शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

चक्क शेततळ्यात मत्स्य शेती यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2020 2:37 PM

Ratnagiri, Farmer, fisherman गुहागर अथांग समुद्र किनारा लाभला आहे. येथील खाऱ्या पाण्यातील मच्छी सर्वत्र प्रसिद्ध आहे. गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे येथील प्रगतशील शेतकरी तुकाराम तेलगडे यांनी आपल्या शेततळ्यामध्ये गोड्या पाण्यात मत्स्य शेती प्रकल्प राबवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग असून, पंचायत समितीचे उपसभापती सुनील पवार यांनी या प्रकल्पाला भेट देऊन शेतकरी तुकाराम तेलगडे यांचे कौतुक केले.

ठळक मुद्देचक्क शेततळ्यात मत्स्य शेती यशस्वीपाटपन्हाळेत रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्याच प्रयोगात यश

मंदार गोयथळेअसगोली : गुहागर अथांग समुद्र किनारा लाभला आहे. येथील खाऱ्या पाण्यातील मच्छी सर्वत्र प्रसिद्ध आहे. गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे येथील प्रगतशील शेतकरी तुकाराम तेलगडे यांनी आपल्या शेततळ्यामध्ये गोड्या पाण्यात मत्स्य शेती प्रकल्प राबवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग असून, पंचायत समितीचे उपसभापती सुनील पवार यांनी या प्रकल्पाला भेट देऊन शेतकरी तुकाराम तेलगडे यांचे कौतुक केले.तेलगडे यांनी आपल्या जागेमध्ये कृषी विभागाच्या पुढाकाराने मत्स्यशेती प्रकल्प राबवला आहे. समुद्रातील मासे खाणारे खाद्यप्रेमी मोठ्या प्रमाणात आहेत. तसे गोड्या पाण्यातील माशांना ही एक वेगळीच चव असल्याने त्यांनाही स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

मात्र, मागणीनुसार गोड्या पाण्यातील मासे केवळ नदी - नाले, साठवण तलाव यामध्ये मिळत असल्याने मागणीप्रमाणे पुरवठा होऊ शकत नाही. याचा अभ्यास करून तेलगडे यांनी शासनाच्या शेततळे योजनेतून अनुदान घेऊन आपल्या जागेत शेततळे करून घेतले.शेततळ्यातील पाणी मातीत मुरण्याचा धोका असल्याने पाण्याची बचत करण्यासाठी प्लास्टिकचे आच्छादन केले आहे. त्यामध्ये माशांना आवश्यक असलेले शैवाळयुक्त प्रोटिन्स उपलब्ध केले. सध्या तळ्यात २ हजारहून अधिक मासे आहेत. या माशांना बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे. या तळ्याच्या शेजारी त्यांनी अनेक प्रकारच्या भाज्यांची लागवड केली आहे.त्यांच्या या प्रकल्पाला गुहागर पंचायत समितीचे उपसभापती सुनील पवार यांनी नुकतीच भेट देऊन त्यांचे कौतुक केले. आपल्या या प्रकल्पाचा आदर्श तालुक्यातील अन्य शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे, असे पवार म्हणाले. या प्रकल्पासाठी तुकाराम तेलगडे यांच्यासह त्यांचे कुटुंब मेहनत घेत आहेत.

टॅग्स :fishermanमच्छीमारRatnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी