शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
2
शिंदे कट्टर शिवसैनिक, ते बंड करणारे नव्हते, पण...; देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; 11 मतदारसंघ, तापमान कमी होणार
4
छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ईव्हीएम बंद पडली, परळीतही गोंधळ; टक्केवारीवर परिणाम
5
"उद्धव ठाकरेंचं स्वत:चं मेटावर्स जग, त्या जगाचे राजे तेच, नियमही त्यांचेच..."
6
Stock Market Opening Bell: Sensex-Nifty वर विक्रीचा दबाव, बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे ₹४७.५ हजार कोटी बुडाले
7
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
8
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्...
9
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
10
NPS: Retirement वर पाहिजेय ₹२ लाखांचं Pension? पाहा तुम्हाला किती करावी लागेल गुंतवणूक
11
भारतासोबत पंगा महागात पडला! मालदीवकडे विमाने आणि हेलिकॉप्टर उडवण्यासाठी वैमानिक नाहीत
12
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
13
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
14
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
15
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
16
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
17
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
18
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
19
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
20
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे

रत्नागिरीत सहा विहिरी एका रात्रीत आटल्या, पाण्याचा खडखडाट

By मेहरून नाकाडे | Published: March 23, 2024 6:16 PM

रत्नागिरी : सध्या उष्मा मोठ्या प्रमाणावर वाढला असून बाष्पीभवन झपाट्याने होत आहे. गुरूवारी (दि.२२ मार्च) शहरातील शिवाजीनगर परिसरातील विहिरीत ...

रत्नागिरी : सध्या उष्मा मोठ्या प्रमाणावर वाढला असून बाष्पीभवन झपाट्याने होत आहे. गुरूवारी (दि.२२ मार्च) शहरातील शिवाजीनगर परिसरातील विहिरीत चार ते साडेचार फूट पाण्याची पातळी असताना, शुक्रवारी (दि.२३) रोजी अचानक विहिरीमध्ये पाण्याचा खडखडात झाला. दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि.२४) पाण्याचा खडखडाट कायम होता. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे पाण्याशिवाय हाल होणार असून भविष्यात शहराला मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.शहरातील शिवाजीनगर परिसरातील आसपासच्या सहा विहिरी एका रात्रीत आटल्या आहेत. गतवर्ष झालेला कमी पाऊस, शिवाय पाण्याचा मोठ्या प्रमाणावरील उपसा यामुळे भूगर्भातील पाणीसाठ्यावर याचा परिणाम होणार आहे. त्यातच रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या शीळ धरणातीलही पाणीसाठा कमी झाल्याने शहरात सध्या आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात सुरू आहे. एप्रिलमध्ये शहरात एक दिवसा आड पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच पाणी समस्या निर्माण झाली असताना त्यातच विहिरी आटल्यामुळे परिसरातील नागरिकांना भीषण टंचाईचा सामना करावा लागणार आहे. या परिसरात असलेल्या पाणी व्यवसायिकांचाही व्यवसाय संकटात आला आहे.दोन दिवसांपूर्वी शिवाजीनगर येथील विहिरींमध्ये मुबलक पाणी होते, परंतु शुक्रवारी सकाळी विहीरींचे पंप सुरू करण्यासाठी नागरिक गेल्यानंतर खडखडाट झाल्याचे लक्षात आले. ही गोष्ट शहरात पसरताच कोरड्या झालेल्या विहिरी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढली. पाण्याचा अति उपसा व वाढता उष्मा यामुळे भूगर्भातील पाणीसाठ्यात घट झाली असल्याचा अंदाज भूजल विभागाने व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विहिरींमधील पाण्याचे नमूने, पाणीपातळी घेण्यात आली आहे. परंतु कोणत्याही तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणीपातळीत घट झालेल्या अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही. रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर येथील परिसरात असलेल्या विहिरींच्या पातळीत मात्र घट का झाली याचे स्वतंत्रपणे संशोधन करण्याची आवश्यकता आहे.

शिवाजीनगर या भागात पाण्याचा स्त्रोत चांगला असून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खासगी व्यवसायिकांच्या विहिरी या परिसरात आहेत. बहुतांश शहराला याच भागातील व्यावसायिक पाणी पुरवठा करतात. गुरूवार (दि.२२) पर्यंत पाणी पुरवठा व्यवस्थित असताना, अचानक झालेल्या खडखडाटामुळे पाणी व्यवसाय धोक्यात आला, शिवाय नागरिकांचेही हाल होणार आहेत.

गेली ३२ वर्ष शिवाजीनगर परिसरात पाणीपुरवठा व्यवसायिक म्हणून कार्यरत आहेत. जून महिना संपला तरी आमच्या विहिरीचे पाणी कधी आटत नव्हते. मात्र यावर्षी अचानक पाणी कमी झाले व विहिरीत खडखडाट झाला. त्यामुळे पाणी व्यवसाय बंद करावा लागला आहे. - कुंदन सावंत, पाणी पुरवठा व्यावसायिक

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणीdroughtदुष्काळ