शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

समुद्रात असे तयार होतात टार बॉल्स, जलचरांवर होतो गंभीर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2018 11:12 AM

किनाऱ्यावर येणार टार बॉल्स आणि त्याचे मत्स्य उत्पादनावर होणारे परिणाम याविषयी सविस्तर विश्लेषण करणारे भाष्य

- डॉ. स्वप्नजा आशिष मोहिते

दैनिक लोकमतमध्ये आणि ऑनलाईन लोकमतमध्ये टार बॉल्स याविषयी सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याअनुषंगाने किनाऱ्यावर येणार टार बॉल्स आणि त्याचे मत्स्य उत्पादनावर होणारे परिणाम याविषयी सविस्तर विश्लेषण करणारे भाष्य.

जुहूच्या किनाऱ्यावर तेल किंवा वंगणयुक्त टार बॉल्स येऊन हा किनारा प्रदूषित झाला आहे. तेलकट आणि चिकट असा हा थर किनाऱ्यावर पसरला आहे. समुद्रात टाकल्या गेलेल्या आणि पाण्यावर तरंगणाऱ्या तेलामुळे हे टार बॉल्स तयार होतात. समुद्रातील क्षार आणि इतर घटकांबरोबर प्रक्रिया होऊन तेलाचे अशा चिकट टार मध्ये रूपांतर होते. याला विदरिंग (weathering) म्हणतात. समुद्रातील तेल विहिरींतून झालेल्या तेल गळतीमुळे किंवा बोटीतून सोडल्या जाणाऱ्या तेलामुळे, समुद्राच्या पाण्यावर तेलाचा एक पातळ थर (slick ) तयार होतो. वारा, लाटा आणि पाण्यातील प्रवाहांमुळे हा थर विखुरतो. सुरुवातीस या तेलातील हलक्या  घटकांचे बाष्पीभवन होते किंवा ते पाण्यात मिसळून जातात. तेलातील जड घटक (क्रूड ऑइल) पाण्यात राहतात आणि कालांतराने त्याचे रूपांतर या चिकट आणि घट्ट गोळ्यांमध्ये होते. असे थोडक्यात म्हणता येईल. पण या मागील कारण मीमांसा जाणून घेणे महत्वाचे ठरेल.  

टार बॉल्स तयार का होतात?

हे टार बॉल्स प्रत्येक वेळेसच समुद्रात झालेल्या तेल गळतीमुळेच होतात असे नाही. समुद्राच्या तळावर असणाऱ्या फटींमधून ही तेलाचा नैसर्गिकरित्या रिसावं होत असतो. तेल गळती समुद्रातून नैसर्गिकरित्या होणारी असो, समुद्रातून तेल काढणाऱ्या तेल विहिरीतून होणारी असो किंवा मासेमारी अथवा कार्गो आणि प्रवासी बोटींमधून होणारी असो, हे तेल पाण्यावर तरंगत राहते आणि त्यात रासायनिक आणि भौतिक बदल होऊन असे घट्ट आणि चिकट गोळे तयार होतात. प्रवाहाबरोबर वाहत जाऊन ते किनाऱ्यापाशी येतात. 

टार बॉल्स तयार होण्यामागील काही कारणे सांगता येतील. अंतर्गत तेल वाहतूक करणाऱ्या बोटी साधारणपणे किनाऱ्यापासून २० कि.मी. अंतरावरून मार्गक्रमण करतात. आपल्या परतीच्या प्रवासात बरेचदा या टँकर बोटी समुद्राचे पाणी गरम करून त्याने आपले रिकामे टँक्स धुतात आणि ते तेलमिश्रित पाणी समुद्रात सोडतात. खरं तर आंतरराष्ट्रीय नियमांनुसार अशा प्रकाराने समुद्रात तेल प्रदूषण होऊ नये म्हणून कायदे आहेत. पण भारताच्या किनारपट्टीवर अशा गोष्टींवर फारसे निर्बंध नसल्याने अशा प्रकारे तेल समुद्रात मिसळू शकते. ही एक छोटी तेल गळती म्हणता येईल. पाण्यावर तरंगणारा हा तेलाचा पट्टा वाऱ्यामुळे आणि प्रवाहांमुळे आणखी पसरत जातो. त्यात जैविक, भौतिक आणि रासायनिक बदल होऊन त्याचे असे गोळे बनतात आणि ते किनाऱ्याकडे ढकलले जातात.

काही वेळेस समुद्रात दोन बोटींची धडक झाल्यास त्यामधील तेल गळून ही असे घडू शकते. अर्थात अशी शक्यता खूप कमी असते. समुद्रातील इंधन विहिरीतून अपघाताने तेल गळती होऊ शकते. मासेमारी करणाऱ्या  किंवा प्रवाशी वाहतूक करणाऱ्या किंवा कार्गो बोटीतून काही प्रमाणात अशी तेल गळती होऊ शकते. तेल गळती झाल्यानंतर त्याचे टार बॉल्समध्ये रूपांतर होण्यासाठी तेलातील घटक, वाऱ्याची दिशा आणि वेग तसेच कालावधी हे महत्वाचे असतात. तेल जेव्हा पाण्यात तरंगत असते तेव्हा लाटा आणि वाऱ्यामुळे ते पाण्यासोबत घुसळले जाऊन त्याचे इमल्शन तयार होते. हे साधारणपणे चॉकोलेट पुडिंग सारखे दिसते. मूळ तेलापेक्षा घट्ट आणि अप्रवाही अशा या  इमल्शनचे आणखी तुकडे होत राहतात. अगदी छोट्या गोळ्यांपासून १० ते ३० से.मी. असे हे टार बॉल्स समुद्राच्या पाण्यावर त्यांची घनता पाण्यापेक्षा कमी असल्याने तरंगत राहतात.   

समुद्रात गळती झालेले तेल काही प्रक्रियांतून जाते. प्रथम कमी रेण्विक वस्तुमान असलेल्या  घटकांचे बाष्पीभवन (evaporation ) होते. उरलेले तेल ऑईल स्लिकच्या स्वरूपात समुद्रात पसरते. त्यातील काही बेन्झीन आणि टोलीनसारखे काही घटक पाण्यात विरघळतात. पाण्यात विरघळणारे हे घटक जलचरांसाठी अधिक हानिकारक ठरतात.उर्वरित तेल लाटांमुळे घुसळले जाऊन त्याचे लहान मोठे थेंब तयार होतात. समुद्राच्या पाण्याचे आणि तेलाचे थेंब यांचे मिश्रण तयार होते आणि हे इमल्शन प्रवाहांबरोबर दूर वाहत जाते. सांडलेल्या तेलाच्या प्रमाणाच्या पाचपट हे इमल्शन असते. चॉकलेटच्या पेस्टसारख्या दिसणाऱ्या या अशा स्थिर इमल्शनला चॉकलेट मूस म्हटले जाते. हे मिश्रण किनाऱ्यावर येताना त्याचे आणखी लहान मोठे गोळे बनत जातात आणि किनाऱ्यावर त्यांचा थर बसतो.  

विदरिंगमुळे तयार झालेले हे टार बॉल्स बाहेरून काहीसे कडक असले तरी आत ते मऊ, चिकट आणि लिबलिबीत असतात. पाण्याच्या घुसळण्याने तसेच वाढत्या तापमानाने हे बॉल्स फुटून त्यातला हा चिकट द्रव बाहेर येतो. काहीसा उन्हात वितळलेल्या डांबरासारखा हा द्रव दिसतो. जेवढे तापमान वाढते तेवढा यांचा चिकटपणा ही वाढतो. हे गोळे कित्येक कि.मी. दूरवर वाहत जातात. समुद्रातील पर्यावरणात त्यांचे विघटन होत नाही. समुद्रातील काही सूक्ष्म कण किंवा वाळूचे कण यांना हे टार बॉल्स चिकटतात आणि किनाऱ्यावर त्यांचा अतिशय चिकट असा थर बसतो. हे गोळे एवढे चिकट असतात की हात-पायांना किंवा कपड्यांना चिकटले तर ते स्वच्छ करणे कठीण होऊन जाते. जेवढी वाळू आणि इतर कचरा या गोळ्यांना चिकटेल तेवढा तो साफ करणे कठीण बनते. हे गोळे किती काळ चिकट राहतील हेही सांगणे कठीण असते. काही वेळेस अशा गोळ्यांची घनता जास्त असेल तर ते पाण्यात बुडून तळाशी जातात आणि तेथे खूप काळ राहू शकतात. 

टार बॉल्सची ही समस्या जगभरातील समुद्र किनाऱ्यांवर आता प्रकर्षाने जाणवू लागली आहे. आपल्या किनारपट्टीवर गोव्याच्या किनाऱ्यावर १९७० मध्ये मोठ्या प्रमाणावर असे टार बॉल्स आल्याची  नोंद आहे. अशाच घटना बर्मुडा, गल्फ किनारे तसेच अमेरिका आणि इतर देशांच्या किनाऱ्यांवर ही घडत आहेत. असे टार बॉल्सनी प्रदूषित किनारे पर्यटक आणि नागरिक यांना बंद करणे हाच उपाय मग अवलंबावा लागतो. हे टार बॉल्स हाताने किंवा यंत्रांच्या साहाय्याने उचलावे लागतात. काही वेळेस तर वाळूचा टारने माखलेला सगळाच थर काढून टाकावा लागतो. आता काही रसायनाची फवारणी करून किनारे स्वच्छ केले जातात. २०१५ साली लॉस एंजेलिसच्या किनाऱ्यावर असेच टार बॉल्स येण्याची घटना घडली होती.  अभ्यास केला असता १६० कि.मी. अंतरावर असलेल्या सांता बार्बरा येथे झालेल्या तेल गळतीतून जवळ जवळ ८०००० लि. तेल समुद्रात मिसळण्याने हे घटना घडल्याचे दिसले. 

