणी अवजड वाहनांच्या रहदारीमुळे रस्ते खराब झाले आहेत, ते दुरुस्त करण्याची जबाबदारी संबधित यंत्रणेची आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाईRatnagiriरत्नागिरी