शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकाच्या थापेवर स्वराज्य

By admin | Updated: May 11, 2016 00:09 IST

नितीन बानुगडे पाटील : रत्नागिरी पर्यटन महोत्सवात व्याख्यानाचा कार्यक्रम

चिपळूण : छत्रपती शिवाजी महाराजांनी मूठभर मावळ्यांच्या बळावर स्वराज्याची निर्मिती केली. स्वराज्य नावाची पहिली सहकारी संस्था निर्माण झाली त्याच्या संस्थापक जिजाऊ होत्या. स्वराज्य हे बक्षिसावर नाही, तर कौतुकाच्या थापेवर उभे होते. महाराजांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत उत्तम व्यवस्थापन करुन मोहिमा आखल्या म्हणूनच उण्या-पुऱ्या ५० वर्षांच्या आयुष्यात ते जगप्रसिध्द झाले, असे मत शिवचरित्रकार प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी व्यक्त केले. चिपळूण येथे रत्नागिरी पर्यटन महोत्सव २०१६मध्ये सांगता समारंभापूर्वी नितीन बानुगडे पाटील यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. छत्रपती शिवचरित्रावर बोलताना प्रा. बानुगडे पाटील यांनी शिवरायांच्या जीवनातील अनेक प्रसंग हुबेहूब समोर उभे केले. स्वराज्याच्या स्थापनेपासून ते राज्याभिषेकापर्यंत सर्व प्रवास त्यांनी उलगडला. जनावरांपासून पिकांचे रक्षण व्हावे व स्वराज्यासाठी मावळ्यांची मांदियाळी तयार व्हावी, यासाठी जनावर मारून आणणाऱ्यास जिजाऊंनी इनाम जाहीर केले. यातून दुहेरी फायदा झाला आणि स्वराज्याला नेक मावळे मिळाले. औरंगजेबासारख्या मातब्बर शत्रूकडे ३५० कोटी महसूल होता, तर शिवरायांकडे उणा-पुरा १ कोटी महसूल होता. औरंगजेबाकडे मणभर होते, तर शिवरायांकडे कणभर होते. तरीही कणभर स्वराज्य औरंगजेबाला का हवे होते, हा प्रवास त्यांनी उलगडून सांगितला. मातीतल्या माणसांनी स्वराज्य उभे केले होते, त्यामुळे हे स्वराज्य आमचे आहे, माझे आहे, याची जाणीव मावळ्यांना होती. या आपलेपणावरच महाराजांनी सर्व लढाया लढल्या. अमेरिकेसारखा बलाढ्य शत्रू व्हिएतनामसारख्या छोटाशा देशाला नमवू शकला नाही. कारण व्हिएतनामच्या मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, पुतळा प्रेरणा देतो. पाकिस्तानमध्येही आदर्श राजा कसा असावा, याचे पाठ्यपुस्तकात धडे आहेत. अमेरिकेत शिवाजी दि मॅनेजमेंट गुरु असा धडा अभ्यासाला आहे. आमच्याकडे शिवाजी किती, तर चार मार्काला आहे. एसीत बसून बिसलरीतील पाणी पिऊन दुष्काळ संपवता येणार नाही. सन १९७२मध्ये दुष्काळ पडला तेव्हा रायगडातील गंगा तलावातील पाणी खाली आणण्यात आले होते, हा द्रष्टेपणा शिवरायांकडे होता. सर्व धरणे आटली, तरी रायगडमधील गंगाटोक आटले नव्हते. आज मोबाईलचा जमाना आहे. शिवरायांच्या काळात चांगली किंवा वाईट बातमी देताना वेगवेगळ्या रंगाचा धूर काढून इशारा दिला जायचा. तासाभरात सर्व गडावर चांगली किंवा वाईट बातमी कळत असे, हे व्यवस्थापन राजांचे होते. महाराष्ट्राला जमिनीवरून नाही तर समुद्रमार्गे धोका आहे, हे ३५० वर्षांपूर्वी राजांनी सांगितले होते. त्यांनी आपले आरमार सुसज्ज केले होते. ५० वर्षात राजांनी ११० किल्ले बांधले. स्वराज्याच्या बळकटीकरणासाठी ते आवश्यक होते. सर्वसामान्य माणसाच्या हाताला कामही मिळणे गरजेचे होते. त्याच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवण्याची जबाबदारीही राजांनी पाळली होती. आज जबाबदारी कोण पाळत नाही. जो तो जबाबदारीपासून दूर होत असतो. आपण साधी मतदानाची जबाबदारी पार पाडू शकत नाही. शर्टाचे पहिले बटण चुकीचे लागले की, खालची सगळी बटणे चुकतात. पहिली चूक झाली की, पुढे सर्व चुका होतात. जी माणसं कारणे सांगतात, यश त्यांच्या गळ्यात कधीच माळ घालत नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)...तरी रक्त सांडणाऱ्यांना समाधान वाटेलशिवचरित्रात सकारात्मक दृष्टीकोन होता. त्यामुळे एक एक सरदार जीवाची पर्वा न करता मूठभर मावळ्यांशी लढत होता. महाराजांनी एकावेळी एकच माणूस वापरला. त्या माणसाची पारख आणि त्याचे कर्तृत्व महाराज जाणत होते. स्वराज्याचा कारभार करताना महाराजांनी आपली एक चाल परत वापरली नाही व एका माणसाला पुन्हा संधी दिली नाही. स्वाभिमान जिवंत असेल तर निष्ठा कायम असेल, असे सांगून रत्नागिरी जिल्ह्यात २२ गडकोट आहेत. येथे गेलात तरी या किल्ल्यासाठी रक्त सांडणाऱ्या आपल्या पूर्वजांना समाधान वाटेल. त्यांच्यासाठी तरी गडावर जा, असे आवाहन बानुगडे पाटील यांनी केले. राजकारण बुद्धीच्या बळावरराजकारण हे दंडाच्या बळावर होत नाही तर ते बुध्दीच्या बळावर करावे लागते. तुम्ही काम कसे करता हे महत्त्वाचे नाही तर तुमच्या कामाचे नियोजन कसे आहे, यावर त्याचे यश अवलंबून असते. महाराजांनी सर्वच योजनांचे नियोजन केले होते. केवळ त्यांच्या मृत्यूचे नियोजन केले नव्हते. आपलं साम्राज्य वाढवता येत नसेल, तर समोरच्याचं कमी करायला शिका.