टार बॉल्स किनाऱ्यावर का आणि कधी येतात?

समुद्राचे प्रवाह, लाटा, वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग यावर या टार बॉल्सचा प्रवास अवलंबून असतो. गोव्याच्या समुद्र विज्ञान संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार आपल्या किनाऱ्यांवर मे ते ऑक्टोबर दरम्यान असे टार बॉल्स येण्याचे प्रमाण अधिक आढळते. याचे कारण म्हणजे पश्चिम किनारपट्टीवर वाहणाऱ्या वाऱ्यांची दिशा म्हणता येईल. या किनाऱ्यावर वारे एका विशिष्ट्य वार्षिक चक्रानुसार वाहतात. साधारणपणे मे महिन्यापासून किनाऱ्याकडे वारे वाहायला लागतात. या मान्सून वाऱ्याचा वेग वाढत जाऊन तो जुलै-ऑगस्ट मध्ये सर्वाधिक होतो. सप्टेंबर-ऑक्टोबर पासून त्याचा वेग मंदावतो. 

समुद्राच्या पृष्ठभागावर निर्माण होणाऱ्या लाटांचा ही वेग आणि मार्ग या मान्सून वाऱ्याप्रमाणेच असतो. यामुळे लाटांची उंची आणि वेग ही वाढत जातो. अशा लाटा या टार बॉल्सना उत्तमरित्या वाहून नेतात. यामुळेच समुद्रात झालेल्या तेल गळतीतून तयार झालेले टार बॉल्स या कालावधीत किनाऱ्याकडे येतात. जर तेल गळती किनाऱ्यानजीक झाली असेल तर त्या तेलाचे टार बॉल्स न बनता, तपकिरी रंगाचे इमल्शन किनाऱ्यावर येऊन पडते. पण ही तेल गळती खोल समुद्रात झाली असेल तर किनाऱ्याकडे येत येत त्याचे टार बाल्समध्ये रूपांतर होऊन हे चिकट गोळे किनाऱ्यावर येऊन पडतात. काही वेळेस वाऱ्याची दिशा बदलली तर हे गोळे परत समुद्राकडे ढकलले जाऊ शकतात. समुद्रात ते किती काळ राहू शकतील याबाबत निश्चित अंदाज मात्र बांधता येत नाही. 

टार बॉल्समुळे सागरी जीवांवर होणारा परिणाम 

अंदाजे ३.५ अब्ज टन एवढे पेट्रोलियम हायड्रोकार्बन प्रतिवर्षी  नैसर्गिकरित्या तसेच अपघाताने, मानवी हस्तक्षेपाने सागरी पर्यावरणात मिसळत असते. हायड्रोकार्बनचे विघटन करणारे सागरी जीवाणू अशा तेल गळतीमधील तेलावर प्रक्रिया करून त्यांचे विघटन करू शकतात. हे जीवाणू काही हायड्रोकार्बन्स वापरून ते स्वतः साठी अन्न निर्मिती करतात आणि पर्यायाने अन्नसाखळीतील इतर जीवांचे भक्ष बनतात. पण मोठे रेणू असलेल्या हायड्रोकार्बन्सचे असे जैविक विघटन होत नाही व ते सागरी पर्यावरणात खूप काळ राहू शकतात. उदा. अस्फाल्टीन्स समुद्रात जवळपास शंभर वर्षे निष्क्रिय अवस्थेत राहू शकतात. ही तेल गळती सागरी पर्यावरणातील सर्वच सजीवांना घातक असते. या तेल गळतीचा किंवा टार बॉल्सचा  ज्या फटका किनाऱ्याला बसतो तेथील अगदी सूक्ष्म जीवांपासून ते तेथील पक्षी, सस्तन प्राणी अगदी वनस्पतीही मृत होऊ शकतात. जलचरची अंडी आणि पिल्ले हे या प्रदूषणाला सर्वप्रथम बळी पडतात.  

अनेक जलचर हे टार बॉल्स खाद्य समजून खातात. हे त्यांच्यासाठी अतिशय घातक ठरते. किनाऱ्यावर येऊन पडणारे हे चिकट गोळे वाळूत घरटी करून राहणाऱ्या पक्ष्यांना ही हानिकारक ठरतात. त्यांची पिसे चिकट झाल्याने ते उडू शकत नाहीत. भक्ष्य मिळवण्यासाठी समुद्रात बुडी मारणारे पक्षी ही या चिकट गोळ्यांनी माखून हालचाल करण्यास असमर्थ ठरतात. समुद्राच्या पृष्टभागावर तरंगणारे तेल किंवा हे गोळे तेथील प्राणी आणि वनस्पती, सर्वांनाच जीवघेणे ठरू शकतात. हे तेलाचे गोळे समुद्रात आणि किनाऱ्यावर दूरगामी परिणाम करतात. सर्वात जास्त परिणाम करणारी गोष्ट म्हणजे हे सजीव या तेलाने माखून जाणे. हे तेल श्वसन मार्गाने शरीरात ही जातेच. शरीर स्वच करण्याच्या प्रयत्नात किंवा खाद्य म्हणून ते अन्नमार्गात ही जाते. माशांच्या किल्ल्यांवर या तेलाचा थर जमा होऊन श्वसनात अडथळे येतात. सागरातील सूक्ष्म प्लवंग तर या तेलाच्या गोळ्यांमध्ये गुरफटून जातात आणि अन्नसाखळीतील हा महत्वाचा दुवा नष्ट होतो. किल्ल्याच्या मदतीने अन्नकण गाळून घेणारे मृदुकाय प्राणी, उदा. शिंपलावर्गीय प्राणी हे ही या तेल गोळ्यांना बळी पडतात. एकूणच समुद्रातील वेगवेगळ्या अन्नसाखळ्या यामुळे धोक्यात येतात आणि नष्ट होऊ लागतात. यातील प्रत्येक सजीवाच्या प्रत्येक इंद्रिय संस्थांवर या प्रदूषणाचा परिणाम होतो. हे जलचर जर या तेल गोळ्यांच्या संपर्कात अधिक काळ राहिले तर त्यांचा मृत्यू होतो. या टार बॉल्समुळे समुद्रांतर्गत असणाऱ्या तसेच किनाऱ्यावरील परिसंस्था धोक्यात येतात.

हे टार बॉल्स आपल्यासाठी हानिकारक आहेत का?

तेलाचे हे चिकट गोळे शरीराच्या संपर्कात आले तर त्याची अॅलर्जीसारखी रिअॅक्शन येऊ शकते. यातील हायड्रोकार्बन्स असतात. यामुळे अंगावर रॅश किंवा पुरळ येणे, खाज सुटणे अशा गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे या गोळ्यांना स्पर्श न करणे चांगले. त्यांच्या संपर्कात आल्यास, तो भाग साबणाने किंवा वंगण काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सोल्यूशनने चांगला स्वच्छ  करावा. मात्र यासाठी केरोसीन, पेट्रोल, डिझेल किंवा इतर विद्रावक पदार्थाचा उपयोग करू नये. तसेच अशा तेलाने माखलेले किंवा तेलकट वास असलेले मासे, शिंपले, खेकडे आदी खाऊ नयेत.

टार बॉल्सनी माखलेला किनारा स्वच्छ कसा केला जातो?

तेल गळती समुद्रातच रोखता येऊ शकते. मात्र यासाठी योग्य नियोजन करावे लागते. पाण्यापेक्षा हलके असलेले तेल समुद्राच्या लाटांमुळे घुसळून त्याचे इमल्शन बनल्यानंतर टार बॉल्स बनण्याची प्रक्रिया सुरु होते आणि तो तेलाचा तवंग पुढे पसरत जातो. यासाठी काही कालावधी लागतो. यादरम्यानच पाण्यावर तरंगणारा तेलाचा तवंग काही डिस्पर्सन्ट वापरून रोखता येतो. ही  रसायने तेलावरील पृष्ठीय ताण कमी करून तेलाचे छोट्या कणात रूपांतर करतात आणि हे कण समुद्रात बुडतात. टाईप एक प्रकारचे हे डिस्पर्सन्टस हायड्रोकार्बन्स विद्रावक असतात आणि ते बोटीवरून फवारता येतात. ग्लायकॉल मिश्रित काही डिस्पर्सन्टस तेलाने माखलेले किनारे स्वच्छ करण्यासाठी वापरतात. बायोडिस्पर्स, डिस्पर्सइट, नोकोमीस, कोरेक्सिट असे जागतिक मान्यतेचे  डिस्पर्सन्टस तेल गळती आटोक्यात आणण्यासाठी किंवा समुद्र किनारे साफ करण्यासाठी वापरले जातात.  

तेल गळती आणि त्या नंतर त्याचे होणारे परिणाम ह्या समस्यांवर मात करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. योग्य नियोजन, जागरूकता आणि प्रशासन ते सामान्य जनता यांचा सहभाग या माध्यमातून टार बॉल्सच्या प्रश्नावर उपाय करता येऊ शकतील.

लेखिका मत्स्य महाविद्यालय रत्नागिरी येथील प्राध्यापिका आहेत. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी