शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 10:15 IST

...मग उद्धव ठाकरे यांच्यावर एफआयआर का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही, याचे गणित मला कळत नाही? असा सवाल शिवसेना शिंदे गटाचे नते रामदास कदम यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांचा तोल आता एवढा खाली गेला आहे की, ते काहीही बडबडत आहेत. ते पंतप्रधानांना वाटेल ते बोलतायत, अमित शहांना वाटेल ते बोलतायत, मुख्यमंत्र्यांनाही वाटेल ते बोलतायत. मला एक कळत नाही, ज्यावेळेला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात वक्तव्य केले होते की, मी असतो तर कानाखाली मारली असती. त्यांना जेवणावरून उचलून आत  टाकले होते. मग उद्धव ठाकरे यांच्यावर एफआयआर का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही, याचे गणित मला कळत नाही? असा सवाल शिवसेना शिंदे गटाचे नते रामदास कदम यांनी केला आहे. ते रत्नागिरीत पत्रकारांसोबत बोलत होते.

कदम म्हणाले, "ते (उद्धव ठाकरे) मुख्यमंत्र्यांनाच बूट चाटायला जातो, हा अमुक चाटतो, तमुक चाटतो. इतक्या खालच्या पातळीवरती जो माणूस जाऊन बोलतोय, त्यांचा तोल गेलेले आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर बोलणे, म्हणजे हा राज्याचा अवमान आहे, महाराष्ट्र जनतेचा अवमान आहे. हे काही बिहार नाही ना? हा महाराष्ट्र आहे, सुसंस्कृत महाराष्ट्र आहे." ...बाळासाहेबांची स्टाईल मारायला जात आहेत -कदम पुढे म्हणाले, "उद्धव ठाकरे बाळासाहेबांची स्टाईल मारायला जात आहेत. आता मी बघितले की, हातामध्ये रुद्राक्ष बांधलेत काय, जणू काही मी बाळासाहेब आहेत? अरे बाळासाहेबांच्या नखाचीही आपल्याला सर येणार नाही. कुठे बाळासाहेब आणि कुठे तुम्ही आहात? बाळासाहेब शब्दाला पक्के होते, तुम्ही तर बाळासाहेबांच्या विचाराशी बेईमानी करत आहात."

आपण काय बोलतोय याचे भाण ठेवायला हवे सर्वांनी -"एकंदा संपूर्ण रणधुमाळी बघितली, तर उद्धव ठाकरेंचा तोल गेलेला आपल्याला बघायला मिळतो. वाटेल ते बडबडायचे, वाटेल ते आरोप करायचे, गुजरातच्या बाबतीमध्ये अधिक बोलायचे, अमित शहांवर बोलायचे, मुख्यमंत्र्यांवर बोलायचे. मग देवा भाऊ काय? जॉकेटवाला भाऊ काय? दाढीवाला भाऊ काय? तुम्हाला शोधत का हे? मग तुम्हाला कडका भाऊ म्हटले तर चालेल का कुणी? तुमच्या मुलाला लफडेवाला भाऊ म्हटले तर चालेल का कुणी? आपण काय बोलतोय याचे भाण ठेवायला हवे सर्वांनी. हे अशोभनीय आहे, असं म्हणेन मी. खरेतर याच्यावरती गुन्हा दाखल व्हायला हवा होता. त्यांना जेलमध्ये टाकायला हवे होता, असे माझे प्रामाणिक मत आहे." असेही रामदास कदम यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना