शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
3
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
4
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
5
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
6
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
7
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
8
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
9
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
10
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
11
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
12
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
13
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
14
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
15
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
16
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
17
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
18
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
20
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?

"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 10:15 IST

...मग उद्धव ठाकरे यांच्यावर एफआयआर का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही, याचे गणित मला कळत नाही? असा सवाल शिवसेना शिंदे गटाचे नते रामदास कदम यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांचा तोल आता एवढा खाली गेला आहे की, ते काहीही बडबडत आहेत. ते पंतप्रधानांना वाटेल ते बोलतायत, अमित शहांना वाटेल ते बोलतायत, मुख्यमंत्र्यांनाही वाटेल ते बोलतायत. मला एक कळत नाही, ज्यावेळेला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात वक्तव्य केले होते की, मी असतो तर कानाखाली मारली असती. त्यांना जेवणावरून उचलून आत  टाकले होते. मग उद्धव ठाकरे यांच्यावर एफआयआर का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही, याचे गणित मला कळत नाही? असा सवाल शिवसेना शिंदे गटाचे नते रामदास कदम यांनी केला आहे. ते रत्नागिरीत पत्रकारांसोबत बोलत होते.

कदम म्हणाले, "ते (उद्धव ठाकरे) मुख्यमंत्र्यांनाच बूट चाटायला जातो, हा अमुक चाटतो, तमुक चाटतो. इतक्या खालच्या पातळीवरती जो माणूस जाऊन बोलतोय, त्यांचा तोल गेलेले आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर बोलणे, म्हणजे हा राज्याचा अवमान आहे, महाराष्ट्र जनतेचा अवमान आहे. हे काही बिहार नाही ना? हा महाराष्ट्र आहे, सुसंस्कृत महाराष्ट्र आहे." ...बाळासाहेबांची स्टाईल मारायला जात आहेत -कदम पुढे म्हणाले, "उद्धव ठाकरे बाळासाहेबांची स्टाईल मारायला जात आहेत. आता मी बघितले की, हातामध्ये रुद्राक्ष बांधलेत काय, जणू काही मी बाळासाहेब आहेत? अरे बाळासाहेबांच्या नखाचीही आपल्याला सर येणार नाही. कुठे बाळासाहेब आणि कुठे तुम्ही आहात? बाळासाहेब शब्दाला पक्के होते, तुम्ही तर बाळासाहेबांच्या विचाराशी बेईमानी करत आहात."

आपण काय बोलतोय याचे भाण ठेवायला हवे सर्वांनी -"एकंदा संपूर्ण रणधुमाळी बघितली, तर उद्धव ठाकरेंचा तोल गेलेला आपल्याला बघायला मिळतो. वाटेल ते बडबडायचे, वाटेल ते आरोप करायचे, गुजरातच्या बाबतीमध्ये अधिक बोलायचे, अमित शहांवर बोलायचे, मुख्यमंत्र्यांवर बोलायचे. मग देवा भाऊ काय? जॉकेटवाला भाऊ काय? दाढीवाला भाऊ काय? तुम्हाला शोधत का हे? मग तुम्हाला कडका भाऊ म्हटले तर चालेल का कुणी? तुमच्या मुलाला लफडेवाला भाऊ म्हटले तर चालेल का कुणी? आपण काय बोलतोय याचे भाण ठेवायला हवे सर्वांनी. हे अशोभनीय आहे, असं म्हणेन मी. खरेतर याच्यावरती गुन्हा दाखल व्हायला हवा होता. त्यांना जेलमध्ये टाकायला हवे होता, असे माझे प्रामाणिक मत आहे." असेही रामदास कदम यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना