शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

जाळ्यात अडकलेल्या कासवाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 12:19 PM

wildlife RatnagiriNews- गुहागर तालुक्यातील तवसाळ आगर गावात मच्छिमारीसाठी टाकलेल्या जाळ्यात अडकलेल्या कासवाला पाटील कुटुंबियांकडून जीवदान देण्यात आले.

ठळक मुद्देजाळ्यात अडकलेल्या कासवाला जीवदानगुहागर तालुक्यातील तवसाळ येथील प्रकार

असगोली : गुहागर तालुक्यातील तवसाळ आगर गावात मच्छिमारीसाठी टाकलेल्या जाळ्यात अडकलेल्या कासवाला पाटील कुटुंबियांकडून जीवदान देण्यात आले.तवसाळ आगर येथील अवधूत पाटील आणि त्यांचा पुतण्या विक्रांत पाटील हे बिगर यांत्रिकी होडीतून मासेमारीसाठी गेले होते. पाण्यात टाकलेले जाळे त्यांनी वर घेतले असता त्यात ऑलिव्ह रिडले जातीचे कासव दिसले. कासव अडकल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतःचे किमती जाळे कापून त्या कासवाची जाळ्यातून मुक्तता करून त्याला पुन्हा समुद्रात सोडून दिले.याबाबत अवधूत पाटील यांनी सांगितले की, माशांसाठी टाकलेल्या जाळ्यात कासव अडकण्याचा हा आठवडाभरातील तिसरा प्रकार आहे. कासवांसाठी सध्याचा हा हंगाम अंडी घालण्याचा असल्याने किनाऱ्याकडे येणारे मादी कासव जाळ्यात अडकल्याची शक्यता त्यांनी वर्तवली.

तवसाळ समुद्रकिनारी सात ते आठ ठिकाणी कासवांची अंडी मिळाली असल्याने हेही कासव अंडी घालण्यासाठीच आसरा घेत असल्याची शक्यता असून, आम्ही किमती जाळ्यांची पर्वा न करता त्या कासवाला पाण्यातल्या पाण्यातच जाळ्यातून सोडवून पुन्हा समुद्रात सोडून दिल्याचे पाटील यांनी सांगितले.नुकसान भरपाईचा प्रस्तावदुर्मीळ माशांच्या प्रजातींचे रक्षण करताना नुकसान झाल्यास संबंधितांना त्याची नुकसान भरपाई मिळण्याची महाराष्ट्र शासन मत्स्य विभागाची योजना आहे. त्यानुसार अवधूत पाटील यांनी गुहागरचे सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी) यांच्याकडे संपर्क साधला. याबाबत सर्व कागदपत्रे व परिस्थितीजन्य पुराव्यांची पडताळणी करुन पाटील यांच्या नुकसान भरपाई संदर्भातील प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :wildlifeवन्यजीवRatnagiriरत्नागिरी