शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका

By admin | Updated: November 11, 2015 00:13 IST

शिक्षणाचे धडे भिजत : रत्नागिरीतील राजिवडा मत्स्योद्योग शाळेची अवस्था

रहिम दलाल -- रत्नागिरी -शहरातील राजिवडा येथील मत्स्योद्योग शाळेची दुरवस्था झाल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास धोेका निर्माण झाला आहे. तसेच पावसाळ्यामध्ये शाळेत गळतीचे प्रमाण मोठे असल्याने विद्यार्थ्यांना पावसाच्या पाण्यात भिजत शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहेत. त्यामुळे ही शाळा जिल्हा परिषद की, मत्स्य विभाग यापैकी कोण चालवित आहे, असा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे.जिल्ह्यात राजिवडा आणि साखरीनाटे (ता. राजापूर) या दोन शाळा शासनाच्या मत्स्योद्योग विभागाच्या आहेत. या दोन्ही शाळांमध्ये मच्छिमारांची मुले शिकत असून, त्यांच्यासाठी मासेमारीशी संबंधित मत्स्योद्योग आणि सुतारकाम हे इतर शाळांपेक्षा वेगळे विषय शिकविले जातात. दोन वर्षांपूर्वी या दोन्ही शाळा जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आल्या. त्यानंतर या शाळेतील शिक्षकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. त्यांचे वेतन वेळेवर होत नसल्याची ओरड या शाळा जिल्हा परिषदेकडे वर्ग केल्यापासून सुरु झाली. त्यामुळे या शाळांतील शिक्षकांना मोठी कसरत करावी लागत आहे. शाळेतील शिक्षक वर्ग अडचणीत आहेत. राजिवडा येथील मत्स्योद्योग शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. शाळेचे छप्पर कौलारु असल्याने कौले फुटली आहेत. लाकडी वासेही जुने झाल्याने ते मोडकळीस आले आहेत. या शाळेचे व्यवस्थापन जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले. मात्र, शाळेची जागा, इमारत जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आलेले नाही. त्यामुळे ही शाळा दुरुस्तीची जबाबदारी जिल्हा परिषदेकडून झटकण्यात येते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या शाळेच्या छपरातून गळती लागते. अनेकदा विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके, वह्या भिजल्याने शैक्षणिक नुकसान होते. तसेच भिंतीला तडे गेल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. शाळेच्या दुरुस्तीबाबत जिल्हा परिषदेशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून हात झटकले जातात. कारण या शाळेचे व्यवस्थापन जिल्हा परिषदेला दिलेले असले तरी या शाळेची इमारत व जागा जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आलेली नाही. त्यामुळे शाळेच्या दुरुस्तीचा प्रश्नही अधांतरीच आहे. ही शाळा शासनाचे मत्स्योद्योग खाते की, जिल्हा परिषदेकडे आहे, हा प्रश्न येथील रहिवाशांना सतावत आहे. एकूणच मत्स्योद्योग खाते आणि जिल्हा परिषदेच्या अनागोंदी कारभाराचा फटका शिक्षक व विद्यार्थ्यांना बसत आहे.टोलवाटोलवीची उत्तरे : इमारतीच्या भिंतीना तडेया शाळेच्या इमारतीच्या भिंतीना तडे गेले आहेत. तसेच छप्पाराची कौलेही फुटली असल्याने पावसाळ्यात होणाऱ्या गलतीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. या शाळेच्या दुरुस्तीबाबत मत्स्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद यांचेकडे शिक्षक-पालक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विचारणा केली असता तिन्ही विभागाकडून टोलवाटोलवी करण्यात येते.दुरूस्तीची अनास्थाराजिवडा येथील मत्स्योद्योग शाळेची इमारत कोसळण्याच्या स्थितीत आहे. असे असूनही या इमारतीच्या दुरूस्तीबाबत अनास्था असून, टोलवाटोलवीची उत्तर देऊन वेळ मारून नेली जात आहे. मात्र, यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.