शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

परिस्थिती गंभीर, घरी राहणे फायद्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:13 IST

कोरोनाचा नायनाट कधी होणार आणि सर्वांचे आयुष्य पूर्वपदावर कधी येणाऱ या प्रश्नाने प्रत्येक जण ग्रासला गेला आहे़. सर्वांचे जीवनमान ...

कोरोनाचा नायनाट कधी होणार आणि सर्वांचे आयुष्य पूर्वपदावर कधी येणाऱ या प्रश्नाने प्रत्येक जण ग्रासला गेला आहे़. सर्वांचे जीवनमान पूर्वपदावर येण्यासाठी प्रत्येकानेच कोरोनाशी लढा देण्याचा संकल्प करण्याची गरज आहे़ प्रत्येकाने या संकटातून बाहेर पडायचे आहे, असेल तर काही गोष्टी आपणाला कराव्या लागणार आहेत़ यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग काढणे अवश्यक आहे़.

कोरोना वाडी-वस्त्या, गावांमध्ये पोहोचला आहे़. पहिल्या टप्प्यामध्ये शहरी भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण होते़. आता तर ग्रामीण भागामध्येही संख्या वाढल्याने चिंतेची बाब बनली आहे़. गावाकडचा माणूस भोळाभाबडा, असे म्हटले जाते़. पहिल्या टप्प्याच्या वेळी गावकऱ्यांनी अनेक गावांमध्ये गावाच्या सीमा बंद केल्या होत्या़. त्यामुळे काही ठिकाणी याला विरोधही झाला होता़. त्यातच कोरोना रुग्ण सापडल्यास त्या गावच्या परिसराचा काही किलोमीटरपर्यंतचा भाग बंद करण्यात येत होता़. मात्र, आता ते दिवस राहिलेले नाहीत़. त्यामुळे आता अधिक काळजी घेणे गरजेचे आहे़. कारण कोरोनाचा प्रसार आता हवेतूनही होत असल्याने त्याचा संसर्ग अधिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही़. त्यामुळेच आज कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असून ग्रामीण भागालाही विळखा घेतला आहे़. त्यातच मृतांची आकडेवारी दररोज वाढत असून ही बाब चिंताजनक आहे़. त्यामुळे अनेकांचे संसार उदध्वस्त होत आहेत़. एकेका कुटुंबातील कमवती व्यक्ती तर काही कुटुंबातील दोन-दोन व्यक्ती कोरोनाचे बळी पडत असल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळत आहे़. या बळींमध्ये आता तरुणांची संख्याही वाढू लागल्याने परिस्थिती अधिक चिंताजनक बनत चालली आहे़. त्यामुळे प्रत्येकाने स्वत: जपायला पाहिजे़ आधी जीव नंतरच सर्व काही, असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे़.

कोरोनाचे वाढते संकट पाहाता शासनाने आणखी १५ दिवस लॉकडाऊन वाढविले आहे. मात्र, निर्बंध अधिक कडकही करण्यात आले आहेत. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येकाने लसीकरण करुन घ्यावे. त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर चाचण्या आणि कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेऊन त्यांचीही चाचणी करावी. तसेच शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. अशा बाबी केल्यास कोरोनाला दूर ठेवता येईल.

जिल्ह्यातील काही गावांनी स्वत:हून कडक लॉकडाऊन पाळण्याचे जाहीर केले आहे. मरण्यापेक्षा घरात बसलेले बरे, अशी परिस्थिती निर्माण झाल्यानेच गावांना स्वत:हून निर्णय घेण्याची वेळ आली आहे. याची जाणीव प्रत्येकाने स्वत:ला करुन घेणे आवश्यक आहे. अन्यथा फार गंभीर परिणाम भोगावे लागतील, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे.

रहिम दलाल