शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
2
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
3
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
4
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
5
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
6
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
7
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
8
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
9
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
10
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
11
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
12
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
14
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
15
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
16
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
17
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
18
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
19
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
20
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा

‘स्वाइन फ्लू’ने दोघांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 11:48 PM

लोकमत न्यूज नेटवर्कमसूर : चिखली व रिसवड येथे दोन रुग्णांचा स्वाइन फ्लूने बळी घेतला. चिखली येथील राणी संभाजी माळी (वय ४१), तर रिसवड येथील महादेव गोविंद इंगवले (६५) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.रिसवड येथील महादेव गोविंद इंगवले यांचा शनिवारी सायंकाळी पाच वाजता, ...

लोकमत न्यूज नेटवर्कमसूर : चिखली व रिसवड येथे दोन रुग्णांचा स्वाइन फ्लूने बळी घेतला. चिखली येथील राणी संभाजी माळी (वय ४१), तर रिसवड येथील महादेव गोविंद इंगवले (६५) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.रिसवड येथील महादेव गोविंद इंगवले यांचा शनिवारी सायंकाळी पाच वाजता, तर राणी संभाजी माळी यांचा रविवारी सकाळी साडेआठ वाजता मृत्यू झाला. दोन्हीही रुग्णांवर कºहाड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. चिखली येथील राणी माळी यांना सर्दी, ताप, डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांच्यावर मसूरला खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, त्रास कमी न झाल्याने त्यांना ८ आॅगस्ट रोजी कºहाडच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.‘मसूर परिसरातील लोकांनी स्वाइन फ्लूने न घाबरता कापूर व वेलचीचे छोटे दाणे प्रत्येकी पाच ग्रॅम घेऊन ते एकत्रित बारीक कुटून मिश्रणाची पूड स्वच्छ व सुती कापडात जवळ ठेवावी.दर दीड तासाने तिचा वास घेतल्यास स्वाइन फ्लूचा जिवाणू मरतो,’ अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. रमेश लोखंडे यांनी दिली.१ रिसवड येथील महादेव इंगवले यांना १९ जुलै रोजी मसूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर २० जुलैला कºहाड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तेथेही त्यांची प्रकृती ठीक न झाल्याने २१ जुलै रोजी सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. शनिवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. दोन्हीही रुग्ण स्वाइन फ्लूचे बळी ठरल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.२ आरोग्य खात्यातर्फे चिखली, रिसवड व विभागातील गावांत स्वाइन फ्लूसंदर्भात सर्व्हे सुरू केला असून, जनजागृती सुरू केली आहे. गावोगावच्या ग्रामपंचायतींनी स्वाइन फ्लूबाबत जनजागृती करावी, असे आवाहनही आरोग्य खात्याने केले आहे.३ मसूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एम. लोखंडे यांच्यासह आरोग्य सहायक, आरोग्यसेविका, आशा स्वयंसेविका यांची जनजागृतीची मोहीम सुरू आहे. ग्रामस्थांनी ताप, सर्दी, खोकला व घसा दुखणे अशी फ्लूसदृश लक्षणे आढळल्यास तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारार्थ दाखल व्हावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश लोखंडे यांनी केले आहे.