शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्यांचा मोर्चा मानवी वस्तीकडे

By admin | Updated: July 19, 2015 21:32 IST

चिंता वाढली : कारवाई करण्याची मागणी

दिनकर चव्हाण-आंबवली -खेड तालुक्यात सातत्याने होत असलेली वृक्षतोड आणि डोंगराळ जमीन सपाटीकरण करण्याचे काम वेगाने सुरू आहे. तसेच वन्यप्राण्यांच्या शिकारीमुळे बिबट्याला जंगलमय भागात भक्ष्य मिळणे दुरापास्त झाले आहे.यामुळे शिकारीला बाहेर पडलेला बिबट्या मानवी वस्तीपर्यंत पोहोचण्याचे प्रमाण वाढले आहे. सन २०१२ ते २०१५ या तीन वर्षात बिबट्याने ५८ शेतकऱ्यांची ९१ जनावरे फस्त केली आहेत. त्यांना नुकसान भरपाईपोटी ३ लाख ९१ हजार रूपयांची मदत वन विभागाकडून देण्यात आल्याची माहिती वनपाल एस. जी. सुतार यांनी दिली आहे. सद्यस्थितीत खेड तालुक्यातील घनदाट जंगलात ४ ते ५ बिबटे असल्याचा दावा वन अधिकाऱ्यांनी केला आहे.खेड तालुक्याचा भौगोलिक विस्तार तसा मोठा आहे. जंगलमय भागामुळे खेड तालुक्याला डोंगराळ भाग म्हणून याअगोदरच घोषित करण्यात आले होते. तालुक्यातील सन २००१ मधील बिबट्यांची संख्या एक अथवा दोन असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे. हीच संख्या सन २०१४-२०१५मध्ये ४ ते ५ असावी, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.२००१ पासून २०१५ दरम्यान बिबट्यांची संख्या वाढली आहे. वडगाव, कांदोशी, कोतवली, शिरगाव, रसाळगड परिसर तसेच रघुवीर घाट आदी ठिकाणच्या जंगलात बिबटे संचार करीत असल्याचे आढळून आले. एका रात्रीत बिबट्या भक्ष्याच्या शोेधात १२ किलोमीटर अंतर फिरतो. १ जनावर फस्त केल्यावर तो महिनाभर शांत बसतो.त्यानंतर पुन्हा हाच बिबट्या शिकारीला बाहेर पडत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सद्यस्थितीत तेथील वनराईची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असल्याने भक्ष्याच्या शोधार्थ संचार करीत असलेले हेच बिबटे मानवी वस्तीपर्यंत येऊ लागले आहेत. अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड व रात्रीच्या सुमारास अनेक वेळा हौसेखातर होत असलेली वन्यप्राण्यांची शिकार यामुळे भक्ष्य शोेधण्यासाठी बिबट्याने आपले लक्ष मानवी वस्तीकडे वळवले आहे. विशेषत: भरणे, खोंडे परिसर तसेच करटेल, कोतवली, आंबवली, शिरगाव, कर्जी आमशेत, अजगणी, मांडवे, घेरासुमारगड, तुळशी, वाडीजैतापुर, आणि शिवतर परीसरात हेच बिबटे रात्रीच्या सुमारास अनेकदा आढळून आले आहेत. तेथील जनावरांची शिकारही त्यांनी केल्याची माहिती वनपाल सुतार यांनी दिली. याबाबत वनविभागाने त्वरीत हालचाल करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात असल्याने बिबट्याचा बंदोबस्त करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.खेड तालुक्यात सध्या ४ बिबटे असल्याची माहिती मिळत असून, जंगलतोडीमुळे या बिबट्यांचा वावर मानवी वस्तीकडे वळू लागला आहे. ग्रामीण भागातील शेतकरीही या प्रकारामुळे हादरले असून, वनविभागाने या शक्यतेला दुजोरा दिला आहे. या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी तसे निवेदनही वनअधिकाऱ्यांना दिले आहे.