शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

अपात्र शेतकऱ्यांकडून पैसे वसुलीला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 1:00 PM

farmar, ratnagirinews पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे पैसे परत करण्यास जिल्ह्यातील अपात्र लाभार्थ्यांकडून प्रारंभ झाला आहे. तहसीलदारांकडून या शेतकऱ्यांना नोटीस पाठविण्यात आल्या असून नोटीस मिळाल्यानंतर चार दिवसांच्या आत हे पैसे परत करण्याचे आदेश दिल्यानंतर आता पैसे परत करण्यास सुरूवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील आयकरदाते असलेल्या शेतकऱ्यांकडून २१ लाख ८२ हजार तर अन्य प्रकारे अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांकडून ४ लाख ९८ हजार अशी एकूण २६ लाख ८० एवढी रक्कम परत करण्यात आली आहे.

ठळक मुद्देअपात्र शेतकऱ्यांकडून पैसे वसुलीला प्रारंभकिसान सन्मान योजना, २६ लाख ८० हजार जमा

रत्नागिरी : पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे पैसे परत करण्यास जिल्ह्यातील अपात्र लाभार्थ्यांकडून प्रारंभ झाला आहे. तहसीलदारांकडून या शेतकऱ्यांना नोटीस पाठविण्यात आल्या असून नोटीस मिळाल्यानंतर चार दिवसांच्या आत हे पैसे परत करण्याचे आदेश दिल्यानंतर आता पैसे परत करण्यास सुरूवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील आयकरदाते असलेल्या शेतकऱ्यांकडून २१ लाख ८२ हजार तर अन्य प्रकारे अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांकडून ४ लाख ९८ हजार अशी एकूण २६ लाख ८० एवढी रक्कम परत करण्यात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात मिळण्यासाठी मार्च २०१८ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत वर्षातून तीन टप्प्यात लाभार्थी शेतकऱ्याला सहा रूपये शासनाकडून देण्यात येतात. त्यासाठी तो भूधारक असावा, ही महत्वाची अट आहे. त्याचबरोबर तो आयकर दाता नसावा, पती - पत्नीपैकी एकालाच या योजनेचा लाभ मिळेल, असे निकष या योजनेसाठी ठेवण्यात आले होते.या योजनेसाठी जिल्ह्यातील २ लाख ५३ हजार शेतकऱ्यांचे अर्ज पात्र ठरले होते. यापैकी काही शेतकऱ्यांना दोन वर्षात सहा टप्प्यात प्रत्येकी दोन हजार रूपये एवढे पैसेही मिळाले होते. मात्र, केंद्र सरकारच्या पोर्टलवर नाव नोंदणी केलेल्या या शेतकऱ्यांपैकी काही आयकर दाते असल्याचे त्यांनी जोडलेल्या आधार क्रमांकावरून निदर्शनास आले होते. त्यामुळे अशा शेतकऱ्यांची यादी संबंधित जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आली होती. आयकर दाते तसेच अन्य कारणाने अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांचे पैसे शासनाकडे जमा करण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी सरकारने जिल्हा प्रशासनाला दिले होते.त्यानुसार प्रत्येक तालुक्यात तहसीलदार यांनी अशा अपात्र शेतकऱ्यांना नोटीस काढल्या. त्यानुसार जिल्ह्यात २,४२१ शेतकरी आयकरदाते असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा शेतकऱ्यांकडून २१ लाख ८२ हजार, तर अन्य कारणांनी अपात्र असलेल्या ३,८३३ शेतकऱ्यांकडून ४ लाख ९८ हजार एवढी रक्कम जमा झाली आहे. अजूनही ही रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही रक्कम सरकारच्या तिजोरीत जमा करून घेतली जात आहे

टॅग्स :FarmerशेतकरीRatnagiriरत्नागिरी